सरकारी शाळांच्या आर्थिक – शैक्षणिक व्यवहारांवर प्रत्यक्ष देखरेख
सरकारी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी केंद्र सरकार दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करते. केंद्र सरकारने देशातील तेरा हजार शाळांच्या सामाजिक अंकेक्षणाची सुरू करण्याची घोषणा केली असून, याद्वारे शाळांच्या आर्थिक आणि शैक्षणिक व्यवहारांवर प्रत्यक्ष देखरेख ठेवली जाणार आहे. सोशल ऑडिट म्हणजे केवळ सरकारी अधिकाऱ्यांनी केलेली तपासणी नव्हे,…
नाशिकमधील बससेवेचे नियोजन कुंभमेळ्याच्या कामामुळे बदलले
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात विविध पायाभूत सुविधांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. विशेषतः पंचवटी आणि निमाणी परिसरात होणाऱ्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाने भुयारी मार्गाचे काम हाती घेतले आहे. या कामामुळे शहरातील वाहतुकीवर ताण येत असून, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी नाशिक विभागाच्या परिवहन मंडळाने जळगाव, धुळे,…
देवगडच्या हापूसला बदलत्या हवामानाचा फटका – बागायतदार चिंतेत
कोकण किनारपट्टीवर यंदा हवामानातील अनिश्चितता मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. कडाक्याची थंडी पडण्याऐवजी वातावरणात वारंवार होणारे बदल, ढगाळ वातावरण आणि अनपेक्षित उष्णता यामुळे आंब्यावर परिणाम झाला आहे. देवगड हापूसच्या बागांमध्ये यंदा मोहोर चांगल्या प्रमाणात आलेला असूनही त्याचे फळात रूपांतर होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे. आंब्याला पोषक…
कर्करोग – मधुमेहाची औषधे स्वस्त – मध्यमवर्गीयांना दिलासा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना मध्यमवर्गीय आणि सामान्य जनतेसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यंदाचा अर्थसंकल्प आरोग्य आणि पायाभूत सुविधा यांना समर्पित असल्याचे निर्मला सीतारमण यांनी सांगितले. या अर्थसंकल्पातील सर्वात मोठा दिलासा आरोग्य क्षेत्रात मिळाला आहे. अर्थमंत्र्यांनी दहा…
मुंबई – पुण्यासह देशात सात अतिजलद रेल्वे कॉरिडॉरची घोषणा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी २०२६ रोजी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी घोषणा केल्या आहेत. देशातील प्रमुख शहरांमधील दळणवळण अधिक गतीमान करण्यासाठी आणि आर्थिक विकासाला गती देण्यासाठी सात नवीन अतिजलद रेल्वे कॉरिडॉर विकसित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या…
अलमट्टी धरणाला राष्ट्रीय दर्जा देण्यास केंद्राचा नकार – महाराष्ट्राला दिलासा
कर्नाटक सरकार गेल्या अनेक दिवसांपासून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी आणि त्याला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करत होते. मात्र, तांत्रिक आणि कायदेशीर कारणांमुळे केंद्र सरकारने हा दर्जा देण्यास तूर्तास नकार दिला आहे. या निर्णयामुळे कर्नाटकला मिळणारा नव्वद टक्के केंद्रीय निधी आता रखडणार आहे….
