आरोग्यदायी आले
आले हे भारतीय स्वयंपाकघरातील एक अत्यंत उपयुक्त आणि औषधी गुणधर्म असलेले मसाल्याचे द्रव्य आहे. त्याचा उपयोग केवळ चव वाढवण्यासाठीच नाही, तर आरोग्यदृष्ट्याही फार लाभदायक आहे. आलेमध्ये जिंजेरॉल नावाचे द्रव्य आढळते, जे सूज, वेदना आणि अपचनावर अत्यंत प्रभावी असते. गळ्याच्या खवखव, सर्दी-खोकला, थंडी यावर आलेचा काढा…
डोळ्यांचे आरोग्य
बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना चष्मा लावावा लागत आहे. पूर्वी ही समस्या फक्त वयोवृद्धांमध्ये होती. आता लहान वयात चष्मा लावण्याची पाळी येते. कॉम्प्युटर स्क्रीनवर काम करणाऱ्या लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो. जेव्हा तुमचे डोळे कमकुवत होतात तेव्हा तुमच्या डोळ्यातील बाहुल्यांना त्यांचा आकार बदलण्यास त्रास होतो. अशा…
आरोग्यदायी पनीर
पनीर आजकाल लोकांच्या जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. बर्गर, पिझ्झा, सँडविच अशा अनेक लोकप्रिय खाद्यपदार्थांमध्ये याचा वापर केला जातो. आजकाल लोकांना त्याची चव इतकी आवडू लागली आहे की जवळजवळ प्रत्येक पदार्थामध्ये त्याचा वापर केला जातो. चविष्ट असण्यासोबतच हे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. याचे अनेक…
पाठदुखीला दूर पळवा
मान आणि पाठदुखी ही अलिकडची सार्वत्रिक समस्या झाली आहे. पूर्वी साधारण वयाच्या चाळीशीनंतर या समस्येने अनेकजण त्रस्त असत. आजकाल किशोरवयीन मुलांपासूनच या तक्रारी सुरू होतात. हे दुखणे थंडीमुळे असेल, असा अंदाज बांधला जातो. परंतु यामागे हवामानापेक्षाही स्वत:चे चुकीचे वागणे जास्तकरुन कारणीभूत आहे. कामाच्या ठिकाणी कार्यालयांमध्ये…
थंड पाण्याची आंघोळ
व्यक्तीची दिवसाची सुरुवात आंघोळ करून होते. काहीजण उन्हाळ्यात थंड पाण्याने व हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करतात; परंतु थंडीतही थंड पाण्याने आंघोळ करणे फायदेशीर असते. थंड पाण्याची आंघोळ मन आणि शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. आंघोळीसाठी पाणी किती थंड असावे, तर यासाठी बर्फासारख्या पाण्याची गरज नाही. पाणी…
सुरळीत श्वसनासाठी
श्वास न घेता जगणे निव्वल अशक्य ! यासाठी आपला श्वसनमार्ग, फुफ्फुसे कार्यक्षम असली पाहिजेत. याकरिता काही कृतींचा अवलंब आपण केला पाहिजे. धुम्रपान टाळलेच पाहिजे. धुम्रपानामुळे श्वसनमार्गावर, तसेच फुफ्फुसांवर विपरीत परिणाम होतो. दरवर्षी लाखो लोकांचा धुम्रपानासंबंधित आजारामुळे मृत्यू होतो. त्यामुळे ही गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट आहे. हात…
उन्हाळ्यात ताक हवेच
उन्हाळ्यात सतत थंड पदार्थ खाण्यापिण्याला प्राधान्य दिले जाते. लिंबू सरबत, उसाचा रस, नारळपाणी याबरोबरच आणखी एका पेयाला प्राधान्य दिले जाते, ते म्हणजे ताक. सामान्यपणे ताकाचे सेवन केले जाते; कारण ताक पिण्याचे अनेक फायदे आहेत. वजन कमी करण्यासाठी ताकात काळे मीठ मिसळून पिण्याने फायदा होतो. उन्हाळ्यात…
थकवा पळवा
सतत थकवा जाणवण्यामागे कोणतेही एक कारण नाही. नैराश्यात असताना थकवा जाणवतो. भूक कमी होते. यामुळे झोपेवरही दुष्परिणाम जाणवतो. ताण ओळखून नैराश्य दूर करण्याचा प्रयत्न केल्यास थकवा दूर होतो. त्यासाठी समुपदेशन आणि जीवनशैलीतील बदल हे विषयदेखील महत्त्वाचे ठरतात. ‘बी-१२’ व ‘डी जीवनसत्व’ ची कमतरता हेदेखील थकव्यामागचे…
उन्हाळ्यात खावेत असे पदार्थ
उन्हाळ्यात शरीराला उष्णता देणारे पदार्थ खाल्ले तर आपण आजारी पडू शकतो. या हंगामात, अशी फळे आणि भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे शरीराला अतिरिक्त थंडावा मिळतो. उष्माघाताचा प्रभाव कमी होतो. उन्हाळ्यात हे पदार्थ खाणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. नारळ पाणी : उन्हाळ्यात पोषकतत्वांनी युक्त नारळ…
