चिंचणी सागरकिनारा

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये गजबजलेल्या जीवनापासून शांतता प्रदान करणारा नयनरम्य असा चिंचणी सागरकिनारा आहे. तारापूर तालुक्यातील हा समुद्रकिनारा सोनेरी वाळू आणि स्वच्छ निळ्याशार पाण्यासाठी ओळखला जातो. हा समुद्रकिनारा हिरवाईने वेढलेला आहे. येथे आभाळास भिडू पाहणारी नारळाची झाडे आहेत. चिंचणी किनारा हे एक लोकप्रिय ठिकाण आहे.हा किनारा मुंबईपासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर आहे. समुद्रकिनाऱ्याजवळ अनेक देखणी मंदिरे आणि मासेमारीवर उपजिवीका असणारी गावे आहेत. येथून तारापूर किल्ला 10 किलोमीटर अंतरावर आहे. बोर्डी समुद्रकिनारा १५ किलोमीटर अंतरावर आहे. तर डहाणू पक्षी अभयारण्य 20 किलोमीटर अंतरावर आहे.

या किनाऱ्यावर जायचे झाल्यास सर्वात जवळचे रेल्वेस्थानक आणि बसस्थानक वाणगाव आहे. समुद्रकिनाऱ्याजवळ अनेक हॉटेल्स आणि गेस्टहाऊस आहेत. हा किनारा सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 पर्यंत खुला असतो. समुद्रकिनाऱ्यावर प्रवेश करण्यासाठी प्रवेश शुल्क आहे. या किनाऱ्यावर पोहणे, सूर्यस्नान व जलक्रीडांचा आनंद घेऊ शकता. हा किनारा पक्षी निरीक्षणासाठी देखील एक लोकप्रिय ठिकाण आहे. येथे ‘फ्लेमिंगो’, ‘पेलिकन’ आणि ‘आयबिसेस’सह पक्ष्यांच्या अनेक प्रजाती दिसतात. या किनाऱ्यास नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात भेट द्यावी. यावेळी हवामान आल्हाददायक असते. येथे अनेक लहानमोठी दुकाने आहेत.