नळदुर्ग किल्ला
नळदुर्ग हा महाराष्ट्रातील एक प्राचीन किल्ला उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात आहे. हा भुईकोट किल्ला आहे. विलक्षण सौंदर्य असलेला हा किल्ला अप्रतिम आहे.तो पाहण्यासाठी पर्यटकांची फार गर्दी दिसते. किल्ल्याची तटबंदी जवळजवळ ३ कि.मी. लांब पसरली असून तटबंदीत ११४ बुरूज आहेत. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाकडे या किल्ल्याचा…
रामलिंगअप्पा लामतुरे संग्रहालय
संग्रहालये ही इतिहासाची सर्वंकष माहिती देणारी जिवंत दालनेच असतात, असे म्हणायला हरकत नाही ! या संग्रहालयांना इतिहासप्रेमी पर्यटक आवर्जून भेट देत असतात. देशासह विदेशातील संग्रहालये पाहणारे पर्यटकही अनेक आहेत. इतिहास जागविण्यासाठी संग्रहालये असणे गरजेचे आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथे ऐतिहासिक रामलिंगअप्पा लामतुरे संग्रहालय आहे. या…
चारठाणातील मंदिरे
महाराष्ट्राच्या अनेक भागांमधील मंदिरांची वास्तुरचना खरोखरच डोळे दिपविणारी अशी आहे. परभणीतील जिंतूर तालुक्यात अशी काही सुंदर मंदिरे पहायला मिळतात. त्यात चारठाणा गावाचा उल्लेख करता येईल. येथे अनेक मंदिरे असून ती पुरातन असल्याने पाहण्यासाठी पर्यटकही आवर्जून जातात. या मंदिराचे बांधकाम हेमाडपंती आहे. चारठाणा हे एक लोकप्रिय…
आगोंद समुद्रकिनारा
आगोंद समुद्रकिनारा हा दक्षिण गोव्यातील एक शांत आणि सुंदर समुद्रकिनारा आहे. ज्यांना किनाऱ्यावरील शांततापूर्ण वातावरणाचा अनुभव घ्यायचा असेल, गर्दी, गडबड-गोंगाटापासून दूर वेळ घालवायचा असेल अशा पर्यटकांसाठी हे चांगले ठिकाण आहे. गोव्यातील हा समुद्रकिनारा जवळजवळ दोन मैलांपर्यंत पसरलेला आहे. या किनाऱ्यावर उत्कृष्ट खाद्यपदार्थ आणि पेये मिळतात….
औसा किल्ला
महाराष्ट्रातील गडकिल्ले हे राज्याचे वैभव आहे. असाच एक भुईकोट किल्ला लातूरमध्ये औसा शहराच्या बाजूला आहे. हा किल्ला औसा किल्ला म्हणून ओळखला जातो. बहामनी राजवटीत इ.स.१४६६ मध्ये महमूद गवान याने वजीर असताना हा किल्ला बांधला. अगदी जवळ गेल्याशिवाय हा किल्ला दिसत नाही. किल्ल्यातील काही वास्तू व…
हत्ती बेट
‘हत्ती बेट’ नावाचे निसर्गरम्य ठिकाण महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात आहे. प्राचीन काळापासून या स्थळाला महत्त्व प्राप्त झाले आहे. उदगीर या प्रसिद्ध शहरापासून साधारण पंधरा ते सोळा किलोमीटरच्या अंतरावर आहे. हत्ती बेटावर पुरातन मंदिरे, गुहा व कोरीव शिल्पे मोठ्या प्रमाणात पहायला मिळतात. या बेटास ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे….
उस्मानाबादमधील सिद्धक्षेत्र कुंथलगिरी
उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यात सिद्धक्षेत्र कुंथलगिरी हे एक धार्मिक क्षेत्र आहे. कुंथलगिरी हे ठिकाण उस्मानाबाद येथून सोलापूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर ६० किमी अंतरावर आहे. तेथे जाण्यासाठी बस तसेच खासगी वाहनांची सोय आहे. हा परिसर कुलभूषण व देशभूषण या मुनिवरांचे मोक्षस्थान समजला जातो. याठिकाणी श्री शांतीसागर महाराजांची…
आश्वे-मांद्रे किनारे
उत्तर गोव्यातील आश्वे आणि मांद्रे सागरकिनारे देशी-विदेशी पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहेत. आश्वे किनारा हा उत्तरेकडील समुद्रकिनाऱ्याचा एक मोठा भाग आहे. हा भाग मोरजी किनाऱ्यापासून पुढे सुरू होतो. आश्वे, मांद्रेनंतर पुढे हरमल किनाऱ्याकडे जातो. आश्वे हा एक सुंदर समुद्रकिनारा आहे. याच्या मागील बाजूस सुंदर पामची झाडे आहेत….
