छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय
छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय हे एक उल्लेखनीय ठिकाण आहे. मुख्य आकर्षणांपैकी हे एक स्थळ आहे. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयापासून नेहरू बाल उद्यान जवळ आहे. हे संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित आहे. मराठा साम्राज्यातील शासकांची शस्त्रे आणि इतर पुरातन…
दाक्षायणी देवीचे मंदिर
औरंगाबादमध्ये दाक्षायणी देवीचे सुंदर मंदिर आहे. हे मंदिर लासूर गावात ‘शिवना’ नदीच्या काठावर असून निसर्गरम्य आहे. दाक्षायणी देवी लासुर गावचे आराध्य दैवत व वैजापुर तालुक्याचे ग्रामदैवत आहे. डोक्यावर चांदीचा मुकूट आणि अंगभर दागिने परिधान केलेली देवीची मूर्ती प्रसन्न आहे. देवीच्या मंदिरासमोर मोठा सभामंडप आहे. देवीच्या…
बेनाळी समुद्रकिनारा
बेनाळी हा गोव्यातील एक सुंदर समुद्रकिनारा आहे. हा किनारा खूप शांत आणि नयनरम्य असा आहे. संध्याकाळच्या वेळी येथे गर्दी असते. पर्यटक सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी येथे आवर्जून भेट देतात. या किनाऱ्यावर गोव्यातील इतर समुद्रकिनाऱ्यांइतके पर्यटक नसतात. तरीही विविध प्रकारच्या जलक्रीडा पाहण्याची संधी येथे मिळते. या किनाऱ्यावर…
इंद्राई किल्ला
नाशिक जिल्ह्यात अजंठा-सातमाळ रांगेत चांदवड तालुक्यात राजधेर, कोळधेर, इंद्राई आणि चांदवड हे चार किल्ले आहेत. इंद्राई किल्ल्यांच्या पायथ्याचे गाव राजधेरवाडी आहे. या गावात २ दिवस थांबून राजधेर व इंद्राई हे किल्ले पाहता येतात. किल्ल्यावर राहण्यासाठी गुहा आहेत. या किल्ल्यावर बारमाही पिण्याचे पाण्याचे टाके आहे. इंद्राई…
हिमायत बाग
छत्रपती संभाजीनगरच्या रौजा बाग परिसरात दिल्ली गेटजवळ हिमायत बाग हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे. ही बाग १७ व्या शतकातील असून 300 एकर परिसरात पसरलेली आहे. येथे आता फळ संशोधन केंद्र आणि रोपवाटिका असून ती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचा एक भाग आहे. पूर्वी या…
गोगाबाबा मंदिर
छत्रपती संभाजीनगरमधील गोगा बाबा टेकडी ही एक छोटी टेकडी आहे. या टेकडीवर एक छोटेसे गोगाबाबा मंदिर आहे. हे एक निसर्गरम्य ठिकाण असून मंदिर पाहण्यासाठी भाविकांची गर्दी असते. येथील वातावरण नेहमीच शांत व आल्हाददायक असते. या टेकडीवरून दिसणारे सूर्यास्ताचे दृश्य प्रेक्षणीय असते. गोगा बाबा टेकडीच्या माथ्यावर…
बांबोळी समुद्रकिनारा
बांबोळी समुद्रकिनारा हा गोव्याची राजधानी असलेल्या पणजीपासून 7 किलोमीटर अंतरावर आहे. सहलीचा किंवा शांत दिवसाचा आनंद लुटणाऱ्यांनी या किनाऱ्यावर जावे. गोव्यात विखुरलेल्या बहुतेक समुद्रकिनाऱ्यांप्रमाणे या किनाऱ्यावर विक्रेते किंवा शॅक दिसणार नाहीत. या किनाऱ्यावर नारळाची झाडे, खडकाळ भाग आणि सोनेरी वाळूचा लांब पट्टा दिसतो. या किनाऱ्यावर…
पदरगड किल्ला
कर्जतमार्गे भिमाशंकरला जाणाऱ्या गणेश घाटावर नजर ठेवण्यासाठी पदरगड किल्ला बांधण्यात आला. हा किल्ला रायगड जिल्ह्यात येतो. टेहळणी करणे हा या किल्ल्याचा मुख्य उद्देश होता. पदरगडावरील दोन कातळ सुळक्यांना औरंगजेबाने पेठचा किल्ला घेताना आजूबाजूचे किल्लेही घेतले. त्यावेळी पदरगड त्याने पुन्हा बांधून घेतल्याचे सांगतात. पदरगडावर चढताना ‘चिमणी…
सोनेरी महाल