मध्य रेल्वेचा पंच्याऐंशी दिवसांचा मेगाब्लॉक – प्रवाशांचे हाल
मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेतले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सीएसएमटी स्थानकावर तब्बल पंच्याऐंशी दिवसांचा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. या प्रदीर्घ कालावधीमुळे नाशिक, जळगाव, धुळे तसेच नागपूर आणि अमरावती भागातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल…
सशस्त्र दलातील दिव्यांगांच्या पेन्शनवर उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब
सशस्त्र दलातील जवानांना मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा स्पॉन्डिलायटिस यांसारख्या आजारांमुळे अपंगत्व येते. अशा जवानांना निवृत्तीवेतन नाकारणाऱ्या केंद्र सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारने दाखल केलेल्या सुमारे सत्तर याचिका फेटाळून लावल्या. मधुमेह,…
मुंबईतील पाणीपुरवठ्याच्या सुधारणेसाठी महापालिकेचा मोठा प्रकल्प
मुंबईकरांना पुरेसा आणि योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने नवीन पायाभूत सुविधा प्रकल्प राबवण्याचे निश्चित केले आहे. या प्रकल्पांतर्गत प्रामुख्याने मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरांमधील पाणी वितरणाची यंत्रणा आधुनिक केली जाणार आहे. मुंबईला दररोज सुमारे चार हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, तरीही अनेक…
राज्य सरकारची नव्या रक्तपेढ्यांसाठी कडक नियमावली
महाराष्ट्रात आता नवीन रक्तपेढी सुरू करणे केवळ औपचारिकता राहिलेली नाही. राज्य सरकारने नवीन रक्तकेंद्रांना मंजुरी देण्यासाठी अत्यंत परिपूर्ण आणि व्यापक धोरण जाहीर केले आहे. या नवीन नियमांनुसार, मुंबईसारख्या महानगरांमध्ये रक्तपेढी सुरू करू इच्छिणाऱ्या संस्थांना आता वार्षिक तीन हजार रक्तपिशव्यांचे संकलन करणे बंधनकारक करण्यात आले आहे….
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून दिव्यांगांना आत्मनिर्भर करणार
राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या विविध सेवा आणि योजना दिव्यांगांपर्यंत सुलभरीत्या पोहोचवण्यासाठी त्यांनी सर्वसमावेशक डिजिटल पोर्टल्स विकसित करण्याची घोषणा केली आहे. दिव्यांग व्यक्तींना केवळ सहानुभूतीची नाही, तर समान संधींची गरज आहे….
उजनी धरणाच्या पाण्यात प्रदूषण – नागरिकांचे आरोग्य धोक्यात
उजनी धरण हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे धरण आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत या धरणातील पाण्याची गुणवत्ता कमालीची खालावली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील उद्योगांचे सांडपाणी आणि प्रक्रिया न केलेले मैलापाणी थेट भीमा नदीद्वारे उजनी धरणात मिसळत असल्याने, धरणाचे पाणी आता विषारी होऊ…
हवा प्रदूषणाच्या देखरेखीसाठी उच्चाधिकार समिती स्थापन करणार
गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि नवी मुंबईतील हवेचा दर्जा सातत्याने खालावत आहे. याची न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली. नागरिकांना मुंबईतील हवेची गुणवत्ता केवळ मध्यम दर्जाची नको आहे, तर शुद्ध हवा मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे, अशा कठोर शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला सुनावले आहे….
मुंबईतील हवा विषारी – नेत्रविकारांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ
मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक गेले काही दिवस वारंवार वाईट ते अत्यंत वाईट श्रेणीत जात आहे. यामुळे मुंबईकरांच्या डोळ्यांच्या तक्रारींमध्ये तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. डोळे सतत उघडे राहत असल्याने ते हवेतील सूक्ष्म कणांच्या थेट संपर्कात येतात, यामुळे डोळ्यांचे गंभीर आजार बळावत आहेत. प्रदूषणामुळे…
राज्यातील आयटीआयचे आधुनिकीकरण होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रांच्या आधुनिकीकरणाच्या योजनेला मंजुरी देण्यात आली. यावेळी महाराष्ट्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था आता पीएम सेतू योजनेमुळे सर्वोत्तम व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र म्हणून नावारूपास येतील, असा विश्वास राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला आहे. या निर्णयामुळे कुशल…
सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री – पंतप्रधानांकडून कौतुक
