नवश्या गणपती मंदिर
श्री नवश्या गणपती मंदिर हे नाशिकमधील गंगापूर रोडवरील आनंदवल्ली भागात, पवित्र गोदावरी नदीच्या काठावर वसलेले एक अत्यंत प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान आहे. या मंदिराचा इतिहास सुमारे तीनशे ते चारशे वर्षांपूर्वीचा आहे. हे मंदिर पेशवेकालीन स्थापत्यकलेचा एक महत्त्वाचा नमुना आहे. १७७४ मध्ये, राघोबा दादा पेशवा आणि…
खवणे सागरकिनारा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहराजवळ वसलेला खवणे सागरकिनारा हा कोकणातील सर्वात शांत, स्वच्छ आणि नयनरम्य किनाऱ्यांपैकी एक मानला जातो. डोंगररांगांनी वेढलेला हा किनारा, निळ्या समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा आणि उंचच उंच नारळांची रांग यामुळे पाहताक्षणी मन मोहून टाकतो. अनेक लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांप्रमाणे येथे गर्दी नसल्याने खऱ्या अर्थाने शांतता…
प्राचीन कोकण संग्रहालय
प्राचीन कोकण हे गणपतीपुळे येथे वसलेले एक अनोखे आणि महत्त्वपूर्ण संग्रहालय आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील या संग्रहालयात आपल्याला गेल्या काही शतकांतील कोकणी जीवनशैली, संस्कृती आणि इतिहासाचे जिवंत दर्शन घडते. प्राचीन कोकण संग्रहालय महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे आहे. हे गणपतीपुळे मंदिरापासून फक्त एक किलोमीटर…
धारूर किल्ला
मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात वसलेले धारूर हे प्राचीन काळापासून व्यापारी देवाणघेवाणीचे महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. या भागाचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रकूटांनी येथे उभारलेला किल्ला त्या काळातील रणनीतीची आणि स्थापत्यकलेची साक्ष देतो. ‘महादुर्ग’ या नावाने ओळखला जाणारा हा गड साध्या दगडी रचनेत बांधला गेला असल्याने त्याला प्राचीन…
पुण्यातील रामदरा मंदिर
पुणे शहरापासून जवळच, पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर गावाजवळ वसलेले रामदरा मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून, ते निसर्गरम्य शांतता आणि प्राचीन वारसा यांचे एक अनोखे मिश्रण आहे. हे मंदिर भाविक आणि निसर्गप्रेमी अशा दोघांनाही आकर्षित करते. रामदरा मंदिर एका शांत आणि घनदाट वृक्षराजीने नटलेल्या…
आरवी समुद्रकिनारा
आरवी समुद्रकिनारा हा महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात, दिवेआगर आणि श्रीवर्धन यांच्या मधोमध वसलेला एक शांत, स्वच्छ आणि निसर्गरम्य किनारा आहे. कोकण किनारपट्टीच्या सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी हे एक आदर्श ठिकाण आहे. आरवी बीच त्याच्या काही खास वैशिष्ट्यांमुळे कोकणातील इतर समुद्रकिनाऱ्यांपेक्षा वेगळा ठरतो. आरवी किनाऱ्याची वाळू…
रत्नागिरीचा थिबा राजवाडा
रत्नागिरी शहरात स्थित असलेला थिबा राजवाडा ही एक ऐतिहासिक आणि स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण वास्तू आहे. ब्रिटीश राजवटीने बर्मा, जे सध्या म्यानमार म्हणून ओळखले जाते. येथील राजा थिबा मिन याला नजरकैदेत ठेवण्यासाठी हा राजवाडा बांधला होता. हा राजवाडा राजा थिबाच्या शोकांतिकेचा आणि भारतामध्ये आलेल्या एका परदेशी…
रेवदंडा किल्ला
मुंबईपासून जवळच असलेले रेवदंडा हे ऐतिहासिक काळापासून एक महत्त्वाचे बंदर राहिले आहे. या ठिकाणी असलेला रेवदंडा किल्ला हा सोळाव्या शतकात बांधण्यात आलेला आहे. या किल्ल्याच्या तटबंदीवरून आजूबाजूच्या परिसराचे आणि अथांग समुद्राचे अतिशय सुंदर आणि विहंगम दृश्य दिसते. विशेषतः सूर्यास्त पाहण्यासाठी हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे….
