हेदवीचा सागरकिनारा
शांत, रम्य असणारा रत्नागिरीच्या गुहागरजवळचा किनारा म्हणजे ‘हेदवीचा सागरकिनारा’ होय. हा किनारा आकर्षक आहेच; शिवाय किनाऱ्यावरच सुंदर असे ‘उमामहेश्वर मंदिर’ आहे. हेदवी समुद्र किनाऱ्याचा खडकाळ भाग सुरु होतो, तिथेच हे मंदिर आहे. या मंदिरामागे एक झरा आहे. येथे बसून शांतपणे समुद्राची गाज ऐकता येते. सभामंडपाच्या…
मलंगगड किल्ला
ठाणे जिल्ह्याच्या दक्षिणेला सुमारे 15 कि.मी. अंतरावर ‘मलंगगड’ किल्ला आहे. एका उंच डोंगरावर शिलाहार राजाने हा किल्ला बांधलेला असून तो पनवेल-वरुण-वावंजे गावापासून २ कि.मी.च्या अंतरावर आहे. हा भाग एकेकाळी लढाईच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा होता. मलंगगड हे धार्मिक स्थान आहे. ते ‘श्री मलंग’ किंवा ‘हाजी मलंग’…
नांदूरमधमेश्वर अभयारण्य
नांदूर मधमेश्वेर हे पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे. पक्ष्यांच्या किलबिलाटाने हा परिसर अगदी मंत्रमुग्ध झालेला असतो. त्यांच्या हालचाली, त्यांचे मंजूळ आवाज आणि एकंदरच निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी येथे पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. या अभयारण्यात स्थानिक पक्ष्यांबरोबर विदेश पक्षीही पाहता येतात.हिमालय, काश्मीर, युरोप खंड, श्रीलंका, म्यानमार,…
महाराष्ट्रातील तळाशील किनारा
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक सागरकिनारे आहेत. यातील काही किनारे आपल्याकडे गर्दी खेचून आणतात, तर काही किनारे आपल्याच मस्तीत एकांतात दिसतात.येथील प्रत्येक किनारा अनुपम आहे. मालवणमधील ‘तळाशील किनारा’ हा देशातील सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. मालवणात मोठ्या संख्येने पर्यटक येत असले, तरीही या किनाऱ्यावर फारशी गर्दी दिसत…
कुणकेश्वर मंदिर
महाराष्ट्रातील सिंधुदुर्गात देवगडमध्ये असलेले कुणकेश्वर मंदिर सुप्रसिद्ध आहे. शिवशंभूचे हे देवस्थान भाविकांनी नेहमी गजबजलेले असते. हे मंदिर सागरकिनाऱ्यावर आहे. सागराच्या खळाळणाऱ्या लाटा भाविकांना पर्यटनाचाही मनमुराद आनंद देतात. येथे भाविकांना शांततेचा अनुभव मिळतो. हे मंदिर समुद्रकिनाऱ्यावर असल्यामुळे मंदिराची उभारणी 10 मीटर दगडी भिंतीने मजबूत केली आहे….
भांगसी गड
छत्रपती संभाजीनगर शहरापासून १६ किमी अंतरावर अजिंठा डोंगररांगेपासून वेगळा झालेला एक लहानसा डोंगर आहे. या डोंगरावर कातळात कोरलेला ‘भांगसी गड’ हा सुंदर किल्ला आहे. या किल्ल्यावरील कातळात कोरून काढलेल्या भुयारात असलेल्या भांगसाई देवी मंदिरामुळे औरंगाबाद परिसरातील लोक या गडाला ‘भांगसाई गड’ या नावानेही ओळखतात. भांगसाई…
मयूर अभयारण्य
महाराष्ट्रातील बीडमध्ये असलेले नायगावचे मयूर अभयारण्य म्हणजे पक्षीप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. पहाटे पाच-साडेपाचला अभयारण्याजवळच्या नायगाव रस्त्यावरून गेल्यास दुतर्फा मोर-लांडोरांच्या लक्षवेधी जोड्या डोळ्यांना सुखद आनंद देतात. येथे मोरांची संख्या खुप मोठी आहे. त्यामुळेच या अभयारण्याला ‘मयूर अभयारण्य’ असे नाव देण्यात आले आहे. येथे १०० हून अधिक…
मुंबईतील ग्लोबल विपश्यना पॅगोडा
मुंबई हे शहर गजबजाट आणि उंच उभ्या असलेल्या वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. मुंबईच्या गजबजाटापासून दूर असलेली आणि खासगीरित्या विकसित केलेली ‘ग्लोबल विपश्यना पॅगोडा’ ही वास्तू गौतम बुद्धांच्या शिक्षण व ध्यान स्वरूपावर केंद्रित आहे. हे सुप्रसिद्ध विपश्यना ध्यान गुरु आचार्य एस.एन.गोयंका यांची प्रेरणा आहे. भारतातील बौद्ध धर्माच्या…
वसईतील सुरूची समुद्र किनारा
वसईतील सुरूची समुद्र किनारा हा सुरूची बीच म्हणून प्रसिद्ध आहे. सुरुची बीच हा एक पर्यावरणास अनुकूल आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे. वसई नगर मध्ये स्थित, सुरुची बीच हा समुद्रकिनार्यावरील प्रेमींसाठी एक उत्तम पर्याय आहे ज्यांना जीवनातील रोजच्या धावपळीपासून दूर वेळ घालवायला आवडते. हे ठिकाण आश्चर्यकारक सूर्यास्त…
मकरंदगड किल्ला
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात पुण्यापासून १५६ किमी अंतरावर ‘मकरंदगड’ किल्ला आहे.किल्ल्याच्या पायथ्याचे गाव घोणसपूर हे प्रतापगडापासून २७ किमी अंतरावर आहे. प्रतापगड किल्ल्याजवळील प्रसिद्ध जावळीच्या जंगलात हा किल्ला आहे. ‘हातलोट’ आणि ‘घोणसपूर’ गावातून किल्ल्यावर जाता येते. हा किल्ला इसवी सन १६५६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड बांधतानाच…
