रवा इडली
साहित्य : अर्धा किलो रवा, १ लहान चमचा मीठ, अर्धा लहान चमचा मोहरी, १०-१२ कढीपत्त्याची पाने, ३०० ग्रॅम आंबट दही, १ लहान चमचा खाण्याचा सोडा आणि तेल. कृती : एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी आणि चिरलेला कढीपत्ता व रवा घालावा. थोडासा भाजून गॅस…
साहित्य : अर्धा किलो रवा, १ लहान चमचा मीठ, अर्धा लहान चमचा मोहरी, १०-१२ कढीपत्त्याची पाने, ३०० ग्रॅम आंबट दही, १ लहान चमचा खाण्याचा सोडा आणि तेल. कृती : एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी आणि चिरलेला कढीपत्ता व रवा घालावा. थोडासा भाजून गॅस…
सणासुदीचा, लग्नसमारंभांचा हंगाम सुरू आहे. या उत्साहाच्या वातावरणात महिलांना वेशभूषा करण्यासाठी निमित्त आणि चांगली संधी मिळते. सणासुदीच्या काळात महिला सुंदर पोशाख आणि दागिन्यांची निवड करतात. पोशाख कितीही जड असला तरी मॅचिंग ज्वेलरी घातल्याशिवाय एकूणच साज अपूर्ण वाटतो. कपड्यांप्रमाणे दागिन्यांचा ट्रेंडही बदलत राहतो. दागिन्यांमध्ये कानातील दागिने…
बाळाची त्वचा नाजूक असल्याने त्याला आंघोळ घालताना आईला फार भीती वाटत असते. काळजी करू नका. आंघोळीसाठी वापरलेल्या साबणाने तसेच बाळाच्या अंगावरील तेलामुळे हात चटकन निसटू शकतो. त्याबाबत सावध रहा. बाळाला आंघोळीसाठी घेऊन जाण्यापूर्वी त्याला तेलाने छान हलक्या हाताने मसाज करा. आंघोळीसाठी आणि आंघोळीनंतर आवश्यक असलेल्या…
लाकडी पेन्सिल किंवा शिसे पेन्सिल ही प्रत्येक घरातील अत्यावश्यक गोष्ट आहे. ती अनेकदा शिक्षक, विद्यार्थी, कलाकार वापरतात. साधारणपणे, बहुतेक लोक ‘एचबी’ आणि ‘२ बी’ पेन्सिल वापरत असतील, कारण त्या भारतीय बाजारपेठेत प्रसिद्ध असून त्यांची लोकप्रियता जास्त आहे. टॅब्लेट, सेलफोन, कॉम्प्युटर, प्रिंटर आणि इतर उपकरणांच्या आधुनिक…
सोनचाफा हे सर्वात लोकप्रिय फुलझाडांपैकी एक आहे. खोली सुगंधित करण्यासाठी, फुलांच्या हारात, तसेच धार्मिक समारंभांमध्ये, सुशोभिकरणासाठी या फुलांचा उपयोग केला जातो. जमिनीतील नायट्रोजनचे स्थिरीकरण करण्यासाठी हे झाड उपयुक्त आहे. या झाडाची पाने पालापाचोळा देतात. या झाडांमुळे जमिनीचा सामू सुधारतो. मातीतील सेंद्रिय कार्बन आणि फॉस्फरसचे प्रमाण…
प्रत्येक व्यक्ती आपले वाहन सुरक्षित ठेवण्यासाठी धडपडत असते. चारचाकी गाड्या झाकण्यासाठीचे प्लास्टिक आच्छादन, तसेच पावसाळ्यात शरीर भिजू नये यासाठी वापरले जाणारे रेनकोट बनवून ते विकणे हा एक उत्तम चालणारा उद्योग आहे. शहरातील बहुतेक लोक सदनिकांमध्ये राहतात. बहुमजली इमारतींमध्ये प्रत्येक वाहन इमारतीच्या पार्किंगमध्ये लावले जाते. वाहनांच्या…
नव्याने विकसित केलेले वाहनांचे टायर 6 महिने ते वर्षभर वापरले जाऊ शकतात. चारचाकी वाहनांच्या किंमती जास्त असतात, तसेच नवीन टायरच्या किंमतीही जास्त असतात. त्यामुळे जुने टायर प्रक्रिया करून नव्यासारखे केले जातात आणि पुन्हा वापरात आणले जातात. टायर झिजल्यावर नवीन टायर बसवणे आर्थिक दृष्टिकोनातून प्रत्येक वाहनधारकाला…
विविध रंगांमधील जास्वंद फुलाची वनस्पती ही सुंदर आकर्षक फुलांच्या वनस्पतींपैकी एक आहे. मुळात जास्वंदीची फुले म्हटल्यावर डोळ्यासमोर लाल फुले यायची. आता विविध रंगांमध्ये आकर्षक फुले मिळतात. ग्रामीण भागात घरासमोर जास्वंदीची झाडे दिसतात. फुलांनी बहरलेली ही वनस्पती पाहताक्षणी मन वेधून घेते. देवपूजेत या फुलांना मोठा मान…
श्री दुर्गादेवी मंदिर, गुहागर हे महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर या तालुक्याच्या ठिकाणी असलेले एक प्राचीन मंदिर आहे. कोकण प्रांतातील अनेक ब्राह्मण कुटुंबांची ती कुलदेवता मानली जाते. हे मंदिर गुहागर गावाच्या वरच्या बाजूला आहे. मंदिर जवळच्या भागात भक्त निवासासाठी येतात. या मंदिराच्या आजूबाजूला हिरवळ आहे….
