
प्रदूषण, अस्वास्थ्यकर आहार, निष्क्रिय जीवनशैली अशा अनेक कारणांमुळे आपल्या त्वचेची चमक कमी होऊ लागते. या सगळ्याशिवाय हिवाळ्यात आपली त्वचा अधिक कोरडी आणि निर्जीव बनवते. त्यामुळे आपण आपल्या त्वचेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्वचेच्या काळजीमध्ये आहार खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. काही खाद्यपदार्थ आहेत, ज्यांचा आहारात समावेश केल्याने त्वचेला नैसर्गिक चमक येऊ शकते. काही खाद्यपदार्थ आपली त्वचा चमकदार बनवू शकतात. बीटरूट : ही लाल रंगाची कंदमुळांची भाजी तुमचे गाल नैसर्गिकरित्या गुलाबी बनवू शकते. आपली त्वचा सुधारू शकते. बीटरूटमध्ये मुबलक प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट आढळतात. ते त्वचेला फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवतात. यामुळे रक्त शुद्ध होण्यासही मदत होते. त्यामुळे शरीरातून विषारी पदार्थ बाहेर जातात, आणि मुरुमांची समस्या कमी होते.
बदामामध्ये अनेक पोषकतत्वे असतात, जी त्वचा चमकदार बनविण्यास मदत करतात. बदामामध्ये जीवनसत्व ई आढळतात. ते सुरकुत्या आणि काळे डाग कमी करण्यास मदत करतात. त्यात अँटी-ऑक्सिडंट्स आणि फॅटी अॅसिड्सदेखील आढळतात, जे त्वचेला फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवतात. त्वचेची आर्द्रता कमी करण्यास मदत करतात. वृद्धत्वाच्या समस्या कमी होतात. अँटी-ऑक्सिडंट्स फ्री रॅडिकलचे नुकसान आणि काळे डाग कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत.
गाजरामध्ये जीवनसत्व ‘ए’ असते. हे नवीन पेशी तयार करण्यासाठी आणि जुन्या पेशी काढून टाकण्यासाठी आवश्यक असते. गाजर कोलेजन तयार करण्यास देखील मदत करते. ज्यामुळे वृद्धत्वाची समस्या कमी होऊन त्वचा चमकते. गाजर त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करते. मुरुमांपासून देखील संरक्षण करते. संत्री, मोसंगी, लिंबू इत्यादी लिंबूवर्गीय फळांमध्ये जीवनसत्व सी मुबलक प्रमाणात आढळते. ते आपल्या त्वचेला ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून वाचवते. याव्यतिरिक्त, अँटी-ऑक्सिडंट्सच्या उपस्थितीमुळे ही फळे आपली त्वचा उजळ करण्यास, नवीन पेशी निर्माण करण्यास आणि मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करतात.