पुणे महापालिकेचा कर्करुग्णांना दिलासा
पुणे महानगरपालिकेने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अभिनव प्रकल्प हाती घेतला आहे. पुणे महामालिका आता शहरातील कर्करुग्णांसाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर कमी खर्चात पेट स्कॅन आणि प्रगत रेडिओ डायग्नोस्टिक केंद्र सुरू करणार आहे. कर्करोगाचे निदान आणि उपचार आजच्या काळात अत्यंत महागडे झाले आहेत, ज्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय…
मढ – वर्सोवा दीड तासाचा प्रवास दहा मिनिटांत होणार
मुंबईत मढ ते वर्सोवा खाडीवर पूल उभारला जाणार आहे. या पुलामुळे मोठा वेळ वाचणार असून दीड-दोन तासांचा प्रवास हा फक्त दहा मिनिटांत होणार आहे. या पुलाची लांबी ही साधारण दीड किलोमीटर आहे. पुलाचा अंदाजित खर्च तीन हजार नऊशे कोटी रुपये आहे. पुढील दोन महिन्यांत पुलाच्या…
मतदार यादीवरील चारही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या
मुंबई उच्च न्यायालयाने मतदार यादी संदर्भातील चार महत्त्वाच्या याचिका फेटाळून लावल्या असून, यामुळे याचिकाकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. या निर्णयामुळे राज्यातील मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेवर न्यायालयीन स्थगिती मिळण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. विशेष म्हणजे, या सुनावणीदरम्यानच केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा…
माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा सुरु होणार – पर्यटकांना दिलासा
माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. नेरळ-माथेरान मार्गावरील मिनी ट्रेन उद्यापासून पुन्हा सुरू होत आहे. सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ही सेवा सुरू झाल्याने पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. माथेराच्या मिनी ट्रेनने प्रवास करू इच्छिणाऱ्या पर्यटकांची प्रतीक्षा संपली असून गुरुवारपासून नेरळ-माथेरान मार्गावरील मिनी ट्रेन सुरू होणार असल्याची…
किसान क्रेडिट कार्डधारकांना शासनाकडून आर्थिक सवलत
महाराष्ट्रातील मच्छिमार आणि मत्स्यव्यवसायाशी संबंधित घटकांसाठी राज्य शासनाने दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शासनाने जाहीर केलेल्या नव्या योजनेअंतर्गत किसान क्रेडिट कार्डधारक मच्छिमार, मत्स्यकास्तकार, मत्स्यउत्पादक, मत्स्यव्यवस्थापन करणारे तसेच मत्स्यबीज संवर्धक यांना दोन लाख रुपयांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या खेळत्या भांडवली कर्जावर चार टक्के व्याज परतावा सवलत देण्यात येणार…
पुण्यातील मेट्रोच्या नवीन उपमार्गिकांना सरकारची मंजुरी
पुणेकरांसाठी खुशखबर आहे. राज्य मंत्रीमंडळाने हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन मेट्रो उपमार्गिकांना मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या मंत्रीमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या मार्गिकांना मान्यता देण्यात आली. पुणे मेट्रो टप्पा – दोन…
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत वीजपुरवठा – पंधरा लाख घरांना थेट लाभ
राज्यातील गरिब आणि दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड यांच्या माध्यमातून “महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप” योजना राबविण्यात येणार असून, या योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना त्यांच्या घराच्या छपरावर सौरऊर्जेचा प्रकल्प बसवून पंचवीस वर्षांपर्यंत मोफत वीजपुरवठा केला जाणार आहे….
