
दिनांक ६ जून २०२५ रोजी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे बावन्नव्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगड किल्ल्यावर भव्य सोहळा पार पडला. राज्यभरातून आलेल्य तीन ते चार लाख शिवभक्तांनी या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी गडावर गर्दी केली.
सकाळी गड पूजन आणि शिरकाई देवीच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर, श्री शिवछत्रपती महाराजांच्या पालखीचे राजसदरेवर आगमन झाले. या सोहळ्यात युवराज संभाजी छत्रपती महाराज आणि युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित राहून शिवभक्तांना मार्गदर्शन केले.
होळीच्या माळावर शिवकालीन मर्दानी आणि युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली, ज्यामुळे उपस्थितांची मने भारावून गेली. शिवभक्तांच्या मोठ्या संख्येने होणाऱ्या आगमनामुळे वाहतुकीत अडथळा होऊ नये यासाठी रायगड प्रशासनाने मुंबई-गोवा महामार्गावर पाच जून सायंकाळी चार वाजल्यापासून पासून ते सहा जून रात्री दहा वाजता वाजेपर्यंत जड आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली होती.