नरसी मंदिर
संत नामदेव महाराज हे महाराष्ट्रातील एक महान भक्त, कवी आणि कीर्तनकार होते. त्यांचा जन्म इ.स. १२७० शके ११९२ मध्ये हिंगोली जिल्ह्यातील नरसी- बामणी या गावी झाला. त्यांचे मूळ नाव दामाजी रेलेकर होते. संत नामदेवांचे जीवन भक्तिरसाने आणि विठोबाच्या भक्तीने भरलेले होते. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला…
नांदगाव समुद्रकिनारा
रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा किल्ल्याजवळ वसलेले नांदगाव हे कोकणातील एक सुंदर व शांत गाव आहे. येथे असलेला नांदगाव समुद्रकिनारा हा लांबच लांब पसरलेला, पांढऱ्या वाळूमुळे आकर्षक दिसणारा आणि गर्दीपासून दूर असा किनारा आहे. अलिबागपासून सुमारे पन्नास किलोमीटर व मुंबईपासून अंदाजे एकशे पन्नास किलोमीटर अंतरावर असल्याने मुंबई…
सेमिनरी हिल्स
सेमिनरी हिल्स हे नागपूर शहराच्या पश्चिमेस सुमारे सहा किमी अंतरावर वसलेले एक निसर्गरम्य डोंगररांगा असलेले ठिकाण आहे. हे ठिकाण निसर्गप्रेमी, ट्रेकर्स, फोटोग्राफर्स आणि भक्तांसाठी आदर्श ठिकाण मानले जाते. सेमिनरी हिल्सचे नाव ‘सेंट चार्ल्स सेमिनरी’ या धार्मिक शिक्षण संस्थेवरून पडले आहे, जी ब्रिटिश काळात येथे स्थापन…
रांगणा किल्ला
रांगणा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात, महाराष्ट्र–गोवा सीमेवर वसलेला आहे. तो समुद्रसपाटीपासून सुमारे दोन हजार दोनशे पन्नास फूट उंचीवर आहे. सह्याद्री पर्वतरांगांतील हा एक महत्त्वाचा व उंच गड मानला जातो. किल्ल्यावरून कोकण किनारपट्टी, गोवा भाग आणि आजूबाजूचा डोंगर परिसर नजरेत भरतो. ऐतिहासिक महत्त्व : या…
हिरण्यकेशी मंदिर
हिरण्यकेशी मंदिर हे महाराष्ट्रातील शांत आणि निसर्गरम्य आंबोली गावात वसलेले एक पवित्र मंदिर आहे, जे शंकराला समर्पित आहे. हे मंदिर फक्त धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्वासाठीच नाही तर त्याच्या नयनरम्य परिसरासाठीही प्रसिद्ध आहे. मंदिर हिरण्यकेशी नदीच्या उगमाजवळ स्थित आहे, जी पश्चिम घाटातील हिरवळीतून सुंदर प्रवाहाने वाहते….
संत राऊळ महाराज मठ
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्री संत राऊळ महाराजांचा छानसा मठ आहे. सन 1905 मध्ये कोजागिरी पौर्णिमेला हे सिद्धपुरुष जन्मास आले. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावात एका गरीब शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. 4 भाऊ आणि 4 बहिणींमध्ये ते सर्वात मोठे होते. त्यांचे वडील अप्पा राऊळ आणि आई…
अलिबाग समुद्रकिनारा
अलिबाग समुद्रकिनारा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अलिबाग या किनारी शहरामध्ये असलेले एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. हे मुंबईपासून ३० किमी अंतरावर असून शहरात राहणाऱ्या लोकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. हा समुद्रकिनारा स्वच्छ वाळू आणि उथळ पाण्यासाठी ओळखला जातो. पोहण्याबरोबरच सूर्यस्नानासाठी हे एक आदर्श स्थान बनले आहे….
रसाळगड किल्ला
रसाळगड हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. सह्याद्रीला समांतर जाणाऱ्या डोंगररांगेच्या दक्षिण टोकावर हा किल्ला आहे. हा किल्ला सुमारे ५ एकर परिसरात पसरलेला आहे. किल्ल्यावर ‘सोलाई’ आणि ‘वाघाई’ या दोन देवींची मंदिरे आहेत. गडावर सुरेख कोरीवकाम आहे. किल्ल्याच्या उत्तर-पश्चिम बाजूस एक जुनी वास्तू आणि पाण्याची…
गौताळा अभयारण्य
महाराष्ट्रात औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर ‘गौताळा’ अभयारण्य वसलेले आहे. औरंगाबादपासून 65 कि.मी अंतरावर असलेले हे अभयारण्य जैवविविधतेने संपन्न आहे. विविध प्रजातींची हिरवीगर्द वृक्षराजी, मुक्त संचार असणारे विविध प्राणी आणि किलबिलणाऱ्या पक्ष्यांचा अधिवास असलेले 261 चौ.कि.मी.चे हे क्षेत्र महाराष्ट्र शासनाने दि. 25 फेब्रुवारी 1986 रोजी…