बाळाची आंघोळ
बाळाची त्वचा नाजूक असल्याने त्याला आंघोळ घालताना आईला फार भीती वाटत असते. काळजी करू नका. आंघोळीसाठी वापरलेल्या साबणाने तसेच बाळाच्या अंगावरील तेलामुळे हात चटकन निसटू शकतो. त्याबाबत सावध रहा. बाळाला आंघोळीसाठी घेऊन जाण्यापूर्वी त्याला तेलाने छान हलक्या हाताने मसाज करा. आंघोळीसाठी आणि आंघोळीनंतर आवश्यक असलेल्या…
औषधयुक्त कोथिंबीर
कोथिंबीर शरीराला अनेक फायदे देते आणि शरीरात अनेक गंभीर आजार होण्यापासून रोखते. कोथिंबीर खाण्याचे काय फायदे आहेत, त्याने कोणते आजार टाळले जातात, याबद्दल महत्त्वाची माहिती इथे जाणून घ्या. कोथिंबीरचे गुणधर्म : कोथिंबीर ही एक नैसर्गिक औषधी वनस्पती आहे. अनेक आरोग्यविषयक समस्यांना आपल्यापासून दूर ठेवते. कोथिंबीरमध्ये…
फळांचा रस प्राशन करताना
खूप जणांना सकाळच्या वेळी उपाशीपोटी फळांचा रस घेण्याची सवय असते. ज्यांना फळ खाणे विशेष आवडत नाही, मात्र फळांचा रस आवडतो, अशी मंडळी सकाळी उठल्या उठल्या हा रस प्राशन करतात. आपण जाहिरातींमध्ये किंवा मालिकांमध्ये जेवणाच्या टेबलवर न्याहारीसाठी असे फळांचे रस ठेवलेले पाहतो. त्यामुळे हा रस म्हणजे…
नाभीत तेल घालण्याचे फायदे
भारतामध्ये प्राचीन काळापासून शरीराच्या काही भागांना मालिश करण्यात येते. हात, पाय आणि नाभी अर्थात बेंबीच्या ठिकाणी तेलाने मालिश केल्यास अनेक फायदे मिळतात. पारंपरिकतेनुसार नाभीमध्ये तेल घालणे हे अधिक योग्य असून आरोग्य उत्तम राखण्यास मदत करते. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे नाभीमध्ये तेल घालून मालिश केल्याने पोटातील दुखणे कमी…
आरोग्यवर्धक नारळपाणी
नारळपाणी हे एक नैसर्गिक पेय आहे. शरीरासाठी ते अत्यंत गरजेचे आहे. शरीराला ऊर्जा पुरविण्याची क्षमता या पाण्यात असते, म्हणूनच रूग्ण, गरोदर महिलांना नारळपाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. नारळपाणी हे मानवजातीसाठी एक वरदान आहे, म्हणून ते आवर्जून प्यावे. नारळाच्या पाण्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याची क्षमता असते. कोलेस्ट्रॉल…
आरोग्यवर्धक फळे
फळे केवळ चविष्ट आहेत म्हणून ती खाण्यापेक्षा ती आरोग्यवर्धक आहेत म्हणून खावीत. यासाठी फळांमध्ये कोणते गुणधर्म आहेत, हे जाणून घ्यायला हवे, नाही का ? फायबरचे प्रमाण जास्त असलेले सफरचंद बद्धकोष्ठतेवर उपचार करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास ते मदत करू शकते. लोह्समृद्ध…
अ जीवनसत्वाचे महत्त्व
‘अ’ जीवनसत्व शरीरासाठी फार आवश्यक आहे. ‘अ’ जीवनसत्वाच्या अभावामुळे मुलांची दृष्टी कमी होते. रातांधळेपणा होतो. हा अभाव जर खूपच असेल, तर त्यामुळे कायमचे अंधत्वही येऊ शकते.‘अ’ जीवनसत्वाची कमतरता असलेल्या मुलांमध्ये अंधत्व एकदम येत नाही. निदान लवकर झाल्यास ‘अ’ जीवनसत्वाने समृध्द असा आहार देऊनही समस्या दूर…
डाएटिंग करा पण विचारानेच
बदललेली जीवनशैली, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे लोकांमध्ये वजनवाढीची समस्या दिसून येत आहे. वजन कमी करण्यासाठी लोक डाएटिंग करू लागले आहेत. डाएटिंगचे शरीरावर नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात, हे लक्षात ठेवा. डाएटिंगमुळे शरीराला अनेक प्रकारे हानी पोहोचते. व्यक्ती पुरेसे अन्न खात नाही, उपाशी राहते त्यावेळेस शरीराला…
हृदयाचे आरोग्य जपावे
अलीकडे हृदयविकाराचे प्रमाण खूप वाढलेले आहे. हृदयाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आहारात कडधान्य असणे खूप महत्त्वाचे आहे. रोजच्या आहारात गव्हापासून बनविलेली लापशी ते नाचणी, बाजरी यासारख्या गोष्टींचा समावेश करा. ब्रेड आणि पास्ता खाणे पूर्णपणे टाळा. धान्यांमध्ये फायबर तसेच खनिजे आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात….