अंतूरगड किल्ला
उत्तुंग मजबूत गडकिल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहे. या किल्ल्यांनी जवळपास अवघा महाराष्ट्र व्यापला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात अजंठा-सातमाळा या सह्याद्रीच्या रांगेवर अंतुरगड आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाच्या संरक्षणाखाली हा किल्ला आहे. अंतूरच्या किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. यातील एक मार्ग कन्नडकडून गौताळा अभयारण्यामधून जातो….
संजीवनी बेट
महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात एक लोकप्रिय हिरवीगर्द टेकडी आहे. हे एक जैवसमृद्ध असे क्षेत्र आहे. ‘वडवळ नागनाथ’ गावाजवळ असलेली ही टेकडी तिच्या वैशिष्ट्यपूर्णतेमुळे ‘संजीवनी बेट’ म्हणून ओळखली जाते. हे ठिकाण चाकूरपासून १६ किमी अंतरावर असून लातूर शहरापासून ३९ किमी अंतरावर आहे. संजीवनी बेटास ‘वडवळ नागनाथ बेट’…
यमाई देवी मंदिर
साताऱ्यापासून ४४ किमी आणि पाचगणीपासून ६३ किमी अंतरावर, यमाई देवी मंदिर हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील औंध येथे डोंगरमाथ्यावर वसलेले एक प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रात खूप पूजनीय आहे आणि सातारा येथे भेट देण्याच्या शीर्षस्थानांपैकी एक आहे. यमाई देवी ही अनेक महाराष्ट्रीय कुटुंबांची कुलदैवत आहे….
बागा समुद्रकिनारा
बागा समुद्रकिनारा हा गोव्यातील सर्वात आनंददायक समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. येथे जलक्रीडा, उत्तम जेवणाची रेस्टॉरंट्स, बार आणि क्लब आढळतात. बागा किनारा हा कळंगुट आणि अंजुणा सागरकिनाऱ्यांच्या सीमेवर आहे. जलक्रीडा हे बागा किनाऱ्याचे प्रमुख आकर्षण आहे. पॅरासेलिंग, वेकबोर्डिंग, विंडसर्फिंग, काइट सर्फिंग, जेट स्कीइंग हे काही जलक्रीडा प्रकार…
धारूर किल्ला
बीड जिल्ह्यातील धारूर येथे राष्ट्रकुटांच्या काळात शहराचे संरक्षण करण्यासाठी ‘महादुर्ग’ नावाचा किल्ला बांधण्यात आला. याला धारूर किल्ला असे नाव आहे. त्या किल्ल्यात भर घालून त्यानंतरच्या राज्यकर्त्यांनी या किल्ल्यात नवीन बांधकामे केली. त्यामुळे आजही किल्ला व त्यातील अवशेष बऱ्यापैकी शाबूत आहेत. येथे किल्ल्याबरोबरच अंबेजोगाईचे मंदिर, लेणी,…
धाराशिव लेणीसमूह
लेणी हा कोणत्याही भागाचा एक ऐतिहासिक ठेवा असतो. त्या लेण्या संबंधित भागातील सांस्कृतिक समृद्धी वाढवितात. मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात आकर्षक एक प्राचीन लेणीसमूह आहे. येथील शैव लेणी धाराशिवपासून ५ कि.मी. अंतरावर असून त्यांना ‘चांभार लेणी’ असेही म्हणतात. या लेण्यांसमोर एक देखणे शिव मंदिर आहे. या लेण्यांकडे…
जाळीचा देव
जालना जिल्ह्यात अजिंठ्यापासून २८ किलोमीटर आणि बुलढाण्यापासून २५ किलोमीटरवर महानुभावपंथीयांचे ‘जाळीचा देव’ हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. महानुभाव पंथामधील भाविकांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. येथे श्री चक्रधरस्वामी ही काळ वास्तव्यास होते. औरंगाबादपासून जाळीचादेव अंतर १२१ किमी आहे. जळगावपासून जाळीचा देव अंतर ९३ किमी आहे….
