
महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील प्रबळगड किल्ल्याजवळ ‘कलावंतीण’ हा डोंगरमाथ्यावर बांधलेला टेहळणी गड आहे. समुद्रसपाटीपासून ६८६ मीटर उंचीवर हा गड असून वर चढण्यासाठी १६००० पायऱ्या आहेत. गडाच्या पायथ्याशी चढण असून पुढे पठारासारखा मोकळा भाग असून त्याला ‘प्रबळमाची’ असे म्हणतात. या माचीवर काही आदिवासी आणि ठाकर बांधवांची वस्ती आहे. येथे मुक्काम करायचा झाल्यास ही माचीची योग्य आहे. माची सोडून पुढच्या मार्गावर निघाले की वाटेत दगडात कोरलेली हनुमंत आणि गणपतीची मूर्ती आहे.
हा किल्ला पंधराव्या शतकातील आहे. राणी कलावंती हिने १५ व्या शतकात तो बांधला, असे म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे ‘मुरंजन’ हे नाव बदलून कलावंतीण दुर्ग असे केले. स्वातंत्र्यलढ्यात उमाजी नाईक यांनी या गडाचा वापर गुप्तपणे लपण्यासाठी केला होता. आजही या गडावर काही सांस्कृतिक कार्यक्रम होतात. होळीच्या दिवशी प्रबळमाची गावातील आदिवासी लोक कलावंतीण किल्ल्याच्या शिखरावर नृत्य करतात. त्यावेळची पनवेल आणि कल्याण या प्राचीन बंदरांवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला. या किल्ल्यात लेणी आहेत. ती बुद्धाच्या काळातील असावीत, असे म्हणतात. यादव आणि शिलाहारांनी या किल्ल्यास लष्करी छावणीचे स्वरुप दिले होते. बहामनी साम्राज्याच्या काळात हे बांधकाम केले असे मानले जाते.