रायगड जिल्ह्यात अलिबागजवळ असणारा किहिम सागरकिनारा नितांतसुंदर आहे. या किनाऱ्यावरील पांढरी वाळू आणि उन्हात चमकणाऱ्या पाण्याच्या लाटा पुढचे अनेक दिवस मनात रुंजी घालत राहतात. किनाऱ्यावरील डोलणारी नारळाची झाडे मनाला फार आनंद देतात. हा किनारा तरुण, वृद्ध, दांपत्य, कुटुंब आणि मित्र-मैत्रिणी या सर्व वयोगटांसाठी मोठे आकर्षण…
महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यामध्ये ‘सोनगीर’ किल्ला आहे. मुघल सुभेदार अहमद फारुकी याने आपल्या शासन काळात दुसरा किल्ला बांधला. मध्ययुगीन काळात या किल्ल्यास फार महत्त्व होते. धुळ्यामधून जाणारा आग्रा महामार्ग हा महामार्ग क्रमांक 3 म्हणून ओळखला जातो. या महामार्गावर सोनगीर गावालगतच हा किल्ला आहे. येथे जाण्यासाठी धुळे…
वेंगुर्ला’ हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणारे एक शहर आहे. काजू, आंबा, नारळ आणि विविध प्रकारच्या झाडांनी या शहराची शोभा वाढते. वेंगुर्ला हे एक बंदर आहे. या बंदरावर नेहमी वर्दळ असते. वेंगुर्ला बंदरावरून विशाल समुद्राचे मनोहारी दर्शन होते. येथे वाळूवरून चालण्याचा आनंद घेता येत नाही; पण…
साहित्यः 2 वाट्या चिरलेला पालक, 1 वाटी गव्हाचे पीठ, पाव वाटी हरभरा डाळीचे पीठ, 3 – 4 हिरव्या मिरच्या, ५ – ६ पाकळ्या वाटलेला लसूण, चवीनुसार मीठ, अर्धा छोटा चमचा जिरेपूड, पराठा भाजण्यासाठी तेल. कृती : पालक स्वच्छ धुवून घ्यावा. त्यांनंतर वाफवून घ्यावा. वाफवलेला पालक…
पिठाच्या कोंड्यापासून बनविलेला लेप सौंदर्यवर्धक आहे. उन्हाळ्यात घाम, तसेच उष्णतेमुळे त्वचा रखरखीत होत असते. अशा वेळी रसायनयुक्त लेप वापरण्यापेक्षा घरगुती लेप स्वतःच बनवून त्वचा चमकदार करता येते. चेहऱ्याची त्वचा उजळविण्यासाठी पिठाचा कोंडा उपयुक्त आहे. आणखी साहित्य मिसळून पिठाच्या कोंड्याचा लेप घरी बनविता येतो. यासाठी पिठाचा…
कोथिंबीर शरीराला अनेक फायदे देते आणि शरीरात अनेक गंभीर आजार होण्यापासून रोखते. कोथिंबीर खाण्याचे काय फायदे आहेत, त्याने कोणते आजार टाळले जातात, याबद्दल महत्त्वाची माहिती इथे जाणून घ्या. कोथिंबीरचे गुणधर्म : कोथिंबीर ही एक नैसर्गिक औषधी वनस्पती आहे. अनेक आरोग्यविषयक समस्यांना आपल्यापासून दूर ठेवते. कोथिंबीरमध्ये…
साहित्यः एक वाटी गव्हाचे पीठ, एक वाटी ज्वारीचे किंवा हुरड्याचे पीठ, एक वाटी बाजरीचे पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, एक वाटी पालक, मेथी, कांद्याची पात यापैकी कोणतीही एक, बारीक चिरलेली पालेभाजी, एक बारीक चिरलेला कांदा, पाऊण लहान चमचा वाटलेले आले आणि लसूण, चवीनुसार वाटलेली हिरवी…
टॅल्कम पावडर म्हटली की आपल्या डोळ्यासमोर पांडा, हिमानीसारखे प्रसिद्ध ब्रँडेड डबे येतात. या ब्रँडनी देशातील बहुतांश बाजारपेठ काबीज केली आहे. चेहऱ्यावर लावण्यासाठी वापरल्या जाणार्या टॅल्कम पावडरसारखी उत्पादने त्याच्या गुणवत्तेच्या आधारावर बाजारात विकली जाऊ शकतात. आपणास हा पावडर निर्मिती उद्योग करायचा असल्यास सुप्रसिद्ध ब्रँडशी स्पर्धा करताना…
घरातील दैनंदिन काम संपल्यानंतर जो फुरसतीचा वेळ उरतो, तो वेळ स्त्रिया अनेकदा गप्पाटप्पा करण्यात किंवा टीव्हीवरील मालिका पाहण्यात घालवतात. वेळेचा सदुपयोग करून स्वत:साठी आणि कुटुंबासाठी चांगले उत्पन्न मिळविण्याकरिता अत्तर तयार करण्याचा व्यवसाय निवडू शकता. बाजारात मागणी असणारा आणि माल नाशवंत नसणारा असा हा व्यवसाय आहे….
