निसर्गसुंदर गुलाब
गुलाब हे वर्षभर मागणी असलेले एक सुंदर फुल आहे. युरोपात तर गुलाब विशेष लोकप्रिय आहे. जगभरात होणाऱ्या फुलांच्या उलाढालीत एकट्या गुलाबाचा वाटा हा ३५ ते ४० टक्के आहे. गुलाबाच्या जवळपास २० हजारहून अधिक जाती आहेत. गुलाब प्रेमाचे प्रतीक आहे. लग्नसमारंभ, वाढदिवस, धार्मिक कार्यक्रमात गुलाबास मोठा…
तीळ शेती
पदार्थांना रुचकर बनविणाऱ्या तिळाचे तेल स्वयंपाकासाठी वापरले जाते. तीळ आरोग्याच्या दृष्टीनेही उत्तम आहेत. सौंदर्यप्रसाधनातही हे तेल मोलाची भूमिका बजावते. तीळ लागवडीत राजस्थान अग्रेसर आहेच; परंतु महाराष्ट्रातही तिळाचे उत्पादन विशेषत्वाने घेतले जाते. खरीप हंगाम तीळ लागवडीसाठी सर्वात योग्य असल्याचे मानले जाते. या पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे तिळाची…
पदार्थाला तडका देणारी मोहरी
पदार्थाला तडका देऊन चव वाढविणारी मोहरी फोडणीच्या तेलात तडतडली की सुरेख वास दरवळतो. मोहरीला हिंदीत ‘राई’, ‘बनारसी राय’, ‘काले सरसों’ म्हणतात. गुजरातीत ‘राई’, काश्मिरीत ‘सरिसा’, तेलुगुमध्ये ‘अवलु’, तमिळमध्ये ‘कडुगो’, मल्याळममध्ये ‘ कडुकू’, तर कन्नडमध्ये ‘सावे’ या नावाने ओळखली जाते. भारत मोहरी तेलाच्या लागवडीत जगातील चौथ्या…
तीळ शेती
पदार्थांना रुचकर बनविणाऱ्या तिळाचे तेल स्वयंपाकासाठी वापरले जाते. तीळ आरोग्याच्या दृष्टीनेही उत्तम आहेत. सौंदर्यप्रसाधनातही हे तेल मोलाची भूमिका बजावते. तीळ लागवडीत राजस्थान अग्रेसर आहेच; परंतु महाराष्ट्रातही तिळाचे उत्पादन विशेषत्वाने घेतले जाते. खरीप हंगाम तीळ लागवडीसाठी सर्वात योग्य असल्याचे मानले जाते. या पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे तिळाची…
सूर्यफूल
सूर्याचे अनुसरण करून त्याच्या थेट किरणांच्या दिशेने वळत असल्याने या फुलास ‘सूर्यफूल’ म्हणतात. हे देशातील महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. हलका रंग, सौम्य चव आणि हृदयाच्या रुग्णांसाठी चांगले असणारे उच्च पातळीचे लिनोलिक ॲसिड यामुळे सूर्यफूल तेल सर्वात लोकप्रिय आहे. सूर्यफुलाच्या बियांमध्ये सुमारे ४८ ते ५३ टक्के…
आले शेती
आले हे आरोग्यदायी मसाल्यांपैकी एक आहे. आले पदार्थाची चव वाढवते, शिवाय हे आरोग्यदायी आहे. आल्याचा वापर मसाला, औषध, सौंदर्यवर्धक म्हणून केला जातो. हिवाळ्यात खोकला, सर्दी इत्यादींवरही याचा वापर होतो. आल्याचे तेल आणि पावडर औषधांमध्येही वापरले जाते. आल्याची शेती हा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर व्यवहार असून त्याच्या लागवडीत…
करडईची शेती
भारतात करडई पिकाची लागवड प्रामुख्याने तेलासाठी केली जाते. करडईच्या बियांमध्ये 24 ते 36 टक्के तेल आढळते. करडईचा वापर रंगात केला जातो. करडईपासून तयार केलेल्या रंगांची जागा सध्या कृत्रिम रंगांनी घेतली आहे. हे तेल स्वयंपाकासाठी वापरले जाते. साबण, रंग, लिनोलियम आणि त्यांच्याशी संबंधित पदार्थ तयार करण्यासाठी…
सोयाबीन शेती
सोयाबीन हे एक तेलबिया पीक आहे. सोयाबीनचे मूळ पूर्व-आशिया आहे; मात्र आता ते सर्वत्र उत्पादित केले जाते. सोयाबीनचा वापर तेल, जैवइंधन, रंग आणि इतर काही वापरासाठी देखील केला जातो. गृहिणी धान्यापासून पीठ बनविताना त्यात सोयाबीन आवर्जून टाकतात. त्यामुळे पोळी, भाकरी मऊसर होते. पाण्याचा चांगला निचरा…
मुगाची शेती
