
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी जाहीर केले आहे की, संसदेचे पावसाळी अधिवेशन दिनांक २१ जुलै २०२५ पासून सुरू होईल आणि दिनांक १२ ऑगस्ट २०२५ पर्यंत चालेल. या अधिवेशनात विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे, ज्यात ऑपरेशन सिंदूर आणि न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव यांचा समावेश आहे. ऑपरेशन सिंदूर ही भारताने दिनांक ७ मे २०२५ रोजी पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेली क्षेपणास्त्र हल्ल्यांची कारवाई होती, जी दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रतिशोध म्हणून करण्यात आली होती.
तीन महिन्यांच्या विरामानंतर संसदेच्या दोन्ही संत्रांचे अधिवेशन 21 जुलैपासून चालू होईल. दिनांक 21 जुलै 2025 रोजी सकाळी अकरा वाजता अधिवेशनाला सुरूवात होईल. याआधी संसदेचे अधिवेशन 31 जानेवारी रोजी चालू झाले होते. राज्यसभा आणि लोकसभेचे दोन्ही अधिवेशन दिनांक 4 एप्रिल रोजी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले होते. 2025 सालातील हे पाहिले अधिवेशन होते. आता दिनांक 21 जुलै रोजी 2025 सालाचे दुसरे अधिवेशन चालू होईल.
या अधिवेशनात विमा सुधारणा विधेयकासह विविध विधेयके मांडली जाण्याची शक्यता आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या या तारखा सरकारने जाहीर केल्या असून, हे अधिवेशन तेवीस दिवस चालेल. या अधिवेशनात विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे, ज्यात ऑपरेशन सिंदूर आणि न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव यांचा समावेश आहे.