धूतपापेश्वर मंदिर
रत्नागिरी जिल्ह्यात राजापूरमध्ये धूतपापेश्वर मंदिर आहे. धोपेश्वर गावात असणारे हे प्रसिद्ध शिवमंदिर राजापूर शहरापासून सुमारे ५ किलोमीटरवर अंतरावर आहे. प्रत्येक सोमवारी आणि महाशिवरात्रीला येथे प्रचंड गर्दी होते.हे मंदिर ‘मृडानी’ नदीच्या काठावर आहे. मंदिराच्या सभोवतालचा परिसर अतिशय रम्य असून हे मंदिर प्राचीन आहे. प्रशस्त सभामंडप, अंतर्गृह,…
सिंधुदुर्गातील निवती किनारा
सिंधुदुर्गातील निवती हा एक अप्रतिम समुद्रकिनारा आहे. कुडाळपासून साधारण २५ किमी वर निवतीचा किनारा आहे. अतिशय निसर्गरम्य ठिकाणी तसेच माडा-पोफळीच्या सहवासात असलेल्या ‘निवती’ या गावाकडील समुद्रकिनारा पर्यटकांना आकर्षित करतो. येथे डॉल्फिन माशांना बघण्यासाठी देशी-विदेशी पर्यटकांची रेलचेल असते. सकाळी आकाश निरभ्र असेल तर सुर्योदयाची छान छायाचित्रे…
पद्मदुर्ग किल्ला
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात ‘पद्मदुर्ग’ ऊर्फ ‘कासा’ हा एक जलदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला ‘मुरूड’ गावाजवळील समुद्रात आहे. ‘मुरुड’ हे रायगड जिल्ह्यामधील तालुक्याचे गाव आहे. या किल्ल्याच्या तटबंदीवरून ‘जंजिरा’ आणि ‘सामराजगड’ किल्ले दिसतात. तसेच येथून मुरूडचा किनाराही उत्तम दिसतो.‘राजपुरी’ खाडीच्या मुखापाशी जंजिऱ्याच्या वायव्येला…
गुगामल राष्ट्रीय उद्यान
गुगामल राष्ट्रीय उद्यान’ हे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात स्थित असलेल्या भारतातील प्रमुख राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे. हे उद्यान मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे. सन 1973-74 मध्ये हे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले. ‘मेळघाट व्याघ्र प्रकल्पा’चा एक भाग म्हणून ‘गुगामल राष्ट्रीय उद्यान’ मोठ्या संख्येने पर्यटकांना…
कोल्हापूरचे कोटीतीर्थ
कोल्हापूरमध्ये ‘कोटीतीर्थ’ नावाचे एक जुने आणि छान देवस्थान आहे. शहरातील प्रसिद्ध असणाऱ्या ‘शाहू मिल’जवळ एक मोठा तलाव असून या तलावात हे लहानसे मंदिर आहे. येथील निसर्गसौंदर्य अनुपम आहे. ‘एक रमणीय स्थान’ म्हणून या मंदिराकडे पहिले जाते. या तलावामध्ये महादेवाचे छोटे मंदिर आहे. हे मंदिर साधे…
सिंधुदुर्गातील सागरेश्वर किनारा
महाराष्ट्रातील सिंधुदुर्गात वेंगुर्ला तालुक्यात असलेला उभादांडा सागरेश्वरचा किनारा फार देखणा आहे. शिवाच्या आशीर्वादाने पावन झालेले हे रम्य सागरतीर पाहताक्षणी मन वेधून घेते. येथे शांत बसून समोरचा निळाशार समुद्र पाहण्यासाठी छानपैकी बैठक व्यवस्था केलेली आहे. हा किनारा पर्यटकांनी गजबजलेला असतो. येथील वाळूत असलेल्या खरखरीत शिंपल्यांनी पायांना…
वांद्रे किल्ला