राज्यात महायुती सरकारने सुनेत्रा पवार यांच्यावर उपमुख्यमंत्रिपदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे. शनिवारी राजभवनात पार पडलेल्या सोहळ्यात त्यांनी शपथ घेतली. या निवडीचे स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अधिक प्रगती करेल, असा विश्वास व्यक्त…
शाळांमध्ये मोफत सॅनिटरी पॅडची सोय करा – सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
आता इयत्ता सहावी ते बारावीमधील प्रत्येक विद्यार्थिनीला शाळेत मोफत सॅनिटरी पॅड्स मिळणार आहेत. मासिक पाळीच्या साधनांच्या अभावामुळे मुलींना शाळा सोडावी लागणे, हे त्यांच्या गोपनीयतेच्या आणि समानतेच्या अधिकारावर गदा आणणारे आहे, असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व शाळांना कडक निर्देश दिले आहेत. या निकालामुळे प्रत्येक…
नाशिकमधील हवामानातील बदलांमुळे द्राक्ष बागायतदार संकटात
नाशिकमध्ये हवामानाच्या बदलांचा फटका द्राक्ष बागायतदारांना बसला आहे. गेले काही दिवस काही भागांत निर्माण झालेले ढगाळ वातावरण, कडक ऊन आणि अचानक कमी होणारे तापमान असे हवामान बदल अनुभवायला मिळत आहे. यामुळे द्राक्ष पिकाला मणी तडकणे या गंभीर समस्येचा सामना करावा लागत आहे. काढणीच्या उंबरठ्यावर असलेल्या…
समृद्धी महामार्गावरील वाहतूक नागपूर – वर्धा दरम्यान चार दिवस बंद
समृद्धी महामार्गावरील नागपूर ते वर्धा या टप्प्यात ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२६ दरम्यान वाहतूक पूर्णपणे किंवा अंशतः बंद राहील. या काळात प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. महामार्गाच्या या टप्प्यावर काही तांत्रिक सुधारणा आणि ओव्हरहेड गर्डर बसवण्याचे काम प्रस्तावित आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि…
महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुनेत्रा पवार यांच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाची बैठकीत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी एकमताने निवड करण्यात येईल. यासाठी सुनेत्रा पवार या मुंबईत दाखल झाल्या…
महाराष्ट्रातील शाळांमध्ये आता स्वसंरक्षण – सैनिकी प्रशिक्षण अनिवार्य
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने राष्ट्र प्रथम अभियानांतर्गत एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. या अभियानांतर्गत राणी लक्ष्मीबाई आत्मसंरक्षण आणि जीवन कौशल्य मिशन राबविण्यात येत आहे. याअंतर्गत राज्यातील शाळांमध्ये आता आनंददायी शनिवारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण, योग आणि सैनिकी प्रशिक्षण…
मुंबईतील प्रदुषणाची पातळी वाढली – नागरिकांचे आरोग्य धोक्यात
गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि परिसरातील हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत चालली आहे. शहरातील विविध भागांतील हवा गुणवत्ता निर्देशांक धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईतील तब्बल पंचेचाळीस भागात, हवा गुणवत्ता मापन केंद्रांवर प्रदूषणाने दीडशेचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुंबईच्या…
महिलांसाठी सुरू झाले देशातील पहिले रजोनिवृत्ती केंद्र
महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देणाऱ्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाची महाराष्ट्रात अंमलबजावणी सुरू झाली आहे. रजोनिवृत्ती हा स्त्रियांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक पण अत्यंत आव्हानात्मक टप्पा असतो. या टप्प्यावर महिलांना योग्य वैद्यकीय आणि मानसिक आधार मिळावा, यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यात विशेष रजोनिवृत्ती केंद्र सुरू केली आहेत. अशा प्रकारचे राज्यव्यापी…
महाराष्ट्राच्या कृषिमालाला जागतिक ओळख मिळणार
महाराष्ट्र शासन आणि आशियाई विकास बँक यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारा महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्प राज्याच्या कृषी मूल्य साखळीसाठी महत्त्वाचा ठरत आहे. या प्रकल्पाच्या पुढचा टप्पा म्हणजेच मॅग्नेट दोन पूर्णांक शून्यद्वारे राज्यातील पणन गुंतवणूक, कृषिमालाचे मूल्यवर्धन आणि ग्रामीण रोजगार वाढीला मोठी गती दिली जाणार आहे,…
युएईमध्ये सुरू होणार पहिली राष्ट्रीय प्रवासी रेल्वे सेवा
संयुक्त अरब अमिरातीमध्ये बहुप्रतिक्षित आणि पहिली राष्ट्रीय प्रवासी रेल्वे सेवा, एतिहाद रेल ही लवकरच अधिकृतपणे प्रवाशांसाठी खुली केली जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे केवळ प्रवासाचा वेळच वाचणार नाही, तर सातही अमिरातींमधील सामाजिक आणि आर्थिक संबंध अधिक घट्ट होतील. एतिहाद रेलचे जाळे एकूण एक हजार दोनशे…