सध्याच्या काळात कुटुंब व्यवस्थेला छेद गेलेला पहायला मिळतो. आई-वडील-एक मुल असं त्रिकोणी फार फार तर चौकोनी कुटुंबावर जास्त भर दिला जातो. एक काळ होता जेव्हा एकत्र कुटुबंपद्धती होती. सुख-दुःख एकमेकांसोबत वाटली जायची. कुटुंबात कोणी कमकूवत असलं तर त्याला आधार दिला जायचा. काळजी घेणारे अनेकजण होते. ज्यांच्या खांद्यावर हक्काने डोकं ठेवून आपण आपलं दुःख कमी करायचो पण जस जसा माणूस मोठा झाला तसं त्याला आपली कमतरता दुसऱ्याला सांगायला कमीपणा वाटू लागला. एका कुटुंबात आलेला दुरावा पुढे वाढत गेला आणि समाजात पसरला. या विखुरलेल्या समाजाला एका स्तरावर एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. त्यातुन प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य आणि रोजगारासाठी काम करायचं आहे. आम्ही आहोत सह्याद्री परिवार, एक विचार आणि एक ध्येयाने आम्ही सगळ्यांना घेवून पुढे जाणार आहोत.
गाव तिथे सह्याद्री परिवार
जिथे गाव तिथे सह्याद्री परिवाराचा स्वयंसेवक असेल. स्वयंफुर्तीने हा सदस्य काम करेल. आसपासच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करेल. माध्यमांचा वापर आम्ही सत्तेसाठी किंवा स्वार्थासाठी करणार नाही. समाजाची आर्थिक, कौटुंबिक आणि सामाजिक प्रगती करणे हा उद्देश आहे. सह्याद्री परिवारात राजकारणाला थारा नाही. सगळ्यांच्या प्रगतीसाठी सर्वांनी हातभार लावणं, जगण्यासाठी मदत करणे असे अनेक उपक्रम सह्याद्री परिवारातर्फे राबविले जातील. एखादी व्यक्ती जशी घरात काळजी घेते, जिथे गेल्यावर सर्व समस्या सोडविण्याचा मार्ग सापडतो तेच काम सह्याद्री परिवारात केलं जाईल.
सहभागी व्हा !
सह्याद्री परिवार म्हणजे म्हणजे एक विशाल छत आहे. इथे समस्यांचे समाधान व पुढे जाण्याचा मार्ग मिळेल. अडचणीत असताना रक्ताच्या नात्यापेक्षा जोडलेली नातीच कामाला येतात, असा अनेकांचा अनुभव आहे. अश्याच जोडलेल्या नात्यांचा हा परिवार आहे. कलागुणांना वाव देण्याबरोबर आधाराची भरभक्कम साथ या परिवारातून मिळेल. एकाचे दोन, दोनाचे चार आणि मग हजारो, लाखो लोक एकत्र येवून हा परिवार आपण मोठा होईल. आपल्याही मनात असंच काहीसं असेल तर खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा, प्राथमिक सदस्य व्हा आणि लागा कामाला...