पवई हा मुंबईतील एक कृत्रिम तलाव आहे. येथे पूर्वी झोपड्यांचा समूह असलेले पवई गाव अस्तित्वात होते. आता पवई हे नाव शहराचे व तलावाचे नाव दर्शविते. पवई तलाव ‘मिठी’ नदीवरील ‘विहार’ तलावाच्या खाली आहे. बांधकामावेळी तलावाचे क्षेत्रफळ सुमारे 520 एकर होते.

‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-बॉम्बे’ ही संस्था भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रमुख संस्थांपैकी एक असून या तलावाच्या पूर्वेस स्थित आहे. आणखी एक प्रसिद्ध असणारी राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था ही देखील या तलावाजवळ आहे. सरोवराच्या परिसरात गृहनिर्माण संकुल आणि आलिशान हॉटेल्स विकसित झाली आहेत. या सरोवराभोवतीची लोकसंख्या गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या वाढली आहे.
पवई तलावाच्या पाण्याची गुणवत्ता अनेकवेळा ढासळली आहे. तलावातील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे घोषित करण्यात आले आहे. मात्र, हे तलाव पर्यटकांचे आकर्षण आहे.

ब्रिटिशांनी तलाव बांधण्यापूर्वी, सन 1799 मध्ये आता तलाव असलेली जागा डॉ. स्कॉट यांना वार्षिक भाड्याने दिली होती त्यांच्या मृत्यूनंतर सरकारने ही जागा ताब्यात घेतली. त्यानंतर ती फ्रामाजी कावसजी यांना भाड्याने दिली गेली.

प्रदूषण, जलकुंभ आणि तण, प्रक्रिया न केलेले सांडपाणी आणि मोठ्या गाळाच्या साठ्यामुळे पाण्याची खराब गुणवत्ता लक्षात घेऊन हा तलाव ‘वेस्टर्न इंडिया फिशिंग असोसिएशन’ला भाड्याने देण्यात आला. पुढे येथे सन 1936 मध्ये ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी अँग्लिंग असोसिएशन’ची स्थापना झाली. सन 1955 मध्ये सोसायटी नोंदणी कायदा 1860 अंतर्गत, त्याची नोंदणी ‘महाराष्ट्र राज्य अँग्लिंग असोसिएशन’ म्हणून करण्यात आली. आता तलाव त्यांच्या नियंत्रणाखाली आहे.