
काही लोक भाग्य घेऊन जन्माला येतात. गाण्याच्या स्टेजवर पाउल ठेवलं तेव्हा ती अवघी ११-१२ वर्षाची होती. त्यानंतर तिने ‘सारेगम’ ची लहान मुलांची स्पर्धा जिंकली. तेव्हा ती १४-१५ वर्षाची होती. लगेचच मोठ्यांच्या मेगाफायनलमध्ये भाग घेण्याची संधी तिला मिळाली. ही स्पर्धा देखील ती जिंकली. तेव्हापासून बेला शेंडे हिच्या गाण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली.- मुग्धा करंदीकर.
हा प्रवास करताना गाणं समृद्ध करणाऱ्या अनेक संधी तिला मिळाल्या. मानमरातब मिळाले. त्यामुळे लक्ष विचलित नं होऊ देता त्यांनी प्रत्येक संधी आव्हान मानली आणि ते ती आव्हानं पेलत गेली.
गाणाऱ्या घराण्यात तिचा जन्म झाला. लहान होती तेव्हा तिची मोठी बहीण सावनी ह्या त्यांच्या आजी म्हणजेच किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका ‘कुसुमशेंडे’ यांच्याकडे रीतसर शिक्षण घेऊ लागल्या. त्यावेळेस शेजारी बसून बेला त्यांचं गाणं ऐकत असत. आईबाबांबरोबर अनेक कार्यक्रमांना जात असत. त्यावेळेपासूनच तिची गाण्याची आवड दिसायला लागली. बाबांनी हे ओळखलं आणि तिचे गायनाचे प्रशिक्षण सुरु झाले. ती तिच्या आजीकडेच गाणं शिकत होती. पण त्यांच्या आवाजाची
पट्टीवरची आहे हे लक्षात आल्यावर तिने पुरुष गायकाकडे शिकावं असं सुचवलं. ह्यानंतर तिने बाबांकडेच गायनाचे धडे घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या आजीमुळे त्यांच्या घरी माणिक वर्मा, डॉ. प्रभा अत्रे, शोभा गुर्टू अशा मोठमोठ्या गायिकांचं येणं-जाणं होतं. त्यामुळे गाणं समृद्ध व्हायला खूप मदत झाली.

दहावीत असताना ‘सारेगम’ची स्पर्धा होती. त्या स्पर्धेत भाग घेण्याबद्दल ती जरा साशंक होती. पण घरच्या आणि शाळेतल्या साऱ्यांचा पाठींबा होता. अभ्यास आणि गाणं हे दोन्ही सांभाळायचं होतं. हे तिने सांभाळलं आणि ती स्पर्धा जिंकली.ह्या स्पर्धेनंतर तिला अनेक अल्बम्स, हिंदी-मराठी चित्रपट, शीर्षक गीते गायला मिळाली. पार्श्वगायनाची पहिली संधी महेशमांजरेकरांनी दिली. त्यांच्या ‘एहसास’ ह्या चित्रपटासाठी तिने गायन केले.’मीशिवाजीराजेभोसलेबोलतोय, जोधाअकबर, उत्तरायण, पहेली, अशाअनेकहिंदी-मराठी चित्रपटांसाठी ती गायली. ‘नटरंग’ सारखा, अजय-अतुल यांचं अतिशय उत्कृष्ठ संगीत लाभलेल्या चित्रपटांसाठी तिला संधी मिळाली आणि ती सारी गाणी अतिशय लोकप्रिय झाली.
‘अनुबंध, शुभंकरोति, हा खेळसावल्यांचा, एकझोका, वृंदावन’ अशा विविध मालिकांची शीर्षक गीते ही तिच्याच आवाजातली.अशा ह्या उत्तम गायिकेस आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. जसेकी ‘ झीगौरव, नर्गिस दत्त पुरस्कार, सुशीलस्नेह पुरस्कार, कलागौरव पुरस्कार, झी संगीत पुरस्कार, स्टारस्क्रीन पुरस्कार, (मनमोहना-जोधा-अकबर) मिर्ची म्युझिक पुरस्कार, सर्वोत्कृष्ट गायिका (झीटी.व्ही,नटरंग), रापा राष्ट्रीय पुरस्कार (झाले मोकळे आकाश) असे अनेक सन्मान तिच्या वाट्याला आले आहेत.
गुरु आणि वडील यांच्या रचनांवर आधारित ‘अर्पण’ हा बेला शेंडे यांचा अल्बम नुकताच प्रसिद्ध झाला. अशा प्रकारे त्यांचा गाण्याचा प्रवास अतिशय उत्कृष्टपणे सुरु आहे. वेगळ्यावेगळ्या प्रकारची गाणी गायची संधी त्यांना मिळत आहे. अशीही अष्टपैलू गायिका हिरकणीच म्हणावी लागेल.