चंद्रपूरचे श्री महाकाली मंदिर
चंद्रपूरमधील महाकाली मंदिर हे ताडोबातील एक प्रेक्षणीय धार्मिक स्थळ आहे. हे चंद्रपूर शहराचे भूषण आहे. महाकाली मंदिरात दररोज भाविकांची गर्दी असते. मंगळवारी विशेष गर्दी असते. महाकाली मंदिरात जाण्यासाठी दोन प्रवेशद्वार आहेत. मागील प्रवेशद्वाराजवळ श्री गणेश आणि हनुमान मंदिर आहे. दोन्ही प्रवेशद्वारांवर पूजेचे समान मिळणारी छोटी…
मोचेमाड समुद्रकिनारा
मोचेमाड हा समुद्रकिनारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात आहे. अत्यंत मनमोहक असा हा किनारा पर्यटकांच्या गर्दीपासून लांब आहे. या किनारपट्टीवर सुमारे २०० फूट उंचीपर्यंतच्या आकाराच्या लहानमोठ्या टेकड्या आहेत. स्वच्छ व सुंदर सागरी किनार्याबरोबरच पांढरीशुभ्र वाळू हे या किनारपट्टीचे वैशिष्ट्य आहे. या परिसरात किनार्यांवरील लाटा व सागरी…
चंदेरी किल्ला
ठाणे जिल्ह्यातील माथेरान डोंगररांगेत चंदेरी किल्ला आहे. हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील असून ट्रेकर्सच्या दृष्टीने अवघड समजला जातो. मुंबई-पुणे लोहमार्गावरून कल्याणहून कर्जतकडे जाताना एक डोंगररांग आहे. त्या डोंगरावर चंदेरीचा हा मोठा सुळका दिसतो. बदलापूर-कर्जत रस्त्यावर गोरेगाव नावाचे गाव असून येथूनच या चंदेरी किल्ल्याची वाट आहे. चंदेरीच्या…
अंबाबरवा अभयारण्य
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात अंबाबरवा अभयारण्य विसावलेले आहे. इंग्रज काळापासून हे थंड हवेचे ठिकाण म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राचा प्रसिद्ध मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा गुगामल राष्ट्रीय उद्यान, मेळघाट वन्यजीव अभयारण्य, नर्नाळा वन्यजीव अभयारण्य, वान वन्यजीव अभयारण्य आणि अंबाबरवा वन्यजीव अभयारण्य मिळून अस्तित्वात आला आहे. अंबाबरवा अभयारण्यात…
नाशिकचे कपालेश्वर महादेव मंदिर
नाशिक शहरातील प्रसिद्ध ‘पंचवटी’ परिसरात गोदावरीच्या काठी ‘कपालेश्वर महादेव मंदिर’ आहे. येथे भगवान शिव वास करीत होते, असे पुराणात म्हटले आहे. भगवान शंकरासमोर नंदी नसणारे हे देशातील पहिले मंदिर आहे. या मंदिराला खूप महत्त्व आहे. या मंदिराचे निर्माण बारा ज्योतिर्लिंगानंतर असल्याचे मानले जाते. या टेकडीवर…
कुणकेश्वर सागरकिनारा
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुणकेश्वर सागरकिनारा हे एक सुंदर ठिकाण आहे. येथील प्राचीन शिवमंदिरामुळे या किनाऱ्यास धार्मिक अधिष्ठान लाभले आहे. हा भाग स्वच्छ आणि वालुकामय किनारे तसेच डोंगराळ परिसरासाठी ओळखला जातो. स्वच्छ पांढरी वाळू व नयनरम्य दृश्यांसह लांब-स्वच्छ समुद्रकिनारा डोळ्यांना न्याहाळता येतो. आपल्या प्रियजनांसोबत दर्जेदार वेळ…
माहिमचा किल्ला
मुंबईत माहिमच्या खाडीजवळ माहिमचा किल्ला आहे. किल्ल्याच्या दक्षिणेला वरळी असून उत्तरेला वांद्रे आहे. सभोवतालच्या झोपडपट्ट्या व सततच्या अतिक्रमणामु़ळे हा किल्ला सध्या सुस्थितीत नाही. पोर्तुगीज अधिकारी दे मोनो याने माहीमच्या खाडीत प्रवेश करून माहीमचा किल्ला जिंकून घेतला. या किल्ल्याच्या ताब्यासाठी गुजरातचा अली शाह आणि पोर्तुगीजांमध्ये खूप…
भामरागड अभयारण्य
समृद्ध निसर्गसंपदा, हेमलकसाचा ‘लोकबिरादरी प्रकल्प’, बाबा आमटेंचा ‘आनंदवन’ आश्रम अशी प्रेक्षणीय स्थळे पाहण्याची इच्छा असणाऱ्यांनी भामरागड अभयारण्याला भेट द्यायला हवी. येथील स्थानिक ‘गोंड’ आणि ‘माडिया’ जमातीच्या आदिवासींची संस्कृती मन भारावून सोडते. चंद्रपूर जिल्ह्यात हे अभयारण्य आहे. याचे राखीव वनक्षेत्र १०४.३८ चौ.किमी. इतके आहे. विविध प्रकारचे…