मुंबईत असलेला वांद्रे किल्ला प्रसिद्ध आहे. सागरकिनारी असल्याने हा किल्ला पाहण्यासाठी पर्यटक येथे आवर्जून जातात. या किल्ल्याचे जतन केले असल्याने तो सुस्थितीत आहे. म्हणजे काही गोष्टी अवशेषरुपात आहेत; पण ज्या चांगल्या आहेत, त्यांचे संवर्धन केल्या गेले आहे. वांद्रे येथील ‘सी रॉक’ हॉटेलला लागून दक्षिणेकडे गेलेला…
थंड हवेचे ठिकाण सापुतारा
महाराष्ट्र-गुजरात राज्याच्या सीमेवर ‘सापुतारा’ हे थंड हवेचे ठिकाण असून वर्षभर आल्हाददायक असते. हे ठिकाण जरी गुजरातमध्ये येत असले तरी सीमेवर असल्याने तेथे महाराष्ट्रातून जाणे सुलभ आहे. त्यामुळे येथील पर्यटकांची गर्दी असते. समुद्रसपाटीपासून त्याची उंची सुमारे 3600 फूट आहे. सापुतारा येथे सूर्योदय आणि सूर्यास्त ही दोन…
टिटवाळ्याचा सिद्धिविनायक महागणपती
मुंबईजवळील टिटवाळा गावात सिद्धिविनायक महागणपती मंदिर असून येथे भाविकांची नेहमी गर्दी असते. कल्याण-कसारा मार्गावर ‘काळू’ नदीच्या काठावर हे जागृत मंदिर आहे. टिटवाळा येथील गणपती मंदिर हे महाराष्ट्रातील 8 प्रसिध्द गणपती मंदिरापैकी एक आहे. महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच हे क्षेत्र प्रसिद्ध आहे. या परिसरात पूर्वी कण्व ऋषींचा आश्रम…
देवगडमधील तांबळडेग किनारा
महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगडमध्ये तांबळडेग हा अप्रतिम सागरकिनारा आहे. कोकणातील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांमध्ये गणला जावा असा हा किनारा आहे. स्वच्छ पांढरी वाळू, निळेशार पाणी असणारा ही किनारा एकांत प्रदान करणारा आहे. कसलीही गर्दी नाही.. सागराच्या साक्षीने स्वगत साधण्यासाठी मस्त असे हे ठिकाण आहे. सागरवेडा पर्यटक येथे…
शिवडीचा किल्ला
शिवडीचा किल्ला हा मुंबई शहरातील चांगल्या स्थितीत असलेला किल्ला आहे. हार्बर मार्गावरील शिवडी स्थानकाच्या पूर्वेला 10 ते 15 मिनिटांच्या अंतरावर हा किल्ला आहे.बहादूरखानाने त्याच्या ताब्यात असताना शिवडी किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पीराचा दर्गा बांधला. सन १५३४ च्या तहात हा किल्ला पोर्तुगिजांच्या ताब्यात गेल्यावर त्यांनी या किल्ल्याची डागडुजी…
सेवाग्राम आश्रम
भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी भारताच्या स्वातंत्र्यासाठी कसे जगले आणि कसे लढले ते पहायचे असल्यास पर्यटकांसाठी महाराष्ट्रातील एक उत्तम ठिकाण म्हणजे ‘सेवाग्राम आश्रम’ होय. महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यामध्ये हे ठिकाण आहे. सन 1933 मध्ये जमनालाल बजाज यांच्या विनंतीवरून गांधीजी काही काळासाठी वर्ध्याला आले. ते प्रारंभी महिला आश्रमाच्या…
खानदेशातील उनपदेव
खानदेशातील ‘उनपदेव’ या तीर्थक्षेत्रावर भाविकांची सदैव गर्दी असते. जळगाव जिल्ह्यातील ‘चोपडा’ शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर हे तीर्थक्षेत्र आहे. वैशिष्ट्य म्हणजे गरम पाण्याच्या झऱ्यासाठी हे तीर्थक्षेत्र प्रसिद्धीस पावले आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेले हे क्षेत्र म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवा आहे. येथे असलेल्या स्नानकुंडाच्या वरील बाजूला शरभंग…
