राजूरचे गणेश मंदिर
जालना शहरातील राजूर परिसरात एक देखणे गणेश मंदिर आहे. शहरापासून पंचवीस किंमी अंतरावर हे मंदिर आहे. गणेश चतुर्थी, अंगारकी चतुर्थी तसेच विनायकी चतुर्थीदिवशी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून येथे परिवहन महामंडळाच्या बसगाड्या उपलब्ध असतात. गणेश पुराणानुसार, हे स्थळ भगवान गणेशाच्या संपूर्ण पिठांपैकी…
मोबोर किनारा
गोव्यातील मोबोर सागरकिनारा हा पर्यटनासाठीचे एक आकर्षणाचे ठिकाण आहे. येथे बरेच उत्सव आणि उपक्रम नेहमीच चालू असतात. निसर्गप्रेमींसाठी हे गोव्यातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी हे एक आहे. फुललेल्या लिली, वाळूचे ढिगारे अशी सुंदर नैसर्गिक वैशिष्ट्ये येथे पहायला मिळतात. ज्या लोकांना गोव्याचे दैनंदिन जीवन संपूर्णपणे अनुभवायचे आहे, किंवा…
सिध्दगड किल्ला
प्राचीन काळी कल्याण बंदरात उतरणारा माल जुन्नर या बाजारपेठेत नेण्यासाठी विविध व्यापारी मार्गांचा वापर होत होता. यातील कल्याण – म्हसा – अहुपे घाट – जुन्नर हा एक मार्ग होता. हा व्यापारी मार्ग आणि अहुपे घाटावर नजर ठेवण्यासाठी सिध्दगड या किल्ल्याची निर्मिती केली होती. ठाणे जिल्ह्यातील…
वृंदावन मनोरंजन उद्यान
चाकूरमधील वृंदावन मनोरंजन उद्यान हे आबालवृद्धांचे आवडते ठिकाण आहे. लातूरच्या मुख्य शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर हे स्थळ आहे. पर्यटकांसाठी थेट उद्यानापर्यंत जाणाऱ्या अनेक कॅब आणि टॅक्सी सेवा येथे आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या नियमित बसगाड्याही येथे उपलब्ध असतात. चाकूर येथील सीमा सुरक्षा दलाच्या केंद्राजवळ हे पार्क…
सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहाचा आदर्श
सिंधुदुर्गातील जिल्हा कारागृहातील कैद्यांनी संपूर्ण महाराष्ट्रासमोर एक आदर्श ठेवला आहे. या कारागृहातील बंदिवानांनी भाजीपाला लागवड केली आहे. कारागृहाच्या आतील परिसरामधील दोन एकर क्षेत्रामध्ये या कैद्यांनी भाजीपाल्याची लागवड केली आहे. याठिकाणी मुबलक प्रमाणावर असलेल्या जमिनीवर लागवड करण्याचा निर्णय् घेण्यात आला. खुल्या कारागृहातील बंदी अहोरात्र या लागवडीसाठी…
मूग डाळ टोस्ट रेसिपी
मूग डाळ टोस्ट ही एक अतिशय आरोग्यदायी आणि चवदार रेसिपी आहे, जी तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्तासाठी काही मिनिटांत बनवू शकता. एवढेच नाही तर मुलांच्या टिफिनसाठीही हा एक चांगला आणि चविष्ट पर्याय आहे. जर तुम्हाला तुमच्या मुलांना जंक फूडच्या सवयीपासून मुक्त करायचे असेल तर…
मुलांमधील नैराश्य पळवा
सध्या झपाट्याने बदलणारी जीवनशैली लोकांना अनेक समस्यांना बळी पाडत आहे. वाढत्या कामाचा ताण आणि इतर समस्यांमुळे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक समस्याही लोकांना सतावत आहेत. नैराश्य ही अशीच यापैकी एक समस्या आहे. यामुळे आजकाल बरेचजण प्रभावित झाले आहेत. लहान मुलेही या दिवसांत नैराश्याची बळी ठरत…
टॅनिंगची समस्या
सूर्यप्रकाशामुळे होणारे टॅनिंग शरीरावर कुठेही चांगले दिसत नाही. ते दूर करण्यासाठी अनेक उपायांचा अवलंब केला जातो. अगदी पार्लरमध्ये जाऊन ‘मॅनिक्युअर’ आणि ‘पेडीक्युअर’ करून घेतले जाते. टॅनिंग सगळ्यांनाच होत असते, पण काहींना कमी तर काहींना जास्त होते. गोरे आणि सुंदर पाय टॅन झाले तर ते चंद्रावरील…
कैरी आरोग्यासाठी लाभदायक
उन्हाळा म्हणजे आंबा खाण्याचा ऋतू आहे. कच्चे आंबे अर्थात कैरी तर सर्वांनाच प्रिय असते. कैरीवर तिखट आणि काळे मीठ लावून खाणे या कल्पनेनेच आजही तोंडाला पाणी सुटते. ही कैरी आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. म्हणूनच आंब्याला ‘फळांचा राजा’ म्हटले जाते. यामध्ये ‘क’ जीवनसत्व, ‘ए’ जीवनसत्व, फायबर…