स्वच्छ सूर्यप्रकाश आणि उष्ण हवामानात जोमाने वाढणाऱ्या मुगाची लागवड शेतकरी करतात. मागील काही वर्षांमध्ये मुगाला चांगले दर मिळू लागले आहेत. पावसाळ्याबरोबरच उन्हाळ्यातही चांगली सिंचन व्यवस्था असल्यास मुगाची शेती करता येते. मूग पीक ६० ते ६५ दिवसांत पक्व होते. या काळात पाणी नियमित द्यावे लागते. उन्हाळी…
हरभरा शेती
हरभरा’ अर्थात ‘चणा’ हे सामान्यतः ‘बंगाल हरभरा’ म्हणून ओळखले जाणारे भारतातील सर्वांत महत्त्वाचे कडधान्य पीक आहे. चणा कडधान्याखालील सुमारे 35-40 टक्के क्षेत्र व्यापतो. भारताच्या एकूण डाळी उत्पादनात जवळपास 50 टक्के योगदान देतो. मानवी वापरासाठी, तसेच प्राण्यांचे खाद्य म्हणूनही हरभऱ्याचा उपयोग केला जातो. चण्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण…
अक्रोडची शेती
अक्रोड आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लोक स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, स्नायू तयार करण्यासाठी आणि स्वत:ला सक्रिय आणि उर्जेने परिपूर्ण ठेवण्यासाठी अक्रोड फळांचे सेवन करतात. बदाम, अक्रोड, बेदाणे, काजू असे ड्रायफ्रूट्स अनेक लोक रोज खातात. हा पोषक तत्वांचा खजिना आहे. पण ड्रायफ्रुट्स खाणे जास्त फायदेशीर आहे. त्यांच्याकडून मिळणारी…
बासमती तांदूळ लागवड
बासमती तांदूळ जगभरात प्रसिद्ध आहे, एवढेच नव्हे, तर जागतिक बाजारपेठेत या धान्याला मागणी आहे. भारत आणि पाकिस्तान हे देश बासमती तांदूळाचे जनक मानले जातात. भात हे जगातील महत्त्वाच्या अन्नधान्य पिकांपैकी एक आहे. जगात सुमारे 150 दशलक्ष हेक्टर आणि आशियामध्ये 135 दशलक्ष हेक्टरमध्ये भाताची लागवड केली…
मका शेती
मका हे उष्ण, समशीतोष्ण आणि थंड हवामानाशी समरस होणारे पीक आहे; मात्र पीकवाढीच्या कोणत्याही अवस्थेत धुके आल्यास ते या पिकास मानवत नाही. या पिकाच्या योग्य वाढीसाठी २५ ते ३० अंश से. तापमान चांगले असते; परंतु जेथे सौम्य तापमान आहे, अशा ठिकाणी मका वर्षभर घेता येतो….
तूर लागवड
तूर हे एक लोकप्रिय कडधान्य पीक असून प्रथिनांनी समृद्ध आहे. उष्णकटिबंधीय आणि अर्धउष्णकटिबंधीय प्रदेशात याची लागवड केली जाते. तूर लागवडीसाठी हलकी अल्कधर्मी, खोल आणि ओलसर माती लागते. तुरीचे बियाणे जून महिन्यात पेरणे आवश्यक असते. चांगल्या नांगरलेल्या जमिनीत या पिकाचे उत्पादन चांगले येते. कडधान्य पिकांचे क्षेत्रफळ…
ज्वारी लागवड
भारतातील ज्वारीच्या लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी 50% क्षेत्र महाराष्ट्रात आहे. देशातील एकूण ज्वारी उत्पादनापैकी 52% उत्पादन महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूमध्ये होते. ज्वारी हे खरीप आणि रब्बी पीक आहे. हे कोरडवाहू शेतीप्रकारातील सर्वात महत्वाचे अन्न आणि चारा पीक आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तर…
कमळ शेती
‘कमळ’ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे. अनेक औषधी आणि पौष्टिक गुणधर्मामुळे कमळाकडे व्यावसायिक दृष्टीने पाहिले जाते. भारतात गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची मनमोहक कमळाची फुले आढळतात. साधारणपणे कमळाच्या पाकळ्यांची संख्या 16 ते 36 पर्यंत असते. कमळात अनेक औषधी आणि पौष्टिक गुणधर्म आहेत. प्राचीन आयुर्वेदात मधुर, शीतल,…
सुगंधित सोनचाफा
सोनचाफा हे सर्वात लोकप्रिय फुलझाडांपैकी एक आहे. खोली सुगंधित करण्यासाठी, फुलांच्या हारात, तसेच धार्मिक समारंभांमध्ये, सुशोभिकरणासाठी या फुलांचा उपयोग केला जातो. जमिनीतील नायट्रोजनचे स्थिरीकरण करण्यासाठी हे झाड उपयुक्त आहे. या झाडाची पाने पालापाचोळा देतात. या झाडांमुळे जमिनीचा सामू सुधारतो. मातीतील सेंद्रिय कार्बन आणि फॉस्फरसचे प्रमाण…