एसटी महामंडळाच्या मोकळ्या जमिनींवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने राज्यभरातील त्यांच्या मोकळ्या जमिनी व इमारतींच्या छप्परांचा उपयोग सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून दरवर्षी तीनशे मेगावॅटची सौर ऊर्जानिर्मिती करण्याचे लक्ष्य आहे. यामुळे अंदाजे एक हजार कोटी वाचवता येतील असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्र…
अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्गातील सतरा हजार शेतकरी बाधित
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे. प्राथमिक अहवालानुसार, ३१ ऑक्टोबरपर्यंत तब्बल चार हजार तीनशे अडतीस हेक्टर शेतीचं क्षेत्र पावसामुळे बाधित झालं आहे. या नुकसानामुळे पाचशे पंचवीस गावांतील सतरा हजार एकशे बाहत्तर शेतकरी प्रभावित झाले आहेत. मुख्यतः भात, नाचणी…
वहिवाटीच्या पाणंद रस्त्यांसाठी शासनाचा नवा निर्णय
महाराष्ट्र शासनाने पुणे जिल्ह्यासह राज्यभरातील वहिवाटीच्या पाणंद रस्त्यांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवरील अतिक्रमण, चुकीची हद्द निश्चिती आणि आदेशांची अंमलबजावणी न होणे या तक्रारी वाढल्या होत्या. यामुळे शासनाने आता प्रत्येक आदेशानंतर प्रत्यक्ष स्थळावर ‘जिओ-टॅग’सह छायाचित्र घेऊन पंचनामा करणे बंधनकारक केले आहे. या नव्या…
पिंपरी-चिंचवडमध्ये अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी – नागरिक त्रस्त
पिंपरी-चिंचवडमध्ये विविध भागातील रस्त्यांची रचना नागरी रस्ता या संकल्पनेखाली केली जात आहे. मोरवाडी चौक येथे जुन्या पुणे‑मुंबई महामार्गच्या बाजूला रस्ता सुधारणा म्हणून सिमेंटचे ब्लॉक्स टाकल्याने रस्ता अरुंद झाला आहे. रस्ता अरुंद झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. पदपथ मोठे झाले आहेत. मात्र, एकाच वेळी…
मतदारयादी जाहीर झाल्यानंतर न्यायालयीन हस्तक्षेप शक्य नाही – उच्च न्यायालय
मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, एकदा मतदारयादी अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतर न्यायालय त्यामध्ये कोणताही हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे निवडणुकीच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा कोणताही प्रयत्न मान्य केला जाणार नाही, असा ठाम इशारा न्यायालयाने दिला…
ठाणे – बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडी सूटणार – प्रवाशांना दिलासा
ठाणे–बेलापूर महामार्ग हा नवी मुंबईतील औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्राला जोडणारा सर्वात महत्त्वाचा मार्ग मानला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांत या मार्गावर वाहतूक प्रचंड वाढल्याने दररोज कोंडी, वेळेचा अपव्यय आणि अपघातांची मालिका सुरू होती. या सर्व परिस्थितीचा विचार करून ठाणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास…
ठाणेकरांसाठी दिलासा – अंतर्गत वर्तुळ मेट्रो प्रकल्पाला वेग
ठाणेकरांसाठी एक महत्त्वाची आणि उत्साहवर्धक बातमी समोर आली आहे. ठाण्यातील वाहतूक कोंडी आणि प्रवासातील अडचणी दूर करण्यासाठी “अंतर्गत वर्तुळ मेट्रो प्रकल्प” साकार करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी सुमारे एकोणतीस किलोमीटर असून, त्यात बावीस स्थानकं असतील. या स्थानकांमुळे ठाण्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या भागाला…
पूर्व ते पश्चिम मुंबईचा प्रवास होणार फक्त वीस मिनिटांत
मुंबईकरांचा मालाड ते ऐरोलीमधला वाहतूकीचा वेग आणखी वाढणार आहे. गोरेगाव-मुलुंड जोड मार्गासाठी दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात पाच पूर्णांक तीन किलोमीटर लांबीच्या जुळ्या बोगद्याचे काम वेगाने सुरू आहे. हा प्रकल्प मुंबईतील आतापर्यंतचा सर्वात मोठा बोगदा ठरणार आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुकर होणार आहे. मुंबईचा पश्चिम उपनगर…
महाराष्ट्रातील डॉक्टरांचा आजपासून राज्यव्यापी संप
महाराष्ट्रात पुन्हा एकदा वैद्यकीय क्षेत्र अस्वस्थ झाले आहे. राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी 3 नोव्हेंबरपासून अनिश्चित काळाच्या संपाची हाक दिली आहे. या संपाचे नेतृत्व महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स करत आहे. त्यांनी या घटनेतील न्याय न मिळाल्याचा आणि प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा निषेध नोंदवला आहे….
मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी आता निदान चाचण्या सशुल्क
मुंबई महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये रुग्णांसोबतच महापालिकेतील कर्मचार्यांना दिल्या जाणाऱ्या मोफत निदान सेवांवर आता शुल्क आकारले जाणार आहे. महापालिकेने नुकत्याच तयार केलेल्या नव्या धोरणानुसार, रुग्णालयांमधील सीटी स्कॅन, एमआरआय आणि सोनोग्राफी यांसारख्या उच्च दर्जाच्या निदान चाचण्या खासगी संस्थांना आउटसोर्स करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत बीएमसी कर्मचार्यांना…
अजित पवारांची पुन्हा एकदा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड
महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात मोठा निर्णय घेतला गेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुन्हा एकदा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. हे त्यांचे सलग चौथ्यांदा अध्यक्षपद असून, क्रीडा संघटनांमधील त्यांच्या नेतृत्वाला यावेळी पुन्हा मान्यता मिळाली आहे. संघटनेतील बहुतांश सदस्यांनी एकमुखाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. या…
महाराष्ट्रात पुढील चौवीस तासांत मुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रातील अनेक भागांसाठी पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरण ढगाळ असून, काही ठिकाणी अधूनमधून पावसाच्या सरी सुरू आहेत. यामुळे तापमानात घट झाली असून, हवा ओलसर आणि थंड झाली आहे. मात्र हवामान विभागाने दिलेल्या नव्या अंदाजानुसार पुढील…
राज्यात कुष्ठरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभागाची नवी योजना सुरू
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने कुष्ठरोगाला “निवार्य जाहीर रोग” म्हणून घोषित केले आहे. या निर्णयानुसार, राज्यातील सर्व शासकीय तसेच खासगी डॉक्टर, दवाखाने आणि रुग्णालयांना कुष्ठरोगाचे निदान झाल्यानंतर दोन आठवड्यांच्या आत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे माहिती नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील रुग्णसंख्या अचूकपणे नोंदवता…
मुंबईत वाढत्या किंमतीमुळे घरविक्रीत मोठी घट
मुंबई आणि उपनगरांतील घरबाजार गेल्या काही महिन्यांपासून मंदावलेला दिसत आहे. या वर्षीच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत घरविक्रीत तब्बल चौदा टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. मागील वर्षीच्या याच काळात विक्री मोठ्या प्रमाणात झाली होती, मात्र यंदा किंमती आणि महागाईमुळे नागरिक घरखरेदीकडे दुर्लक्ष करत आहेत. रिअल…
राज्यात कृषी धोरणाच्या आखणीला सुरुवात
बारामती येथे आयोजित मोठ्या शेतकरी मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची घोषणा केली की, राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी दिनांक ३० जूननंतर करण्यात येईल. मात्र, ही सुविधा “दरवेळी आणि प्रत्येक सरकारकडून मिळेलच” असा गैरसमज शेतकऱ्यांनी ठेवू नये, असा त्यांनी ठाम इशारा दिला. पवार म्हणाले…
वडील किंवा पती नसलेल्या महिलांनाही मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ
राज्यातील महिलांसाठी राबवण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेअंतर्गत आता वडील किंवा पती दोघेही नसलेल्या महिलांनाही दिलासा मिळणार आहे. शासनाने जाहीर केले आहे की, अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही. यापूर्वी ई-केवायसी प्रक्रियेत पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक आवश्यक असल्याने…
अकोल्यात सरकारी दराने कापूस खरेदीस सुरुवात
अकोला जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील कापूस खरेदी प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. केंद्र शासनाच्या भारतीय कापूस महामंडळ अर्थात सीसीआय या संस्थेमार्फत ही खरेदी केली जात आहे. शेतकऱ्यांकडून कापूस हमीभावाने खरेदी करण्यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून, पहिल्याच दिवशी अनेक शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रांवर गर्दी केली….
नैसर्गिक आपत्तीतील नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत
राज्यातील नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यास राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एकूण दोन हजार पाचशे चाळीस कोटी नव्वद लाख एकोणऐंशी हजार रुपयांचा निधी वितरणास राज्य सरकारने मान्यता…