वसई विरारमधील पाणथळ जागांचे सर्वेक्षण
वसई विरार उपविभागातील अनेक भागांमधील नैसर्गिक पाणथळ जागांवर अतिक्रमणे होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या संवेदनशील जागांच्या संवर्धनासाठी चेन्नई येथील राष्ट्रीय शाश्वत किनारी व्यवस्थापन केंद्राने राज्य पाणथळ प्राधिकरणाला एक सविस्तर विवरणपत्र पाठवले आहे. या महत्त्वाच्या कागदपत्रांच्या आधारे, त्या जागा खरोखरच पाणथळ आहेत का आणि…