घड्याळ निर्मिती
घड्याळ निर्मिती उद्योगाने उच्च दर्जाच्या उत्पादनांनी जग जिंकले आहे. हा उद्योग प्रामुख्याने लक्झरी विभागात चालतो. गुणवत्तेच्या बाबतीत स्वित्झर्लंड हा क्लासिक घड्याळांचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार आहे. इसवी सन पूर्व दोनशे पन्नास पासून कालमापनाचे पुरावे आढळतात. भारतात ‘घटिकापात्र’ अनेक शतकांपासून वापरात होते. त्यात त्रुटी होत्या. जसे…
सुगंधित मेणबत्त्या
मेणबत्ती बनवणारे व्यवसाय मेणापासून मेणबत्त्या तयार करण्यात माहिर आहेत. मेणबत्त्या वेगवेगळ्या कारणांसाठी वापरल्या जातात, ज्यात घराची सजावट, जेवण, स्व-काळजी उपचार आणि धार्मिक कार्ये यांचा समावेश होतो. मेणबत्ती बनवणे सर्जनशील लोकांसाठी योग्य आहे कारण त्यात विविध रंग, आकार, सुगंध आणि डिझाइनसह प्रयोग करणे समाविष्ट आहे. सुगंधित…
स्ट्रॉबेरी शेती
लालचुटुक आंबटगोड स्ट्रॉबेरी पाहून कुणाच्या तोंडाला पाणी सुटणार नाही ! महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी हे एक महत्त्वाचे फळ पीक आहे. स्ट्रॉबेरीचे व्यावसायिक उत्पादन देशातील समशीतोष्ण आणि उप-उष्णकटिबंधीय भागात शक्य आहे. भारताचा विचार करता महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली…
केशव बालाजी देवस्थान
लातुरमधील औसा तालुक्यात केशव बालाजी देवस्थान आहे. आंध्रप्रदेशातील तिरुमलाच्या धर्तीवर हे मंदिर उभारले असून मंदिराला भव्य सभामंडप आहे. वैविध्यपूर्ण बांधकाम आहे. शहराच्या वर्दळीपासून दूर टेकडीवर निसर्गम्य वातावरणात हे मंदिर आहे. वर्षातून दोनवेळा येथे मोठे धार्मिक कार्यक्रम होतात. हे मंदिर सर्व दिवस सकाळी 6 वा.पासून रात्री…
बेताळभाटी किनारा
बेताळभाटी किनारा हा कोलवा आणि माजोर्डा या किनाऱ्यादरम्यान आहे. पर्यटकांमध्ये हा ‘सनसेट बीच’ म्हणून प्रसिद्ध आहे. येथे सूर्यास्ताची चित्तथरारक दृश्ये दिसतात. बेताळभाटी किनाऱ्याला भेट देण्यामागचे दुसरे कारण म्हणजे येथे डॉल्फिन पहायला मिळतात. येथे गेल्यावर स्थानिक मच्छिमारांना सुंदर डॉल्फिन स्पॉटिंगसाठी घेऊन जाण्याची विनंती केल्यास ते तुम्हाला…
बिष्टा किल्ला
नाशिक जिल्ह्यातील बागलाण भागात बिष्टा, कर्हा , दुंधा, अजमेरसारखे किल्ले आहेत. सटाणा तालुक्यातील दुंधेश्वर डोंगररांगेवर हे किल्ले आहेत. या किल्ल्याचा वापर चौकीचा किल्ला म्हणून जात होता. ‘बिष्टा’ किल्ला ‘बिजोट्याचा किल्ला’ या नावानेही ओळखला जातो. हा किल्ला ‘कोटबेल’ गावापासून जवळ आहे. ‘कोडबेल’ हे गाव ‘बिष्टा’ किल्ल्याच्या…
कपिलधार धबधबा
बीड जिल्ह्यातील काही पर्यटनस्थळांपैकी श्री क्षेत्र कपिलधार हे एक मनोहर ठिकाण आहे. बीड शहराच्या दक्षिणेला १९ किमी. अंतरावर मांजरसुभा हे गाव आहे. बीड, अहमदनगर उस्मानाबाद व अंबेजोगाईस जाणारे रस्ते याठिकाणी एकत्र येतात. येथे टेकड्यांच्या परिसरात ‘कपिलधार’ नावाचा धबधबा आहे. कपिलधार येथे मन्मथस्वामी यांची संजीवन समाधी…
समुद्रातील द्वारका पाहण्याची सुवर्णसंधी
गुजरात सरकार समुद्रात बुडालेले द्वारका शहर पर्यटकांना दाखविणार आहे. यामुळे समुद्राच्या तळाशी तीनशे फूट खालवर असलेल्या श्रीकृष्णाच्या द्वारकेचे भाविकांना दर्शन घेता येणार आहे. देशात प्रथमच अशा प्रकारचे धार्मिक पर्यटन होणार आहे. भारतीय पुरातत्व विभागाने पाच हजार वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेली श्रीकृष्णाची द्वारका नगरी शोधून काढली आहे….