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान
मुंबईच्या मध्यवर्ती भागात 60 एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर पसरलेले वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात ‘राणीची बाग’ हे देशाच्या आर्थिक राजधानीतील सर्वात जुने सार्वजनिक उद्यान आहे. सन 1861 मध्ये या उद्यानाची निर्मिती करण्यात आली. मुंबईतील या आकर्षक ठिकाणाला भारताच्या तत्कालीन सम्राज्ञी राणी व्हिक्टोरियाचे नाव देण्यात आले. त्यामुळे…
समर्थ रामदास स्वामी स्थापित मारुती
समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रात मारुती मंदिरांची स्थापना केली. यापैकी सातारा जिल्ह्यात ७ मारुती मंदिर आहेत. लोकांमध्ये परस्परांविषयी आत्मियता निर्माण करण्यासाठी रामजन्म आणि हनुमान जन्म सोहळे सुरु झाले. ही मंदिरे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी असते. या मंदिरातील हनुमंताच्या मुर्त्या वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगवेगळ्या आहेत. या मंदिरांमध्ये रामजन्म तसेच…
मालगुंडचा किनारा
रत्नागिरीतील ‘गणपतीपुळे’ समुद्रकिनाऱ्यापासून अवघ्या 1 किलोमीटरवर असलेले एक छोटे आणि मनोहर असे ‘मालगुंड’ गाव आहे. प्रसिद्ध मराठी कवी केशवसुत यांचे हे जन्मस्थान आहे. अशा या मालगुंडचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील नयनरम्य, विस्तीर्ण असा स्वच्छ समुद्रकिनारा आहे. हा किनारा नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध आहेच; सोबत जलक्रीडा,…
केंजळगड किल्ला
केंजळगड किल्ला हा सातारा जिल्ह्यातील वाई येथे आहे. हा किल्ला महादेव डोंगररांगेतील मांढरदेव डोंगरावर वसलेला आहे. जुन्या रायरेश्वराच्या जवळ असलेला हा केंजळगड भोर गावापासून थोड्याच अंतरावर असणारा एक आगळावेगळा असा छोटेखानी किल्ला आहे. वाई आणि रायरेश्वर दरम्यानच्या एका उत्तुंग शिखरावर हा किल्ला वसलेला आहे. उभ्या…
ताम्हिणी अभयारण्य
ताम्हिणी अभयारण्य हे पुण्यापासून 70 कि.मी अंतरावर आहे. मनावर मोहिनी घालणारे असे अप्रतिम निसर्गसौंदर्य येथे पाहता येते. मुंबई-गोवा मार्गाने ‘कोलाड’पर्यंत गेल्यावर पुढे ‘कुंडलिका’ नदी मिळते. तिच्यावर बांधलेला पूल ओलांडला की डाव्या बाजूने मुळशी धरण आहे. कोलाड आणि मुळशी धरणाच्या मधल्या भागात ताम्हिणी घाट असून याच…
दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर
महाराष्ट्रात पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर प्रसिद्ध आहे. येथे भाविकांची नेहमी गर्दी असते. हे मंदिर श्री दगडूशेठ हलवाई आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांनी बांधले होते. स्थापनेपासून हे मंदिर गणपती उत्सव मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा करीत आहे. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यलढ्यात लोकांना एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणपती…
केळशीचा किनारा
रत्नागिरीतील दापोलीपासून जवळ असणारा केळशीचा समुद्रकिनारा अप्रतिम आहे. सुट्टीचे दिवस मनमुराद व्यतीत करण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. कोकणातील खऱ्या ग्रामीण जीवनाचा अनुभव घ्यायचा असेल, तर केळशी हे उत्तम ठिकाण आहे. केळशी समुद्रकिनारा २.५ किलोमीटर पसरलेला असून येथून सूर्यास्त पाहणे प्रेक्षणीय आहे. येथील ‘महालक्ष्मी मंदिर’ आणि…
कमळगड किल्ला
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात कमळगड किल्ला आहे. शिवराज्याभिषेकाच्या आधी कमळगड स्वराज्यात सामील झाला. या गडाचे दुसरे नाव ‘भेळंजा’ असे आहे. एप्रिल १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. धोम धरणाच्या जलाशयाच्या मागील बाजूने असलेल्या डोंगररांगेवर हा किल्ला आहे. सर्वसाधारण किल्ल्यांवर असणारे तट-बुरूज असे कोणते अवशेष या…
रत्नागिरीतील मांडवी
महाराष्ट्रातील रत्नागिरी शहरात पश्चिमेला रत्नदुर्ग किल्ला असलेला ‘मांडवी’ हा रत्नागिरीतील सर्वात गजबजलेला समुद्रकिनारा आहे. ही किनारा विस्तीर्ण आणि सुंदर असून ‘राजिवंडा’ बंदरापर्यंत आहे. या किनाऱ्यावरील वाळू काळी आहे. त्यामुळे याला ‘काळा समुद्र’ देखील म्हणतात. येथे गेल्यावर रत्नदुर्ग किल्ला पाहू शकता. येथे सूर्यास्ताचे मनोहारी दर्शन होते….
कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर
महाराष्ट्रातील कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदिर हे ‘अंबाबाई मंदिर’ म्हणूनही ओळखले जाते. हे देवी स्थानिक लोक ‘अंबाबाई’ म्हणून हिचे पूजन करतात. भारतातील हे मंदिर हिंदू धर्मातील विविध पुराणांमध्ये सूचीबद्ध केलेल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असून कोल्हापूर शहरात ‘पंचगंगा’ नदीच्या काठावर आहे. कोल्हापूरचे प्राचीन नाव पुराणात ‘अविमुक्तक्षेत्र’ असे…
नागाव समुद्रकिनारा
नागाव’ हे अलिबागजवळ एक सुंदर समुद्रकिनारा असलेले एक छोटेसे गाव आहे. महाराष्ट्रात रायगड जिल्यातील अलिबागमधील इतर समुद्रकिनाऱ्यांपेक्षा ‘नागाव’ येथील समुद्रकिनारा प्रामुख्याने वालुकामय आहे. नागाव हा पांढऱ्या आणि काळ्या वाळूच्या मऊ मिश्रणासह सपाट आणि विस्तीर्ण किनारा आहे. पाण्यात डुंबण्यासाठी हा सुरक्षित समुद्रकिनारा आहे. नागाव समुद्रकिनाऱ्याच्या सभोवतालचे…
जंगली जयगड किल्ला
सातारा जिल्यातील ‘पाटण’ तालुक्यात ‘जंगली जयगड’ला जाण्यासाठी पायथ्याचे गाव म्हणजे ‘नवजा’ आहे. येथे जाण्यासाठी कोयनानगर येथून सकाळी बस आहे. ‘नवजा’ हे ‘शिवसागर’ जलाशयाच्या काठावर वसलेले सुंदर आणि रमणीय असे गाव आहे. नवजा गावातून साधारणतः दीड ते दोन तासात पायी चालत गडावर जाणाऱ्या पायवाटेजवळ जाऊन पोहोचाल….
यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य
‘यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य’ हे महाराष्ट्रातील लहान अभयारण्यापैकी एक आहे. सांगली जिल्ह्यातील ‘वाळवा’ तालुक्यात ‘कृष्णा’ नदीच्या खोऱ्यात असलेले हे अभयारण्य सागरोबा डोंगरावर वसले आहे. सन १९८५ मध्ये या वनक्षेत्राला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. धो.म. मोहिते या वनस्पती आणि वन्यजीवप्रेमीच्या ध्यासातून हे अभयारण्य साकारले आहे….
विरारचे जीवदानी मंदिर
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात विरार येथे ‘जीवदानी’ टेकडीवर ‘जीवदानी’ देवीचे प्रसिद्ध प्राचीन मंदिर आहे. इसवी सन १७ व्या शतकात या टेकडीवर ‘जीवधन’ नावाचा किल्ला होता. या तटबंदीच्या आत काही प्राचीन दिसणाऱ्या गुहा आणि पाण्याच्या टाक्या आहेत. हे मंदिर ‘वैतरणा’ नदीच्या काठावर आणि सातपुडा डोंगराळ भागात आहे….
वर्सोली समुद्रकिनारा
अलिबागमधील वर्सोली समुद्रकिनारा हे एक नयनरम्य ठिकाण आहे. हा किनारा निर्जन नाही; परंतु अपेक्षित असणारी शांतता प्रदान करतो. पांढरीशुभ्र वाळू आणि स्वच्छ पाणी हे येथील खास वैशिष्ट्य आहे. या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची संख्या कमी असते; परंतु शनिवार-रविवार हे 2 दिवस निसर्गाच्या सान्निध्यात घालवू इच्छिणाऱ्यांसाठी हे एक…