कोर्लई बीच
कोर्लई बीच हे मुंबईच्या लपलेल्या रत्नांपैकी एक आहे. अलिबाग शहरापासून थोड्या अंतरावर कोर्लईच्या लहान मच्छीमार गावात मुख्य समुद्रकिनारा आहे. महाराष्ट्राच्या नेहमीच्या वाळूच्या किनाऱ्याच्या उलट, पावसाळ्यात हिरव्या-पिवळ्या तणांनी, गुलाबी ऑक्सॅलिस फुलांनी आणि गवताळ कुरणांनी भरलेला हा किनारा. गरम उन्हाळ्यात आणि अत्यंत हिवाळ्यात, तथापि, मखमली आवरणाशिवाय समुद्रकिनारा…
प्रबळगड किल्ला
प्रबळगड किल्ला महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात असे आणखी दुर्गम किल्ले आहेत. जिथे कथा पर्यटकांना रोमांचित करतात. हा किल्ला माथेरान आणि पनवेल दरम्यान आहे. त्याच्या संरचनेमुळे आणि उंचीमुळे, याला भारतातील सर्वात उंच आणि सर्वात धोकादायक किल्ला म्हटले जाते. जुने किल्ले आणि वास्तू पाहणाऱ्या लोकांमध्ये हा किल्ला नेहमीच…
लवासा
महाराष्ट्रात स्थित, लवासा हे भारतातील नवीन हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते. हे शहर पोर्टोफिनो या इटालियन शहरावर आधारित एक सुंदर प्रकल्प आहे. लवासा 7 टेकड्यांवर पसरलेले आहे आणि 25000 एकर क्षेत्र व्यापलेले आहे. लवासा हे सौंदर्य आणि पायाभूत सुविधांचे एक आदर्श मिश्रण आहे जे पर्यटकांना…
श्री क्षेत्र कपिलधार
बीड जिल्ह्यात श्री क्षेत्र कपिलधार हे एक निसर्गरम्य तीर्थक्षेत्र आहे. कपीलधार येथे मन्मथस्वामी यांची संजीवन समाधी आहे. या समाधीला 459 वर्षे पूर्ण झाली आहेत. हे क्षेत्र वीरशैव समाजाचे श्रद्धास्थान आहे.येथील धबधबा पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. हा धबधबा ‘कपिलधार धबधबा’ म्हणूनच ओळखला जातो. तुलसीविवाहाच्या वेळी येथे…
कोलवा किनारा
कोलवा हे गोव्यातील दक्षिण गोवा जिल्ह्यातील एक किनारपट्टीचे गाव आहे. हा किनारा साधारणपणे सुमारे 2.5 किमी आहे.या गावात आज पोर्तुगीजकालीन उच्चभ्रू घरे आणि आधुनिक व्हिला आहेत. येथे 300 वर्षांहून अधिक काळातील अनेक अवशेष पहायला मिळतात. आठवड्याच्या शेवटी येथे पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. जगभरातील तसेच भारतीय…
गडगडा किल्ला
नाशिकपासून साधारणपणे १८ किलोमीटर अंतरावर ‘गडगड सांगवी’ हे एक गाव आहे. या गावाच्या मागे ‘अंबोली पर्वत’ नावाने प्रसिद्ध असणारी डोंगररांग आहे. या पर्वतरांगेत तीन शिखरांनी डोके वर काढलेले दिसते. उजवीकडील शिखर ‘अंबोली‘ व डावीकडील शिखर ‘अघोरी’ या नावाने ओळखले जात असून या दोन शिखरांमध्ये ‘गडगडा…
आजा पर्वत
बालाघाट रांगेत रतनगड आणि हरिश्चंद्रगड यांच्या मधोमध ‘आजा पर्वत’ उर्फ ‘आजोबाचा डोंगर’ आहे. ठाणे जिल्ह्यातील हा गड हरिशचंद्र अभयारण्याचा भाग आहे. येथे घनदाट अरण्याचे दर्शन घडते. येथे वाल्मिकी आश्रम असल्यामुळे या भागाला तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे. गडाच्या नावाला एक इतिहास आहे. असे म्हणतात की, या गडावर…
भद्र मारुती मंदिर
छत्रपती संभाजीनगरजवळील खुल्ताबाद येथे भद्र मारुती हे एक प्राचीन मंदिर आहे. वेरुळ लेण्यांपासून चार किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. येथील मारूती नवसाला पावणारा असून हे अत्यंत जागृत स्थान असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. वैशिष्ट्य म्हणजे येथील मूर्ती शयनावस्थेत आहे. प्रयागराज येथील मंदिर आणि मध्य प्रदेशातील ‘जाम…
वागातोर समुद्रकिनारा
वागातोर हा एक गोव्यातील गजबजलेला किनारी भाग आहे. हा समुद्रकिनारा त्याच्या सुंदरतेसाठी ओळखला जातो. हा किनारा मेजवान्यांसाठी प्रसिद्ध आहे. तरुण लोक या मेजवान्यांना हजेरी लावतात. येथील ‘सी व्ह्यू बार’ आणि क्लबमधून सूर्यास्त पाहण्यासाठी लोक येथे उपस्थित राहतात. येथील रेस्टॉरंटमध्ये जगभरातील पाककृती आढळतात.वागातोर किनाऱ्यावर अनेक क्रियाकलाप…
कुंजरगड किल्ला
बालाघाट डोंगररांगेवर ‘कुंजरगड’ हा एक किल्ला आहे. पायथ्याशी असलेल्या गावातून हा गड हत्तीसारखा प्रचंड दिसतो. या किल्याशीचे दुसरे नाव ‘कोंबडगड’ असेही आहे. पावसाळ्यात या भागात मुसळधार पाऊस पडतो. पावसाळा ऐन भरात असताना या भागातील किल्ल्यांवर जाणे टाळावे. पण जर केवळ पावसात मनसोक्त भिजत किल्ला पहायचा…