बांबोळी समुद्रकिनारा

बांबोळी समुद्रकिनारा हा गोव्याची राजधानी असलेल्या पणजीपासून 7 किलोमीटर अंतरावर आहे. सहलीचा किंवा शांत दिवसाचा आनंद लुटणाऱ्यांनी या किनाऱ्यावर जावे. गोव्यात विखुरलेल्या बहुतेक समुद्रकिनाऱ्यांप्रमाणे या किनाऱ्यावर विक्रेते किंवा शॅक दिसणार नाहीत. या किनाऱ्यावर नारळाची झाडे, खडकाळ भाग आणि सोनेरी वाळूचा लांब पट्टा दिसतो. या किनाऱ्यावर कोणत्याही दिवशी गेले तरी कामात मग्न असणारे मच्छिमार दिसतील.
या किनाऱ्यावर पर्यटक मनपसंत छायाचित्रे टिपू शकतात.

येथे सर्वात जवळचे हॉटेल ‘ग्रँड हयात’ हे आहे. अत्याधुनिक सुविधा, उत्कृष्ट आदरातिथ्य आणि सर्व सोयींनी सज्ज असणारे लक्झरी हॉटेल येथे आहे. ऑक्टोबर ते मार्च हा या किनाऱ्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे. येथील हवामान आल्हाददायक आणि आरामदायक आहे. समुद्रकिनाऱ्यावर पोहोचण्यासाठी पर्यटक टॅक्सी किंवा इतर खासगी वाहने भाड्याने घेऊ शकतात.