छत्रपती संभाजीनगर शहरात सोनेरी महाल ही एक देखणी व ऐतिहासिक वास्तू आहे. ही वास्तू सातमाळा पर्वतरांगांच्या पायथ्याशी आहे. येथून जवळच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे. सोनेरी महाल हे राजपूत व मुघल यांच्या संमिश्र स्थापत्य शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.सोनेरी महालाच्या परिसरात झाडे, कुरणे आणि शेत…
राजूरचे गणेश मंदिर
जालना शहरातील राजूर परिसरात एक देखणे गणेश मंदिर आहे. शहरापासून पंचवीस किंमी अंतरावर हे मंदिर आहे. गणेश चतुर्थी, अंगारकी चतुर्थी तसेच विनायकी चतुर्थीदिवशी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून येथे परिवहन महामंडळाच्या बसगाड्या उपलब्ध असतात. गणेश पुराणानुसार, हे स्थळ भगवान गणेशाच्या संपूर्ण पिठांपैकी…
मोबोर किनारा
गोव्यातील मोबोर सागरकिनारा हा पर्यटनासाठीचे एक आकर्षणाचे ठिकाण आहे. येथे बरेच उत्सव आणि उपक्रम नेहमीच चालू असतात. निसर्गप्रेमींसाठी हे गोव्यातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी हे एक आहे. फुललेल्या लिली, वाळूचे ढिगारे अशी सुंदर नैसर्गिक वैशिष्ट्ये येथे पहायला मिळतात. ज्या लोकांना गोव्याचे दैनंदिन जीवन संपूर्णपणे अनुभवायचे आहे, किंवा…
सिध्दगड किल्ला
प्राचीन काळी कल्याण बंदरात उतरणारा माल जुन्नर या बाजारपेठेत नेण्यासाठी विविध व्यापारी मार्गांचा वापर होत होता. यातील कल्याण – म्हसा – अहुपे घाट – जुन्नर हा एक मार्ग होता. हा व्यापारी मार्ग आणि अहुपे घाटावर नजर ठेवण्यासाठी सिध्दगड या किल्ल्याची निर्मिती केली होती. ठाणे जिल्ह्यातील…
वृंदावन मनोरंजन उद्यान
चाकूरमधील वृंदावन मनोरंजन उद्यान हे आबालवृद्धांचे आवडते ठिकाण आहे. लातूरच्या मुख्य शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर हे स्थळ आहे. पर्यटकांसाठी थेट उद्यानापर्यंत जाणाऱ्या अनेक कॅब आणि टॅक्सी सेवा येथे आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या नियमित बसगाड्याही येथे उपलब्ध असतात. चाकूर येथील सीमा सुरक्षा दलाच्या केंद्राजवळ हे पार्क…
केशव बालाजी देवस्थान
लातुरमधील औसा तालुक्यात केशव बालाजी देवस्थान आहे. आंध्रप्रदेशातील तिरुमलाच्या धर्तीवर हे मंदिर उभारले असून मंदिराला भव्य सभामंडप आहे. वैविध्यपूर्ण बांधकाम आहे. शहराच्या वर्दळीपासून दूर टेकडीवर निसर्गम्य वातावरणात हे मंदिर आहे. वर्षातून दोनवेळा येथे मोठे धार्मिक कार्यक्रम होतात. हे मंदिर सर्व दिवस सकाळी 6 वा.पासून रात्री…
बेताळभाटी किनारा
बेताळभाटी किनारा हा कोलवा आणि माजोर्डा या किनाऱ्यादरम्यान आहे. पर्यटकांमध्ये हा ‘सनसेट बीच’ म्हणून प्रसिद्ध आहे. येथे सूर्यास्ताची चित्तथरारक दृश्ये दिसतात. बेताळभाटी किनाऱ्याला भेट देण्यामागचे दुसरे कारण म्हणजे येथे डॉल्फिन पहायला मिळतात. येथे गेल्यावर स्थानिक मच्छिमारांना सुंदर डॉल्फिन स्पॉटिंगसाठी घेऊन जाण्याची विनंती केल्यास ते तुम्हाला…
बिष्टा किल्ला
नाशिक जिल्ह्यातील बागलाण भागात बिष्टा, कर्हा , दुंधा, अजमेरसारखे किल्ले आहेत. सटाणा तालुक्यातील दुंधेश्वर डोंगररांगेवर हे किल्ले आहेत. या किल्ल्याचा वापर चौकीचा किल्ला म्हणून जात होता. ‘बिष्टा’ किल्ला ‘बिजोट्याचा किल्ला’ या नावानेही ओळखला जातो. हा किल्ला ‘कोटबेल’ गावापासून जवळ आहे. ‘कोडबेल’ हे गाव ‘बिष्टा’ किल्ल्याच्या…
कपिलधार धबधबा
बीड जिल्ह्यातील काही पर्यटनस्थळांपैकी श्री क्षेत्र कपिलधार हे एक मनोहर ठिकाण आहे. बीड शहराच्या दक्षिणेला १९ किमी. अंतरावर मांजरसुभा हे गाव आहे. बीड, अहमदनगर उस्मानाबाद व अंबेजोगाईस जाणारे रस्ते याठिकाणी एकत्र येतात. येथे टेकड्यांच्या परिसरात ‘कपिलधार’ नावाचा धबधबा आहे. कपिलधार येथे मन्मथस्वामी यांची संजीवन समाधी…