सिंधुदुर्गातील मिठबाव किनारा
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला देवगड तालुका सागरकिनाऱ्यानीही समृद्ध आहे. येथील मिठबाव किनारा असाच नितांतसुंदर आणि देखणा आहे. ‘गजबा’ देवीच्या आशीर्वादाने पुलकित झालेला हा सागरतीर आहे. येथील स्थानिक तसेच आधी येऊन गेलेले पर्यटक संध्याकाळच्या वेळेला येथील मंदिरापाशी जाऊन बसतात. फेसाळणाऱ्या लाटांचे विहंगम दृश्य…
घोडबंदर किल्ला
ठाण्यातील घोडबंदर गावाजवळ ‘उल्हास’ नदीच्या किनाऱ्यावर घोडबंदर किल्ला आहे. पोर्तुगीजांनी बांधलेला हा किल्ला नंतर मराठ्यांच्या ताब्यात गेला. याठिकाणी पोर्तुगीज अरब लोकांसोबत घोड्यांचा व्यापार करीत. त्यामुळे या जागेला ‘घोडबंदर’ हे नाव पडले. या किल्ल्याचे पोर्तुगीज नाव ‘ककाबे दी तन्ना’ असे होते. इसवी सन १७३७ पर्यंत या…
कोका अभयारण्य
निसर्ग पर्यटनाची आवड असलेल्यांसाठी अभयारण्य हे उत्तम प्रेक्षणीय स्थळ ठरते. येथे वनस्पतीबरोबरच प्राणी, पक्ष्यांचे दर्शन होते. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात ‘न्यू नागझिरा’, ‘उमरेड कऱ्हाड’ आणि ‘कोका’ अशी 3 अभयारण्ये आहेत. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या ‘न्यू नागझिरा’ अभयारण्याला लागूनच ‘कोका अभयारण्य’ घोषित करण्यात आले. डिसेंबर 2013 पासून या…
सांगलीतील श्री क्षेत्र औदुंबर
श्री क्षेत्र औदुंबर हे श्री दत्तात्रेयांचे जागृत स्थान सांगली जिल्ह्यात आहे. तासगाव तालुक्यात ‘भिलवडी’ गावाजवळ ‘कृष्णा’ नदीच्या काठी निसर्गाच्या सहवासात हे सुंदर मंदिर उभे आहे. औदुंबर हे पश्चिम महाराष्ट्रातील आध्यात्मिक, धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाते. दत्तावतार नृसिंहसरस्वतींचे हे स्थान आहे. याठिकाणी वर्षभर विविध…
वेंगुर्ल्याचा दाभोळी वायंगणी किनारा
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला तालुक्यातील सागरकिनारे मनमोहक आहेत. येथील काही किनाऱ्यांवर पर्यटकांची वर्दळ असते. काही किनारे आल्हाददायक असूनही शांत आहेत. काही किनाऱ्यांवर कोळ्यांची वर्दळ असते. असाच येथील दाभोळी – वायंगणी किनारा आहे. येथे कोळ्यांची लगबग सुरु असते. उतार असलेल्या किनाऱ्यावर लाटांचा फेस, त्याची गाज अनुभवता…
भुदरगड किल्ला
महाराष्ट्रातील कोल्हापूर तालुक्यात ‘भुदरगड’ हा प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला आहे. कोल्हापूरच्या दक्षिणेला ३६ मैलावर आणि गारगोटीपासून ५ मैलावर सह्याद्री पर्वतरांगेत हा किल्ला विसावलेला आहे. या किल्ल्याची दक्षिणोत्तर लांबी २६०० फूट आणि रूंदी २१०० फूट आहे. या किल्ल्यावर श्री केदारलिंग, भैरवनाथ, जखूबाई अशी देवस्थाने आहेत. भुदरगड तालुक्याचे…
