देशविरोधी कारवायांसाठी महाराष्ट्र एटीएस व ठाणे ग्रामीण पोलिसांचे छापे

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक आणि ठाणे ग्रामीण पोलिसांनी दिनांक 3 जून २०२५ रोजी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, पडघा आणि बोरिवली गावांमध्ये देशविरोधी कारवायांशी संबंधित संशयितांवर मोठ्या प्रमाणावर छापे टाकले. या कारवाईत दहा तासांचे सर्च ऑपरेशन पार पडले, ज्यात विविध ठिकाणी झाडाझडती घेण्यात आली आणि काही नागरिकांची चौकशी करण्यात आली. या मोहिमेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, परंतु पोलिसांनी सुरक्षा वाढवून नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले.

या कारवाईदरम्यान, पोलिसांनी एकोणीस मोबाईल फोन, लॅपटॉप्स, डिजिटल उपकरणे आणि काही महत्त्वाचे दस्तऐवज जप्त केले आहेत. या छाप्यांमागील कारण म्हणजे देशाच्या विरोधात कट कारस्थान करून घातपात करण्याची तयारी सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणात, ठाण्यातील एका व्यक्तीला संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. प्रारंभिक तपासात उघड झाले आहे की, आरोपीने सोशल मीडियाच्या माध्यमातून एका पाकिस्तानी महिलेशी संपर्क साधला होता आणि तिच्या प्रभावाखाली येऊन राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित माहिती शेअर केली होती.