
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील पालघर या शहरापासून सुमारे 14 किलोमीटर अंतरावर दांडी सागरकिनारा आहे. पालघर येथून दांडी किनाऱ्यावर जाण्यासाठी स्थानिक कॅब किंवा ऑटो-रिक्षा भाड्याने घेऊ शकता, दांडी किनारा फार सुंदर आहे. येथील सोनेरी वाळू आणि अप्रतिम हिरवाई लक्षवेधी आहे. दांडी किनारपट्टीवर लांबपर्यंत चालण्याचा अनुभव घेता येतो.
येथून सूर्यास्त पाहणे फार आनंददायी असते. सूर्य मावळतानाच्या आकाशातील केशरी, गुलाबी रंगांच्या छटा मनमोहक असतात. येथे उत्तम छायाचित्रे टिपता येतात. हा किनारा तुलनेने निर्जन आणि कमी गर्दीचा आहे. येथे एकांत आणि शांतता अनुभवता येते. शहराच्या व्यस्त जीवनातून आराम करण्यासाठी हे एक उत्त्म स्थळ आहे. दांडी किनाऱ्याचा परिसर जैवविविधतेने समृद्ध आहे, हा समुद्रकिनारा खजुरीची झाडे आणि इतर वनस्पतींनी नटलेला आहे.
येथे सीगल्स, किंगफिशर, सँडपायपर आणि इतर अनेक पक्षी स्वच्छंदी विहार करताना आढळतात. याशिवाय जेट स्कीइंग, पॅरासेलिंग, बोट राइड आणि डॉल्फिन स्पॉटिंग ट्रिप यांसारख्या जलक्रीडांचा आनंद घेऊ शकता. येथे जाणारे पर्यटक मनोर किल्ला, शिरगाव किल्ला आणि केळवा किल्ला यासारखी ऐतिहासिक स्थळे पाहू शकतात. या प्रदेशात गरम पाण्याचे झरे, प्राचीन गुहा आणि सुंदर मंदिरे आहेत, पालघर शहरामध्ये पर्यटक स्थानिक स्वादिष्ट पदार्थांसह अन्य पदार्थांचाही आस्वाद घेऊ शकता. आस्वाद घेऊ शकता. पालघरचे सर्वात जवळचे विमानतळ मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, जे तेथून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर आहे.