विविधरंगी जास्वंद
विविध रंगांमधील जास्वंद फुलाची वनस्पती ही सुंदर आकर्षक फुलांच्या वनस्पतींपैकी एक आहे. मुळात जास्वंदीची फुले म्हटल्यावर डोळ्यासमोर लाल फुले यायची. आता विविध रंगांमध्ये आकर्षक फुले मिळतात. ग्रामीण भागात घरासमोर जास्वंदीची झाडे दिसतात. फुलांनी बहरलेली ही वनस्पती पाहताक्षणी मन वेधून घेते. देवपूजेत या फुलांना मोठा मान…
सफरचंद लागवड
सफरचंद हे आरोग्यदायी आणि चविष्ट असल्याने इतर फळांच्या तुलनेत सर्वाधिक खपणारे फळ आहे. जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, तामिळनाडू येथे या फळाची लागवड केली जाते. उच्च वापर आणि औषधी मूल्यांमुळे हे सर्वात फायदेशीर फळ पीक देखील मानले जाते. हे एक समशीतोष्ण फळ म्हणून…
सीताफळ लागवड
सीताफळ हे गोड फळ सर्वांच्या आवडीचे आहे. महाराष्ट्रात बीड, औरंगाबाद, परभणी आणि सोलापूर जिल्ह्यात ते घेतले जाते. बार्शीमध्ये ‘एनएमके-०१’ (गोल्डन) या उत्तम दर्जाच्या संकरित जातीची लागवड केली जाते. ‘लाल सीताफळ’, ‘बालानगरी’, ‘वॉशिंग्टन’ आणि ‘पुरंदर’ यांसारख्या इतर जातीसुद्धा प्रसिद्ध आहेत. बीडचे हे सर्वात प्रसिद्ध फळ आहे….
पपई लागवड
पपई हे एक उष्णकटिबंधीय फळ आहे. उच्च पौष्टिक आणि औषधी मूल्यामुळे या फळास व्यावसायिक महत्त्व आहे. पपईची लागवड ‘दक्षिण मेक्सिको’ आणि ‘कोस्टारिका’ येथे झाली. इतर फळपिकांपेक्षा ते लवकर उत्पादन नेते. एका वर्षापेक्षा कमी कालावधीत फळे देते. फळांचे उत्पादनही जास्त असते. ईशान्येकडील सर्व राज्यांच्या पायथ्याशी आणि…
कॉफी शेती
भारतातील कॉफी उत्पादनाचे दक्षिण भारतीय राज्यांच्या डोंगराळ प्रदेशात वर्चस्व आहे. यामध्ये कर्नाटकचा वाटा ७१% आहे. येथील एकट्या ‘कोडागु’ मध्ये भारतातील ३३% कॉफीचे उत्पादन होते. त्यानंतर २१% सह केरळ आणि तमिळनाडू ही दोन राज्ये आहेत. भारतीय कॉफी ही थेट सूर्यप्रकाशाऐवजी सावलीत उगवलेली जगातील सर्वोत्तम कॉफी असल्याचे…
गवती चहा
गवती चहा ही मुख्यतः युरोप, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका खंडातील उष्णकटिबंधीय तृणवर्णीय वनस्पती आहे. भारतात केरळ, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये गवती चहाचे पीक घेतले जाते. गवती चहा बारमाही प्रकारातील एक आरोग्यदायी गवत आहे. हलक्या ते भारी जमिनीत हे पीक घेतले जाते. पाणी साचून जमिनीचा निचरा होत नसेल अशा जमिनीत…
कोथिंबीर शेती
कोथिंबीरीची लागवड भारतातील बहुतेक सर्व राज्यात केली जाते. कोथिंबीरीला देशभरात वर्षभर मागणी असते. कोथिंबीरीची लागवड कोणत्याही हवामानात करता येते. अतिपावसाचा प्रदेश वगळता महाराष्ट्रातील हवामानात वर्षभर कोथिंबीरीची लागवड करता येते. उन्हाळयात तापमान 36 अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास कोथिंबीरीची वाढ कमी होते. कोथिंबीरीच्या पिकासाठी मध्यम कसदार आणि…
टरबूज लागवड
‘टरबूज’ हे मूळ दक्षिण आफ्रिकेतील फळ आहे. टरबूजाच्या रसामध्ये प्रथिने, खनिजे आणि कार्बोहायड्रेट्ससह 92% पाणी असते. जपानमध्ये काचेच्या पेटीत टरबूज वाढवतात. टरबूजांची लागवड प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये केली जाते. टरबूज खोल, सुपीक आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत चांगले वाढते….