टँकरने सतरा जिल्ह्यांमध्ये पाणीपुरवठा
राज्यातील सर्वच विभागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे धरणांमधील एकूण पाणीसाठा ६८ टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र, असे असले तरी राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये अजूनही पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट कायम आहे. राज्यातील ५० टक्के जिल्ह्यांमध्ये टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.