मधमाशीपालन

मधमाशांचे वैशिष्ट्य आपणांस माहित असेल. मधमाशांशिवाय फुलांपासून मध तयार होऊ शकत नाही. याच मधमाशा माणसाला चांगले उत्पन्न देऊ शकतात. राजस्थानातील गंगापूर शहर जिल्ह्यात नयागाव येथे पिंटू मीना हा व्यवसाय यशस्वीपणे करतात. पिंटू मीना यांनी सुरुवातीला आठविस पेट्यांसह मधमाशी पालनाला सुरुवात केली. आज त्यांच्याकडे चारशे पेट्या आहेत. या व्यवसायाबद्दल ते म्हणतात की, ते वडिलांकडून मधमाशीपालन शिकले. ते आपल्या भागात जुलै ते फेब्रुवारी या कालावधीत पेटी ठेवतात. येथे चांगला मध मिळतो. यावर्षी सुमारे पंधरा ते सोळा लाख रुपये कमवू शकतात. शेतकरी हवे असल्यास मधमाशीपालन करून चांगला नफा कमवू शकतात; परंतु ते करण्यापूर्वी त्यांना संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.”
मधमाशी पालनाचे गणित समजावून सांगताना ते म्हणतात की, “मधमाशीपालन करणाऱ्यांनी यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी फुलांच्या कोणत्या भागात मध आहे हे तपासणे आवश्यक आहे. विशेषतः शरद ऋतूतील थंडीत मधाची उपलब्धता असते. या काळात माश्यांच्या पेट्यासाठी गोणीचा वापर करतात. मधमाश्यांच्या पेटीचे तापमान सारखेच उबदार राहते. शक्य असल्यास प्रवेशद्वार वगळता संपूर्ण पेटी पॉलिथीनने झाकली पाहिजे. गवत किंवा पेंढ्यापासून बनविलेल्या पोत्याने पेट्या झाकून ठेवतात. ग्रामीण भारतातील इतर अनेक कृषी-आधारित उपक्रमांप्रमाणे, मधमाशी पालनातूनही उत्पन्न मिळते. या व्यवसायात पेट्यांची संख्या, आजूबाजूची पिके, काम करण्याची पद्धत, विपणन इत्यादींवर अवलंबून असतो.मधमाश्या केवळ मधच पुरवत नाहीत तर त्या निसर्गाच्या अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवा आहेत. कृषी आणि अन्नतज्ज्ञांच्या मते, 70 टक्के पिकांचे परागीकरण मधमाशांद्वारे होते. अशा स्थितीत पिकांच्या चांगल्या उत्पादनात मधमाशांचाही फायदा होतो.
एका मधमाशीपालनाच्या पेटीतून दहा दिवसात चार -पाच किलो मध तयार होऊ शकते. हा सर्व व्यवसाय सर्व हंगामात आणि पिकावर वाढणारी फुले यावर अवलंबून असतो. एका पेटीतून सरासरी दहा दिवसांत सुमारे चार -पाच किलो मध मिळतो. उरलेल्या दिवसांत जेव्हा कमी फुले येतात, तेव्हा एका पेटीतून वर्षभर सरासरी तीस -पस्तीस किलो उत्पादन मिळते. एका वर्षात सरासरी तेरा -चौधा क्विंटल मध मिळते, जो कंपनी संभर रुपये प्रति किलो दराने खरेदी करते. या मधाची सुमारे तेरा -चाधा लाख रुपयांना विक्री होते. मधमाशांना जिवंत ठेवण्यासाठी त्यांना अन्न म्हणून साखर दिली जाते. व्यवसायाला एकूण खर्च अंदाजे पाच लाख वीस रुपये होतो. मधमाशीपालनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार राष्ट्रीय मधमाशी पालन आणि मध अभियान चालवत आहे. हे अभियान सन 2017 मध्ये देशात सुरू करण्यात आले होते. याचा उद्देश मध आणि मेण इत्यादींद्वारे देशातील शेतकरी आणि ग्रामस्थांना उपजीविकेच्या नवीन संधी प्रदान करणे आणि उत्पन्न वाढवणे हा आहे.
अमोल म्हणतात, “ज्यांनी सुरवातीला मला टोमणे दिले, तेच शेतकरी आज माझ्या उपक्रमात सामील झाले आहेत. ते म्हणतात की, तुम्ही खूप पुढे जाल.” सुरुवातीला त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या बुरहानपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गुणवत्तेकडे लक्ष दिले नाही. यासाठी अमोल महाजन यांनी एक चर्चासत्र आयोजित करुन शेतकऱ्यांना फळांची निगा राखण्याविषयी मार्गदर्शन केले. अमोल महाजन स्वत: शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांच्या केळीच्या झाडांवर हीच प्रक्रिया अवलंबतात. दर महिन्याला ते पन्नास ते सत्तर शेतांवर जातात. अमोल म्हणतात, “माझ्यासोबत आल्यानंतर एका शेतकऱ्याने अंदाजे वीस हजार रुपयांची बचत केली आहे. आमचा दर बाजारापेक्षा फक्त एक रुपया जास्त आहे. गेल्या वर्षी आम्ही बुरहानपूर जिल्ह्यातून सहाशे वाहने भरली. शेतकऱ्यांची मध्यस्थांना दिली जाणारी रक्कम वाचवली. जवळपास तीनशे शेतकऱ्यांचे सुमारे एक कोटी एकतीस लाख रुपये वाचवले. याचा परिणाम असा आहे की इतर शेतकरी आमच्या मागे लागले आहेत. यावर्षी आमचे लक्ष्य तीनहजार वाहने पाठविण्याचे आहे.” अमोल महाजन यांची कंपनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठीही काम करीत आहे.