पेट्रोल न मिळाल्याने मुंबईकडे जाणारे विमान रद्द

अमरावती येथील बेलोरा विमानतळावरून मुंबईकडे जाणारे विमान इंधनाच्या अभावामुळे रद्द करण्यात आले आहे. ही घटना २६ मे २०२५ रोजी सायंकाळी घडली. विमानाला इंधन भरण्यासाठी आलेला टँकर मातीत अडकला, ज्यामुळे विमानाला आवश्यक इंधन मिळू शकले नाही. या कारणामुळे अमरावती-मुंबई विमानफेरी रद्द करण्यात आली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे, कारण त्यांना पर्यायी व्यवस्था किंवा वेळेवर माहिती मिळाली नाही. या प्रकारामुळे विमानतळावरील व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या घटनेमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे, कारण त्यांना पर्यायी व्यवस्था किंवा वेळेवर माहिती मिळाली नाही. या प्रकारामुळे विमानतळावरील व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मुंबईत दोन दिवसांपासून सुरु आहे. परिणामी अनेक विमानांचे उड्डान सोमवारी रद्द झाले.

एयर इंडिया, इंडिगो आणि स्पाइसजेटकडून विमानतळावर जाण्यापूर्वी फ्लाइट शेड्यूलचे ऑनलाइन अपडेट पाहण्याचा सल्ला दिला आहे. प्रवाशांसाठी आमची टीम विमानतळावर सतत कार्यरत आहे, असे या कंपन्यांनी म्हटले आहे. दरम्यान, विमानांची उड्डाने रद्द झाल्यामुळे प्रवाशांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.