आनंदी स्वामी मंदिर
जुन्या जालन्यात आनंदी स्वामी मंदिर हे एक आकर्षक मंदिर आहे. येथे संत आनंदी स्वामींनी समाधी घेतली. हे मंदिर दर्शनासाठी सकाळी सहा पासून रात्री नऊ वाजेपर्यंत खुले असते. आषाढी एकादशीला येथे मोठी जत्रा भरते. येथे जाण्यासाठी मात्र नियोजन करावे लागते. मराठा सरदार महादजी शिंदे यांनी हे…
माजोर्डा समुद्रकिनारा
माजोर्डा समुद्रकिनारा हा दक्षिण गोव्यातील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. येथे मऊ सोनेरी वाळू आहे. आनंदाने डोलणारी नारळाची झाडे आणि वारे या किनाऱ्याच्या प्रेमात पाडतात. येथे वॉटर स्कीइंग, डॉल्फिन स्पॉटिंग, बनाना राईड, पॅरासेलिंगचा आनंद घेऊ शकता. माजोर्डा किनाऱ्यावर वाजवी किमतीत सेवा देणारी काही शॅक आहेत. काही लक्झरी हॉटेल्स…
नंदगिरी किल्ला
नांदेड जिल्ह्यात आज फक्त अवशेष शिल्लक असणारा नंदगिरी किल्ला होता. गोदावरी नदीच्या काठी हा किल्ला होता. उर्वरीत किल्ला पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. नंदगिरी किल्ला नांदेड शहरातील अरब गल्लीत आहे. हे शहर रस्ते आणि रेल्वे मार्गाने देशाशी जोडलेले आहे. महाराष्ट्रातील सर्व महत्वाच्या शहरातून येथे एसटी तसेच…
जायकवाडी धरण
गोदावरी नदीवरील जायकवाडी धरण पाहण्यासाठी अनेक पर्यटक आवर्जून जातात. हे धरण औरंगाबाद जिल्ह्यात गोदावरी नदीवर आहे. मराठवाड्यातील जवळजवळ २.४० लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आले आहे. हे आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण म्हणून ओळखले जाते. पूर्ण क्षमतेने भरलेले धरण दोन वर्षांची शेतीच्या पाण्याची…
पाथरीचे साई मंदिर
शिरडीचे साई संस्थान देश-विदेशात लोकप्रिय आहे. साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो भाविकांची उपस्थिती शिरडीत असते. साईबाबांच्या दानपेटीत भाविक मौल्यवान वस्तू दान करतात. यामागे साईबाबांची प्रचिती मिळत असल्याचे भाविकांकडून सांगण्यात येते. बाबांचा जन्म यावरुन भक्तमंडळींमध्ये अनेक सुरस कल्पना आहेत. मात्र, सन १९७० च्या दशकामध्ये एक संशोधन झाले….
रामदास स्वामी मंदिर
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात जांबसमर्थ येथे संत रामदास स्वामी यांचा जन्म झाला. रामदास स्वामींचे गाव पाहण्यासाठी भाविकांची पाऊले आपोआप इकडे वळतात. या गावात रामदास स्वामींचे मंदिर आहे. रामदास स्वामींच्या घरात राम मंदिर आहे. येथे दररोज भाविक मोठ्या संख्येने हजर असतात. शिवाय दरवर्षी रामनवमीस यात्रा भरते….
डोना पॉला समुद्रकिनारा
पणजीपासून फक्त 7 किमी अंतरावर ‘डोना पॉला’ समुद्रकिनारा आहे. ‘झुआरी’ आणि ‘मांडवी’ नद्यांचा मिलनबिंदू म्हणजे हा समुद्रकिनारा आहे. पर्यटकांना शांत क्षण घालवण्यासाठी हा किनारा अप्रतिम आहे. येथील चमकणारी वाळू, हिरवेगार पाम वृक्ष यामुळे येथील दृश्य मनमोहक असते. हा समुद्रकिनारा ‘लव्हर्स पॅराडाईज’ नावाने देखील लोकप्रिय आहे….
मनोहर-मनसंतोष गड
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘मनोहर-मनसंतोष गड’ हा एक सुंदर किल्ला आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून कोकणात उतरण्यासाठी जे चार घाट आहेत, त्या सर्व घाटांवर किल्ले आहेत. यातील आंबोली घाटात मनोहर-मनसंतोष हा एक बलदंड किल्ला आहे. या गडावर जाण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेठशिवापूर आणि शिरशिंगेजवळून रस्ता आहे. यातील पेठशिवापुरास जाण्यासाठी सावंतवाडीहुन…