
दिल्ली ते देहरादून या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून, ते लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे महामार्गाचे काम जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होईल आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी खुलं होईल.
या नव्या महामार्गामुळे दिल्ली ते देहरादून हे अंतर फक्त दोन तासांत पार करता येणार आहे. सध्या या मार्गावर प्रवासासाठी सुमारे सहा तास लागतात. पण हा गती मार्ग पूर्ण झाल्यानंतर वेळ, इंधन आणि वाहतूक कोंडी या सर्व समस्यांपासून मोठा दिलासा मिळणार आहे.
या महामार्गाचे विशेष आकर्षण म्हणजे आशियातील सर्वात लांब वाइल्डलाईफ कॉरिडॉर. या प्रकल्पामध्ये बाराशे मीटर लांबीची बोगदे, अरण्यातून जाणाऱ्या पुलांसह पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे वन्यजीवांचे संरक्षण आणि वाहतूक यांचा समतोल राखला जाईल.
या प्रकल्पामुळे उत्तराखंडच्या पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळेल. हरिद्वार, ऋषिकेश आणि मसुरीसारख्या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा महामार्ग एक नव्या युगाची सुरुवात ठरेल. याशिवाय, व्यापार व औद्योगिक वाहतुकीसाठीही हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.