रोहिडा किल्ला
सातारा जिल्ह्यातील भोर तालुक्यात ‘रोहिडा’ किल्ला आहे. याला ‘विचित्रगड’ असेही म्हणतात. हा गड पाहण्यासाठी प्रथम संस्थानकालीन भोरला जावे लागते. येथून बसने ‘रोहिडा’ किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ‘बाजारवाडी’ गावात पोहोचता येते. गावात पोहोचल्याबरोबर पश्चिमेकडे पाहिले असता तटबंदी आणि बुरूजांनी नटलेला ‘रोहिडा’ दिसतो. या गडावर जाण्यासाठी सोपी चढण…
नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान
महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात असलेले नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान हे मन उल्हासित करणारे एक ठिकाण आहे. येथे हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेला विस्तीर्ण जलाशय डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे. या उद्यानातील प्रमुख आकर्षण म्हणजे विविध पक्ष्यांचे दर्शन होय. नवेगावबांधचा परिसर विशेषत्वाने डोंगराळ असून तेथील वनाचा एकूण विस्तार 133 चौरस किमी…
कोल्हापूरचा चिन्मय गणाधीश
पुणे-बंगळुरू महामार्गावर महाराष्ट्रात कोल्हापूरपासून 14 किलोमीटर अंतरावर ‘चिन्मय गणाधीश’ ही श्री गणेशाची संपूर्ण जगातील सर्वात उंच मूर्ती आहे. सन 2001 मध्ये ही मूर्ती दर्शनासाठी खुली झाली. ‘चिन्मय संदीपन्य’ आश्रमात ही मूर्ती आहे. ही गणेशाची संपूर्ण जगातील सर्वात उंच मूर्ती आहे. संपूर्ण रचनेत 24 फूट उंच…
सासवणे सागरकिनारा
महाराष्ट्राच्या अलिबाग तालुक्यातील सासवणे या छोट्याशा गावात ‘सासवणे समुद्रकिनारा’ आहे. हा किनारा रायगड जिल्ह्यामध्ये येतो. येथे पर्यटकांची फारशी वर्दळ नसते; मात्र तो निर्जनही नाही. आरामशीर सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हा मस्त शांत किनारा आहे. अलिबाग शहरापासून सुमारे 20 किमी अंतरावर हा किनारा आहे. ‘करमरकर शिल्प संग्रहालय’…
बितनगड किल्ला
महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात बितनगड किल्ला विसावलेला आहे. या किल्ल्यास ‘बितंगा’, ‘बिताका’ या नावांनीही ओळखतात. या गडावर जायचे असेल तर प्रथम ‘घोटी’ गावात जायला हवे. इथून भंडारदरा रस्त्यावर ‘टाकेद’ गावाला जाण्यासाठी एक फाटा आहे. या फाट्यावरून पुढे गेल्यावर ‘बितनवाडी’ हे गाव मिळते. बितनवाडी गाव बितनगडाच्या पायथ्याशी…
भंडारदरा धरण
भंडारदरा हे गाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात आहे. येथील ‘प्रवरा’ नदीवर सन 1910 मध्ये बांधलेले ‘विल्सन धरण’ हे सर्वात मोठे मातीचे धरण आहे. या धरणाला ‘भंडारदरा धरण’ म्हणूनही ओळखले जाते. हे धरण त्या काळातील अभियांत्रिकीच्या उत्कृष्टतेबद्दल माहिती देते. या धरणाच्या पायथ्याशी असलेली घनदाट हिरवळ…
म्हाळसाकोरे मंदिरे
नाशिकमधील ‘म्हाळसाकोरे’ गाव मंदिरांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. येथील हेमाडपंती मंदिरे दुर्मिळ आहेत. ‘म्हाळसाकोरे’ला जायचे झाल्यास नाशिकहून सायखेडामार्गे जाता येते. हे अंतर साधारण ३०-३५ किलोमीटर आहे. नांदूरमध्यमेश्वर येथून हे अंतर अवघे ४-५ किलोमीटर आहे. गावात गेल्यावर डाव्या बाजूला ‘म्हाळसा’ देवीचे मंदिर लागते. ‘म्हाळसाकोरे’ निफाड तालुक्यात आहे….
