पाकिस्तानी विमानांसाठी हवाई क्षेत्रावरील बंदीत वाढ

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, हवाई सुरक्षेबाबत वाढती चिंता आणि अलिकडच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, भारताने आपली भूमिका आणखी कडक केली आहे. एकीकडे भारताने पाकिस्तानी विमानांसाठी आधीच लादलेल्या हवाई क्षेत्रावरील बंदी वाढवली आहे, तर दुसरीकडे इंडिगोच्या उड्डाणावरील वादामुळे हवाई ऑपरेशन्सशी संबंधित निर्णय अधिक संवेदनशील बनले आहेत. या सर्व घटनांमध्ये, भारताने आता पाकिस्तानला लागून असलेल्या आपल्या दक्षिण हवाई क्षेत्रात एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

भारताने पाकिस्तानच्या दक्षिण सीमेजवळील हवाई क्षेत्रात भारतीय हवाई दलाचा एक दिवसाचा सराव नियोजित केला आहे. हा सराव बुधवारी दिनांक ४ जून २०२५ केला जाईल. यासाठी एअरमेनला नोटीस जारी करण्यात आली आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. केंद्र सरकारने पाकिस्तानी विमाने आणि विमान कंपन्यांना भारताच्या हवाई हद्दीत प्रवेश करण्यापासून बंदी दिनांक २३ जून २०२५ पर्यंत वाढवली आहे.

दिनांक २१ मे रोजी, दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला पठाणकोटजवळ गारपीट आणि जोरदार वादळाचा सामना करावा लागला. उंचीवर उड्डाण करणाऱ्या विमानाने हवामान टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमेकडे डावीकडे मार्ग बदलण्याची परवानगी मागितली तेव्हा, भारतीय हवाई दलाच्या उत्तर नियंत्रण दलाने त्याला परवानगी दिली नाही.

यानंतर, क्रूने लाहोर एटीसीकडे पाकिस्तानी हवाई हद्दीत प्रवेश करण्याची परवानगी मागितली परंतु पाकिस्ताननेही ही परवानगी दिली नाही. नागरी उड्डयन महासंचालनालयने घटनेची पुष्टी केली आणि सांगितले की, “हवामान टाळण्यासाठी क्रूने पाकिस्तानच्या हवाई हद्दीत जाण्याची विनंती केली होती, परंतु ती देखील नाकारण्यात आली.”