दहावी बारावी पुरवणी परीक्षा आजपासून सुरू

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी व बारावी पुरवणी परीक्षा आज दिनांक २४ जून २०२५ पासून राज्यभरात सुरू झाल्या आहेत. ह्या परीक्षांचा उद्देश मुख्य बोर्ड परीक्षेत अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीत न थांबता मूळ वर्षात अडथळा न येता पुढे जाण्याची संधी देणे हा आहे.
दहावीची लेखी परीक्षा दिनांक ८ जुलै २०२५ पर्यंत, तर बारावीची लेखी परीक्षा दिनांक १६ जुलै 2025 पर्यंत घेण्यात येणार आहे. प्रत्येक दिवशी दोन काळात परीक्षा आहेत. सकाळी अकरा ते दोन, व दुपारी तीन ते सहा या वेळेत आयोजित केल्या आहेत. या योजनाबद्ध वेळापत्रकामुळे परीक्षा प्रक्रियेची सोपी आणि तणावमुक्त अंमलबजावणी शक्य होईल.
दोन्ही वर्गांमध्ये प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी परीक्षा देखील २४ जून ते ८ जुलै या कालावधीत घेण्यात येणार आहेत. बारावीतील माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाईन परिक्षा १५ व 16 जुलै रोजी होण्याची तरतूद आहे. तसेच, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र परीक्षा केंद्रांची विशेष सुविधा राखण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी आपला प्रवेशपत्र व वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावरून किंवा शाळा व महाविद्यालयातून वेळेवर मिळवून घेणे अत्यावश्यक आहे. प्रत्येक परीक्षेच्या दिवशी किमान तीस मिनिटे आधी निरीक्षित केंद्रावर पोहोचणे गरजेचे आहे. मंडळाने सर्व विद्यार्थ्यांना निर्देश व शिस्त पाळून शांत व एकाग्रपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.