फणसाड अभयारण्य
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात ‘मुरुड’ गावाच्या अलीकडे ‘फणसाड वन्यजीव अभयारण्य’ आहे. हे पर्यटकांचे खास आकर्षण ठरले असून जगभरातील प्राणी-पक्षीप्रेमी येथील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी वर्षभर येथे भेट देत असतात. मुंबईपासून 154 कि.मी अंतरावर पनवेल-पेण-अलिबाग मार्गावर हे अभयारण्य आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ‘फणसाड अभयारण्याचे हे क्षेत्र म्हणजे मुरुड…
जेजुरीचा खंडोबा
पुणे जिल्ह्यातील जेजुरी या गावी खंडोबाचे देवस्थान आहे. येथे भाविकांची सतत गर्दी असते. खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून ते ‘जेजुरीचा खंडोबा’ या नावाने परिचित आहे. उंच डोंगरावर असलेल्या कडेपठार या ठिकाणी जुने मंदिर होते, इसवी सन १७१२ मध्ये जेजुरीला नव्याने देऊळ बांधले. या देवळासमोर दगडी…
सिंधुदुर्गातील घडीवाडीचा किनारा
महाराष्ट्रातील सिंधुदुर्गात देवगडमध्ये असलेला विजयदुर्ग किल्ला म्हणजे देवगड तालुक्याचे उत्तर टोक आहे. या किल्ल्यासमोर असलेला किनारा सुंदर आहेच; परंतु येथून दक्षिणेच्या दिशेने गेल्यावर ‘दामलेमळा’, ‘कोठारवाडी’, ‘कालवशी’ वगैरे किनारे असून येथील ‘घडीवाडीचा किनारा’ प्रसिद्ध आहे. गिर्ये गावाच्या रामेश्वर मंदिरामागे असलेला एक कच्चा रस्ता आपल्याला याठिकाणी घेऊन…
वरळी किल्ला
मुंबई परिसरात ऐतिहासिक वारसा समृद्ध करणारे काही किल्ले आहेत. एके काळी हे किल्ले पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय खात्याने या किल्ल्यांचे नुतनीकरण केल्यामुळे आजही हे किल्ले दिमाखात उभे अहेत. वरळी-कोळीवाड्यामध्ये आदर्श नगरच्या बसथांब्यावरुन समुद्रकिनाऱ्याकडे जाणारी एक अरुंद गल्ली आहे. या गल्ल्लीतून सुमारे 10 मिनिटे…
टिपेश्वर अभयारण्य
विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात वाघांचे मनसोक्त दर्शन घडविणारे टिपेश्वर अभयारण्य आहे. मुख्यालयापासून अवघ्या ८० किलोमीटर अंतरावर ही अभयारण्य आहे. नागपूरच्या पेंच व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत संरक्षित क्षेत्रामध्ये या अभयारण्याचा समावेश होतो. येथील ‘तिपाई’ देवीच्या नावावरून या अभयारण्याला ‘टिपेश्वर अभयारण्य’ असे नाव देण्यात आले. अभयारण्यात टेकडीवर हे तिपाईचे मंदिर…
मार्कंडेश्वर देवस्थान
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात वास्तुशिल्प शैलीसाठी प्रसिद्ध असलेले फार सुंदर मंदिरांचा समूह आहे. येथील श्रीमार्कंडेश्वर मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. ‘वैनगंगा’ नदीच्या डाव्या तीरावर ‘चामोर्शी’ या गावाच्या पश्चिमेला हे मंदिर उभे आहे. येथील अन्य मंदिरे आणि त्यांवरील शिल्पकला पाहण्यासाठी आवर्जून येथे पर्यटक येत असतात. महाशिवरात्रीला तर येथे…