सफरचंद हे आरोग्यदायी आणि चविष्ट असल्याने इतर फळांच्या तुलनेत सर्वाधिक खपणारे फळ आहे. जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, तामिळनाडू येथे या फळाची लागवड केली जाते. उच्च वापर आणि औषधी मूल्यांमुळे हे सर्वात फायदेशीर फळ पीक देखील मानले जाते. हे एक समशीतोष्ण फळ म्हणून…
सोलापूर जिल्ह्यात गाणगापूर हे दत्तगुरुंचे पवित्र स्थान आहे. ‘भीमा’ आणि ‘अमरजा’ या नद्यांच्या संगमाकाठी हे सुंदर मंदिर आहे. येथे दत्तावतारी श्री नृसिंह सरस्वती यांचे वास्तव्य होते. हे एक जागृत स्थान असून अनेक भक्तांचे व्याधी आणि बाधा निवारण केले जाते. येथे नृसिंह सरस्वतींच्या पादुका आहेत. ‘गाणगापूरग्रामी…
रत्नागिरी शहरापासून अवघ्या 1 किमी अंतरावर असणारा भाट्ये समुद्रकिनारा प्रसिद्ध आहे. या किनाऱ्यावरील संध्याकाळ पर्यटकांनी गजबजलेली असते. नैसर्गिक सौंदर्याने भारलेला हा सरळ समुद्रकिनारा अंदाजे 1.5 किलोमीटर लांब आहे. त्यामुळे किनाऱ्यावरून दूरवर चालत जाण्याचा आनंद आपण घेऊ शकता. या समुद्रकिनाऱ्यावरून, आपण भाट्ये किनाऱ्याच्या पुढे प्रसिद्ध ‘मांडवी’…
अलंग किल्ला हा अलंगगड म्हणूनही ओळखला जातो. हा किल्ला पश्चिम घाट आणि कळसूबाई पर्वत रांगेत असलेला एक किल्ला आहे. अलंग किल्ला, मदनगड किल्ला, कुलंग किल्ला आणि त्यांना जोडणारा ट्रेक अलंग, मदन आणि कुलंग म्हणून ओळखला जातो. अलंग किल्ला हा येथील सर्वात कठीण ठिकाणांपैकी एक म्हणून…
मुलांना सुट्टी लागली की दर आठवड्याला कुठेतरी बाहेर फिरायला न्यावंच लागतं. मुंबईतील निसर्गाच्या सानिध्यात असलेले प्रेक्षणीय स्थळ म्हणजे ‘महाराष्ट्र निसर्ग उद्यान’ होय. ३७ एकरांच्या कचऱ्याच्या ढीगाऱ्याखालील जमिनीचे परिवर्तन या निसर्ग उद्यानात करण्यात आलेले आहे. १९९४ पासून या रुपांतरणास सुरुवात झाली आणि आज धारावीच्या जवळ आपल्याला…
लिंबाचा वापर केवळ पेयासाठीच नसून त्वचेसाठीही लिंबाचा फायदा उत्तम होतो. कारण यातील जीवनसत्व ‘सी’ हे त्वचेसाठी एक चांगले आणि उत्तम पोषक तत्व ठरते. घरीच बनवा फेसपॅक आणि मिळवा सुंदर नितळ त्वचा !साहित्य :१ लहान चमचा तांदळाचे पीठ5 थेंब लिंबाचा रसअर्धा चमचा गुलाबपाणी बनविण्याची पद्धत :…
खूप जणांना सकाळच्या वेळी उपाशीपोटी फळांचा रस घेण्याची सवय असते. ज्यांना फळ खाणे विशेष आवडत नाही, मात्र फळांचा रस आवडतो, अशी मंडळी सकाळी उठल्या उठल्या हा रस प्राशन करतात. आपण जाहिरातींमध्ये किंवा मालिकांमध्ये जेवणाच्या टेबलवर न्याहारीसाठी असे फळांचे रस ठेवलेले पाहतो. त्यामुळे हा रस म्हणजे…