भुवया व पापण्यांचे सौंदर्य
सुंदर डोळे चेहऱ्याच्या सौंदर्यात भर घालतात. भुवया आणि पापण्या हलक्या किंवा अगदी बारीक असतील तर आपल्या डोळ्यांचे सौंदर्य कमी होणे स्वाभाविक आहे. ‘थ्रेडिंग’ आणि ‘प्लकिंग’मुळे काही महिलांच्या भुवया आणि पापण्यांवरील केस कमी होतात, किंवा काही महिलांचे केस कमी होतात. मुळातच कमी केस असल्यास ते पेन्सिलने…
मॅग्नेशियम समृध्द अन्नपदार्थ
मॅग्नेशियमने समृध्द अन्न आपल्या शरीरासाठी पोषक आहे. मॅग्नेशियमची कमतरता व्यक्तीला लवकर वृद्धत्वाकडे घेऊन जाते. प्रथिने, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम शरीराच्या विकासासाठी, शरीरास शक्ती मिळण्यासाठी आणि हाडे मजबूत करण्यासाठी देखील आवश्यक आहे. त्यामुळे त्यांची कमतरता लवकरात लवकर पूर्ण करणे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. ही कमतरता आपण…
पिठाचे स्वादिष्ट लाडू
साहित्य : गव्हाचे पीठ – एक कप, देशी तूप – एक कप, पिठीसाखर – कप, सुका मेवा – अर्धा कप, वेलची पावडर अर्धा लहान चमचा. कृती : पिठाची पिन्नी बनविण्यासाठी प्रथम एका कढईत देशी तूप टाकावे. मध्यम आचेवर गरम करावे. आता त्यात पीठ घालावे. आणि…
सकारात्मकता महत्वाची
नकारात्मकतेने भरलेल्या वातावरणात स्वत:ला शांत आणि सकारात्मक ठेवणे फार कठीण आहे. अशा वातावरणात जास्त वेळ राहिल्याने मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यावर उपाय शोधणे महत्त्वाचे आहे.सकारात्मक वातावरणात आपण अधिक आनंदी आणि अधिक उत्साही राहू शकता. नकारात्मकतेपासून दूर राहण्यासाठी वेळ काढून अशा गोष्टी कराव्यात, ज्यामुळे…
भारतीय सीमांवर सुरक्षा अधिक मजबूत
भारतीय सीमा सुरक्षा दलाने देशाच्या सीमांवर सतर्कता वाढवली असून, लष्कराच्या सहकार्याने संयुक्त सीमा व्यवस्थापन सुरू केले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पश्चिम सीमेवर विशेष योजना राबविण्यात आली आहे. पंजाब, राजस्थान, जम्मू–काश्मीर आणि गुजरातसारख्या सीमावर्ती भागांमध्ये रात्रीच्या गस्तीसह नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. बांगलादेश सीमेलगतही चौकशी, गस्त…
न्यूझीलंड चीन यांच्यात नवीन व्यापार करार
न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन चीनच्या राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी चर्चा करण्यासाठी बेइजिंग येथे आले आहेत. हा त्यांच्या कार्यकाळातील चीनचा पहिला अधिकृत प्रवास असून, त्यांनी येथे व्यापार, शिक्षण, पर्यटन आणि सुरक्षा यासारख्या महत्वाच्या विषयांवर संवाद साधला . या भेटीचे मुख्य लक्ष व्यापार संबंध मजबूत करण्यावर केंद्रित…
देशातील आदिवासी समाजाच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल
देशातील आदिवासी समाजाच्या जीवनशैलीत गेल्या काही वर्षांत मूलभूत आणि क्रांतिकारी बदल घडून आले आहेत. अनेक दशके दुर्लक्षित राहिलेला हा समाज आता शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सामाजिक सन्मानाच्या दृष्टीने स्वतःचा ठसा उमटवत आहे. केंद्र आणि राज्य सरकारांच्या योजनांसह स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नांमुळे आदिवासी भागात विकासाचे नवे चित्र…
विमानात धूम्रपान बंदी पण ॲशट्रे ठेवणे सुरूच
आजच्या युगात प्रत्येक विमानात धूम्रपान करण्यावर सक्त मनाई आहे. तशा सूचना प्रत्येक जागी स्पष्ट लिहिलेल्या असतात. तरीही अनेकांना आश्चर्य वाटते की, जेव्हा धूम्रपानास बंदी आहे, तेव्हा विमानातील शौचालयात अजूनही ॲशट्रे का ठेवले जातात? यामागे एक महत्त्वाचे सुरक्षा कारण आहे. बहुतेक वेळा नियमांचे उल्लंघन करणारे काही प्रवासी…