वेळणेश्वर समुद्रकिनारा
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात ‘वेळणेश्वर’ गावाजवळ ‘शास्त्री’ नदीच्या उत्तरेला वेळणेश्वर समुद्रकिनारा आहे. नारळाच्या झाडांनी वेढलेला हा किनारा फार सुंदर आहे. खडकाळ समुद्र आणि स्वच्छ वातावरणासाठी तो लोकप्रिय आहे. पोहणे, सूर्यस्नान आणि मनमुरादपणे समुद्रकिनाऱ्यावरचे फिरणे यासाठीच पर्यटक या किनाऱ्याला पसंती देतात. या समुद्रकिनाऱ्यावर तयार झालेली ‘ब्राह्मण घळ’…
अर्नाळा किल्ला
‘अर्नाळा’ किल्ला हा अर्नाळा बेटावर असलेला एक सागरी किल्ला आहे. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात विरार-पश्चिम भागातील ‘अर्नाळा’ या लहानशा शहराच्या किनाऱ्यावर तो वसलेला आहे. हा किल्ला इसवी सन १६ व्या शतकात पोर्तुगीजांनी बांधला होता. इसवी सन १८ व्या शतकात मराठा साम्राज्याने तो ताब्यात घेतला. हा किल्ला…
नेहरू तारांगण
मुंबईतील नेहरू तारांगण हे वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रीय शिक्षणासाठी असलेले एक प्रमुख ठिकाण आहे. नेहरू तारांगण मनोरंजनासोबतच विविध व्याख्याने, कार्यक्रम आणि प्रख्यात अवकाश संशोधकांमध्ये सुरू असलेल्या चर्चेच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रसार करण्याचा प्रयत्न करीत आहे. येथे मुलांना प्रत्यक्ष तारे–ग्रह कशा पद्धतीने अंतराळात विहार करतात, हे पाहता येते….
सिद्धनाथ मंदिर खरसुंडी
सिद्धनाथ हा शंकर देवांचा अवतार मानला जातो. सिद्धनाथ हा आटपाडी आणि लगतच्या प्रदेशांचा संरक्षक देव आहे व महाराष्ट्रातील अनेक प्रादेशिक क्षेत्रपाल देवांपैकी एक आहे. सिद्धनाथांचे ऐतिहासिक मंदिर, 450 वर्षांपूर्वी बांधलेले मोठे मंदिर आहे. या मंदिरातील शंकराचा पुनर्जन्म आहे ज्याला नाथबाबा असे म्हणतात. या देवाला दोन…
आंजर्ले सागरकिनारा
महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ अप्रतिम असा ‘आंजर्ले’ सागरकिनारा आहे. आपली सुट्टी कोकणात आपल्या प्रिय व्यक्तींसोबत घालवायची असेल तर ‘आंजर्ले’ समुद्रकिनाऱ्याची निवड करायला काहीच हरकत नाही. या किनाऱ्यावर काळ्या आणि पांढऱ्या वाळूचे एकत्रीकरण दिसते. आंजर्लेतील प्रमुख आकर्षण म्हणजे ‘काड्यावरचा गणपती मंदिर’ हे आहे. हे मंदिर गणेशमूर्ती…
मांजरसुभा किल्ला
अहमदनगर जिल्ह्यात ‘मांजरसुंभा’ हा किल्ला आहे. पुण्याहून हा किल्ला १४२ कि.मी. इतक्या अंतरावर आहे. ‘वांबोरी’ घाटातील पायथ्याशी श्री सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. येथे दर्शन घेऊन पुढे मार्गक्रमण सुरु झाल्यावर ‘मांजरसुभा’ गाव मिळते. ‘मांजरसुभा’ गावातून डोंगराकडे जाणाऱ्या मार्गावर किल्ल्याकडे जाणारा सिमेंटचा रस्ता लागतो. पुढे शनीमारुतीचे मंदिर आहे….
सोनावळेतील गणेश लेणी
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात ‘सोनावळे’ गावाजवळ प्राचीन गणेश लेणी अथवा ‘गणेश गडद’ या अतिशय वैशिष्ट्यपूर्ण गुहा आहेत. सोनावळे गावापासून साडे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरात ही लेणी आहेत. वाटेत घनदाट जंगल असून ते जैवविविधतेने समृद्ध आहे. इसवी सन १८७० मध्ये भगवानलाल इंद्रजी यांनी या लेण्यांची…
दुर्गादेवी मंदिर गुहागर
श्री दुर्गादेवी मंदिर, गुहागर हे महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर या तालुक्याच्या ठिकाणी असलेले एक प्राचीन मंदिर आहे. कोकण प्रांतातील अनेक ब्राह्मण कुटुंबांची ती कुलदेवता मानली जाते. हे मंदिर गुहागर गावाच्या वरच्या बाजूला आहे. मंदिर जवळच्या भागात भक्त निवासासाठी येतात. या मंदिराच्या आजूबाजूला हिरवळ आहे….