पौष्टिक काळा तांदूळ
तांदूळ हे भारतीय खाद्यपदार्थांमध्ये समाविष्ट असलेले महत्त्वाचे धान्य आहे. हे जरी खरे असले, तरी पांढरा तांदूळ हा मधुमेहाच्या रुग्णांसाठी विषासमान मानला जातो. पांढऱ्या तांदूळामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते. मधुमेह हा असा आजार आहे, ज्यामध्ये भरपूर आहार टाळावा लागतो. मधुमेहींकरिता एक भात असा आहे, जो…
आरोग्यवर्धक लिंबू पाणी
लिंबू पाणी पिणे आरोग्यासाठी लाभदायक आहे. लिंबू पाणी मुळातच चवदार असते. या पाण्यात अनेक पोषकतत्त्वे असतात. हे पाणी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. लिंबू पचनासाठीही खूप प्रभावी मानले जाते. लिंबामध्ये जीवनसत्व-सी भरपूर प्रमाणात आढळते. वजन कमी करण्यासाठीही लिंबू पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. अनेकजण सकाळची सुरुवात…
यकृतासाठी उपयुक्त पदार्थ
यकृत हा शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. जीवनसत्त्वे, खनिजे आणि अगदी कार्बोहायड्रेट्सच्या साठवणुकीपर्यंतची कामे यकृत करते. चांगले आरोग्य राखण्यासाठी यकृत निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे. काही नेहमीच्या आहारातील पदार्थ यकृताचे आरोग्य चांगले ठेवण्यात मदत करतात. लिंबाचा रसलिंबाच्या रसात ‘सी’ जीवनसत्व असते. लिंबू अँटिऑक्सिडंट्सचा समृद्ध स्रोत…
डेंग्यूबाबत सतर्कता गरजेची
पावसाळा आपल्यासोबत आल्हाददायक वातावरण घेऊन येतो. त्याच वेळी अनेक आजार लोकांना आपला बळी बनवतात. या हंगामात अनेक जलजन्य रोगांचा धोका वाढतो. डेंग्यू अशाच आजारांपैकी एक आहे. याचे रुग्ण सध्या देशात झपाट्याने वाढत आहेत. राजधानी दिल्लीत गेल्या दोन महिन्यांत 900 हून अधिक डेंग्यू रुग्णांची नोंद झाली…
आरोग्यवर्धक तुळस
तुळस ही धार्मिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त वनस्पती आहे. तुळशीची पूजा केली जाते. तसेच आयुर्वेदिक औषधे बनवली जातात. प्राचीन काळापासून अनेक आजारांच्या उपचारात तुळशीचा वापर केला जात आहे. तुळशीची पाने खाल्ल्याने तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहू शकता. हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, मधुमेह यांसारख्या आजारांपासून ते दूर…
केशरचे सेवन लाभदायक
केशर ही सर्वात शक्तीशाली औषधी वनस्पतीपैकी एक आहे. केशरच्या सेवनाने आरोग्याला अगणित फायदे मिळतात. यामध्ये सर्व आवश्यक पोषक घटक असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. केशरमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. ही शरीराला ऊर्जा देतात. प्रथिने, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि अँटिऑक्सिडंट्ससारख्या खनिजांचा खजिना आहे. केशरच्या सेवनाने…
शाकाहारी खाण्याचे फायदे
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला सर्व पोषकतत्वांची गरज असते, अशा परिस्थितीत फक्त शाकाहारी पदार्थांच्या मदतीने शरीरातील सर्व जीवनसत्त्वांची कमतरता दूर करता येते. ताजी फळे, भाज्या खाल्ल्याने आपण तंदुरुस्त रहाल. जाणून घेऊया शाकाहारी खाण्याचे फायदे ! अति मांसाहार करण्यामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार होण्याचा…