
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात जांबसमर्थ येथे संत रामदास स्वामी यांचा जन्म झाला. रामदास स्वामींचे गाव पाहण्यासाठी भाविकांची पाऊले आपोआप इकडे वळतात. या गावात रामदास स्वामींचे मंदिर आहे.
रामदास स्वामींच्या घरात राम मंदिर आहे. येथे दररोज भाविक मोठ्या संख्येने हजर असतात. शिवाय दरवर्षी रामनवमीस यात्रा भरते. रामदास स्वामींच्या स्मरणार्थ येथे समर्थ मंदिर बांधण्यात आले आहे.
एक संस्था या मंदिराचे व्यवस्थापन करते. सन 1943 साली या मंदिराची स्थापना करण्यात आली. येथे लांबून येणाऱ्या भाविकांसाठी संस्थेमार्फत राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही निवासी इमारत देवी अहिल्याबाई होळकर यांनी दिलेल्या देणगीमधून बांधण्यात आली आहे.

या मंदिरांमध्ये भाविकांची नेहमी गर्दी असते. येथे जाण्यासाठी विमान प्रवास करू इच्छिणाऱ्यांसाठी सर्वात जवळचे विमानतळ औरंगाबाद हे आहे. जालनापासुन येथे जाण्यासाठी नियमित बस असतात. रेल्वेने प्रवास करीत असल्यास परतुर हे रेल्वे स्थानक जवळ आहे.