श्री क्षेत्र कपिलधार


बीड जिल्ह्यात श्री क्षेत्र कपिलधार हे एक निसर्गरम्य तीर्थक्षेत्र आहे. कपीलधार येथे मन्मथस्वामी यांची संजीवन समाधी आहे. या समाधीला 459 वर्षे पूर्ण झाली आहेत. हे क्षेत्र वीरशैव समाजाचे श्रद्धास्थान आहे.
येथील धबधबा पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. हा धबधबा ‘कपिलधार धबधबा’ म्हणूनच ओळखला जातो. तुलसीविवाहाच्या वेळी येथे पाच दिवस यात्रा भरते. बीड शहरापासून १९ किलोमीटर अंतरावर मांजरसुंभा हे गाव आहे.
पावसाळ्याच्या दिवसात कपिलधार धबधब्यावर पर्यटक तसेच भाविकांची मोठी गर्दी असते. कार्तिकी पौर्णिमेला येथे महोत्सव असतो. माघ शुद्ध पंचमीला स्वामींचा जन्मोत्सव व फाल्गुन चतुर्थीला समाधीस्थ झालेला दिवस असतो. श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी येथे मोठी यात्रा असते.
या पर्यटनक्षेत्राला पर्यटन विभागाचा ‘ब’ दर्जा मिळाला आहे. मन्मथस्वामी यांनी मानूर मठ येथे बसवराज शिवाचार्य महाराज यांच्याकडे विद्याभ्यास पूर्ण केला. त्यांनी वीरशैव धर्माचा प्रचार महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक अशा राज्यात केला.
हे मंदिर सकाळी 5 ते रात्री १० वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले असते. सकाळी महापूजा करताना महाभोगात श्रीफळ, भात अशा प्रसाद असतो. दुपारी आरती होते. भाविकांना प्रसाद म्हणून भात दिला जातो. संध्याकाळी शिव भजन होऊन रात्री दहा वाजता मंदिर बंद केले जाते. मुंबईहून हे स्थळ 470 किलोमीटर व पुण्याहून 320 किलोमीटरवर आहे.