किहिम सागरकिनारा
रायगड जिल्ह्यात अलिबागजवळ असणारा किहिम सागरकिनारा नितांतसुंदर आहे. या किनाऱ्यावरील पांढरी वाळू आणि उन्हात चमकणाऱ्या पाण्याच्या लाटा पुढचे अनेक दिवस मनात रुंजी घालत राहतात. किनाऱ्यावरील डोलणारी नारळाची झाडे मनाला फार आनंद देतात. हा किनारा तरुण, वृद्ध, दांपत्य, कुटुंब आणि मित्र-मैत्रिणी या सर्व वयोगटांसाठी मोठे आकर्षण…
सोनगीर किल्ला
महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यामध्ये ‘सोनगीर’ किल्ला आहे. मुघल सुभेदार अहमद फारुकी याने आपल्या शासन काळात दुसरा किल्ला बांधला. मध्ययुगीन काळात या किल्ल्यास फार महत्त्व होते. धुळ्यामधून जाणारा आग्रा महामार्ग हा महामार्ग क्रमांक 3 म्हणून ओळखला जातो. या महामार्गावर सोनगीर गावालगतच हा किल्ला आहे. येथे जाण्यासाठी धुळे…
वेंगुर्ला बंदर
वेंगुर्ला’ हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणारे एक शहर आहे. काजू, आंबा, नारळ आणि विविध प्रकारच्या झाडांनी या शहराची शोभा वाढते. वेंगुर्ला हे एक बंदर आहे. या बंदरावर नेहमी वर्दळ असते. वेंगुर्ला बंदरावरून विशाल समुद्राचे मनोहारी दर्शन होते. येथे वाळूवरून चालण्याचा आनंद घेता येत नाही; पण…
श्री क्षेत्र गाणगापूर
सोलापूर जिल्ह्यात गाणगापूर हे दत्तगुरुंचे पवित्र स्थान आहे. ‘भीमा’ आणि ‘अमरजा’ या नद्यांच्या संगमाकाठी हे सुंदर मंदिर आहे. येथे दत्तावतारी श्री नृसिंह सरस्वती यांचे वास्तव्य होते. हे एक जागृत स्थान असून अनेक भक्तांचे व्याधी आणि बाधा निवारण केले जाते. येथे नृसिंह सरस्वतींच्या पादुका आहेत. ‘गाणगापूरग्रामी…
भाट्ये समुद्रकिनारा
रत्नागिरी शहरापासून अवघ्या 1 किमी अंतरावर असणारा भाट्ये समुद्रकिनारा प्रसिद्ध आहे. या किनाऱ्यावरील संध्याकाळ पर्यटकांनी गजबजलेली असते. नैसर्गिक सौंदर्याने भारलेला हा सरळ समुद्रकिनारा अंदाजे 1.5 किलोमीटर लांब आहे. त्यामुळे किनाऱ्यावरून दूरवर चालत जाण्याचा आनंद आपण घेऊ शकता. या समुद्रकिनाऱ्यावरून, आपण भाट्ये किनाऱ्याच्या पुढे प्रसिद्ध ‘मांडवी’…
अलंग किल्ला
अलंग किल्ला हा अलंगगड म्हणूनही ओळखला जातो. हा किल्ला पश्चिम घाट आणि कळसूबाई पर्वत रांगेत असलेला एक किल्ला आहे. अलंग किल्ला, मदनगड किल्ला, कुलंग किल्ला आणि त्यांना जोडणारा ट्रेक अलंग, मदन आणि कुलंग म्हणून ओळखला जातो. अलंग किल्ला हा येथील सर्वात कठीण ठिकाणांपैकी एक म्हणून…
महाराष्ट्र निसर्ग उद्यान
मुलांना सुट्टी लागली की दर आठवड्याला कुठेतरी बाहेर फिरायला न्यावंच लागतं. मुंबईतील निसर्गाच्या सानिध्यात असलेले प्रेक्षणीय स्थळ म्हणजे ‘महाराष्ट्र निसर्ग उद्यान’ होय. ३७ एकरांच्या कचऱ्याच्या ढीगाऱ्याखालील जमिनीचे परिवर्तन या निसर्ग उद्यानात करण्यात आलेले आहे. १९९४ पासून या रुपांतरणास सुरुवात झाली आणि आज धारावीच्या जवळ आपल्याला…
दापोलीचे दत्तमंदिर
दापोली तालुक्यात हर्णे-मुरुड-कर्दे असा प्रवास करत बुरोंडी-कोळथरेच्या दिशेने निघालो , वाटेत किनाऱ्यापाशी लागणारे गाव म्हणजे ‘लाडघर’. किनाऱ्यावरील मातीत असलेल्या विविध धातूंच्या गुणधर्मामुळे इथल्या पाण्याला तांबूस रंग आहे. त्यामुळे या पाण्याला ‘तामसतीर्थ’ असे म्हणतात. हा भाग पर्यटकांच्या वर्दळीने गजबजलेला असतो. कर्दे गावातून समुद्राला लागून असलेल्या मार्गाने…
शिरोडा समुद्रकिनारा
मुंबई आणि गोव्यातील समुद्रकिनारे फार वर्दळीचे वाटत असतील तर महाराष्ट्रातील सिंधुदुर्गात शिरोडा किनारा हा एक शांत आणि आरामदायी समुद्रकिनारा आहे. येथे खाद्यपदार्थ, रिसॉर्ट्स, जलक्रीडा इत्यादी सुविधादेखील आहेत.शिरोडा हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक छोटेसे गाव आहे. वेंगुर्ला शहरापासून ते काही किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणाला ऐतिहासिक साज…
रायरेश्वर किल्ला
महाराष्ट्रात उंचीवर असणाऱ्या काही निवडक पठारांमध्ये रायरेश्वर हे प्रसिद्ध पठार आहे. ११ किमी. लांब आणि १.५ किमी. रुंद पसरलेले हे पठार आहे. हा किल्ला पुण्याहून ८५ किमी. अंतरावर, तर भोरवरून ३० किमी. अंतरावर आहे. खाजगी वाहनाने किंवा एस. टी. ने आपण या किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचू…