टिटवाळ्याचा सिद्धिविनायक महागणपती
मुंबईजवळील टिटवाळा गावात सिद्धिविनायक महागणपती मंदिर असून येथे भाविकांची नेहमी गर्दी असते. कल्याण-कसारा मार्गावर ‘काळू’ नदीच्या काठावर हे जागृत मंदिर आहे. टिटवाळा येथील गणपती मंदिर हे महाराष्ट्रातील 8 प्रसिध्द गणपती मंदिरापैकी एक आहे. महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच हे क्षेत्र प्रसिद्ध आहे. या परिसरात पूर्वी कण्व ऋषींचा आश्रम…
देवगडमधील तांबळडेग किनारा
महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगडमध्ये तांबळडेग हा अप्रतिम सागरकिनारा आहे. कोकणातील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांमध्ये गणला जावा असा हा किनारा आहे. स्वच्छ पांढरी वाळू, निळेशार पाणी असणारा ही किनारा एकांत प्रदान करणारा आहे. कसलीही गर्दी नाही.. सागराच्या साक्षीने स्वगत साधण्यासाठी मस्त असे हे ठिकाण आहे. सागरवेडा पर्यटक येथे…
शिवडीचा किल्ला
शिवडीचा किल्ला हा मुंबई शहरातील चांगल्या स्थितीत असलेला किल्ला आहे. हार्बर मार्गावरील शिवडी स्थानकाच्या पूर्वेला 10 ते 15 मिनिटांच्या अंतरावर हा किल्ला आहे.बहादूरखानाने त्याच्या ताब्यात असताना शिवडी किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पीराचा दर्गा बांधला. सन १५३४ च्या तहात हा किल्ला पोर्तुगिजांच्या ताब्यात गेल्यावर त्यांनी या किल्ल्याची डागडुजी…
सेवाग्राम आश्रम
भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी भारताच्या स्वातंत्र्यासाठी कसे जगले आणि कसे लढले ते पहायचे असल्यास पर्यटकांसाठी महाराष्ट्रातील एक उत्तम ठिकाण म्हणजे ‘सेवाग्राम आश्रम’ होय. महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यामध्ये हे ठिकाण आहे. सन 1933 मध्ये जमनालाल बजाज यांच्या विनंतीवरून गांधीजी काही काळासाठी वर्ध्याला आले. ते प्रारंभी महिला आश्रमाच्या…
खानदेशातील उनपदेव
खानदेशातील ‘उनपदेव’ या तीर्थक्षेत्रावर भाविकांची सदैव गर्दी असते. जळगाव जिल्ह्यातील ‘चोपडा’ शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर हे तीर्थक्षेत्र आहे. वैशिष्ट्य म्हणजे गरम पाण्याच्या झऱ्यासाठी हे तीर्थक्षेत्र प्रसिद्धीस पावले आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेले हे क्षेत्र म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवा आहे. येथे असलेल्या स्नानकुंडाच्या वरील बाजूला शरभंग…
सिंधुदुर्गातील मिठबाव किनारा
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला देवगड तालुका सागरकिनाऱ्यानीही समृद्ध आहे. येथील मिठबाव किनारा असाच नितांतसुंदर आणि देखणा आहे. ‘गजबा’ देवीच्या आशीर्वादाने पुलकित झालेला हा सागरतीर आहे. येथील स्थानिक तसेच आधी येऊन गेलेले पर्यटक संध्याकाळच्या वेळेला येथील मंदिरापाशी जाऊन बसतात. फेसाळणाऱ्या लाटांचे विहंगम दृश्य…
घोडबंदर किल्ला
ठाण्यातील घोडबंदर गावाजवळ ‘उल्हास’ नदीच्या किनाऱ्यावर घोडबंदर किल्ला आहे. पोर्तुगीजांनी बांधलेला हा किल्ला नंतर मराठ्यांच्या ताब्यात गेला. याठिकाणी पोर्तुगीज अरब लोकांसोबत घोड्यांचा व्यापार करीत. त्यामुळे या जागेला ‘घोडबंदर’ हे नाव पडले. या किल्ल्याचे पोर्तुगीज नाव ‘ककाबे दी तन्ना’ असे होते. इसवी सन १७३७ पर्यंत या…
कोका अभयारण्य
निसर्ग पर्यटनाची आवड असलेल्यांसाठी अभयारण्य हे उत्तम प्रेक्षणीय स्थळ ठरते. येथे वनस्पतीबरोबरच प्राणी, पक्ष्यांचे दर्शन होते. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात ‘न्यू नागझिरा’, ‘उमरेड कऱ्हाड’ आणि ‘कोका’ अशी 3 अभयारण्ये आहेत. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या ‘न्यू नागझिरा’ अभयारण्याला लागूनच ‘कोका अभयारण्य’ घोषित करण्यात आले. डिसेंबर 2013 पासून या…
सासूला खूश ठेवण्यासाठी
सासूला खूश ठेवणे खूप कठीण आहे, असे बऱ्याच सुनांचे मत असते. लग्नानंतर मुलीला सासू-सासऱ्यांची साथ मिळावी यासाठी तिला लग्नाच्या खूप आधी अप्रत्यक्षपणे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये स्वयंपाक, संभाषणाचा स्वर, इत्यादी अनेक गोष्टींचा समावेश असतो. बदलत्या काळानुसार आणखी काही गोष्टी आपल्या जीवनशैलीचा एक भाग बनल्या आहेत….
कैरीचे पन्हे
आंबटचिंबट कैरीचे दिवस आहेत, नाही ? झाडाला कोवळ्या-कडक कैऱ्या लगडलेल्या आहेत. आता त्या बाजारातही येऊन दाखल झाल्या आहेत. मग या उन्हाळ्याच्या दिवसात कैरीचे पन्हे नको का व्हायला? चला तर मग, आज बनवू कैरीचे पन्हे !आवश्यक साहित्य :अर्धा किलो कैऱ्या, साखर किंवा गूळ, १ चमचा मीठ…
चमकदार त्वचेसाठी
आपण सुंदर, मोहक, आकर्षक दिसावे, असे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. अनेकजणी त्वचा सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतात. निरोगी त्वचा मिळविण्यासाठी महागड्या उत्पादनांचा वापर करतात; पण एवढे करूनदेखील काही महिलांना त्वचेच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी तुम्ही घरच्या घरी काही उपाय करू शकता. त्वचेसंबंधित…
थंड पाण्याची आंघोळ
व्यक्तीची दिवसाची सुरुवात आंघोळ करून होते. काहीजण उन्हाळ्यात थंड पाण्याने व हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करतात; परंतु थंडीतही थंड पाण्याने आंघोळ करणे फायदेशीर असते. थंड पाण्याची आंघोळ मन आणि शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. आंघोळीसाठी पाणी किती थंड असावे, तर यासाठी बर्फासारख्या पाण्याची गरज नाही. पाणी…
सांगलीतील श्री क्षेत्र औदुंबर
श्री क्षेत्र औदुंबर हे श्री दत्तात्रेयांचे जागृत स्थान सांगली जिल्ह्यात आहे. तासगाव तालुक्यात ‘भिलवडी’ गावाजवळ ‘कृष्णा’ नदीच्या काठी निसर्गाच्या सहवासात हे सुंदर मंदिर उभे आहे. औदुंबर हे पश्चिम महाराष्ट्रातील आध्यात्मिक, धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाते. दत्तावतार नृसिंहसरस्वतींचे हे स्थान आहे. याठिकाणी वर्षभर विविध…
वेंगुर्ल्याचा दाभोळी वायंगणी किनारा
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला तालुक्यातील सागरकिनारे मनमोहक आहेत. येथील काही किनाऱ्यांवर पर्यटकांची वर्दळ असते. काही किनारे आल्हाददायक असूनही शांत आहेत. काही किनाऱ्यांवर कोळ्यांची वर्दळ असते. असाच येथील दाभोळी – वायंगणी किनारा आहे. येथे कोळ्यांची लगबग सुरु असते. उतार असलेल्या किनाऱ्यावर लाटांचा फेस, त्याची गाज अनुभवता…
भुदरगड किल्ला
महाराष्ट्रातील कोल्हापूर तालुक्यात ‘भुदरगड’ हा प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला आहे. कोल्हापूरच्या दक्षिणेला ३६ मैलावर आणि गारगोटीपासून ५ मैलावर सह्याद्री पर्वतरांगेत हा किल्ला विसावलेला आहे. या किल्ल्याची दक्षिणोत्तर लांबी २६०० फूट आणि रूंदी २१०० फूट आहे. या किल्ल्यावर श्री केदारलिंग, भैरवनाथ, जखूबाई अशी देवस्थाने आहेत. भुदरगड तालुक्याचे…
फणसाड अभयारण्य
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात ‘मुरुड’ गावाच्या अलीकडे ‘फणसाड वन्यजीव अभयारण्य’ आहे. हे पर्यटकांचे खास आकर्षण ठरले असून जगभरातील प्राणी-पक्षीप्रेमी येथील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी वर्षभर येथे भेट देत असतात. मुंबईपासून 154 कि.मी अंतरावर पनवेल-पेण-अलिबाग मार्गावर हे अभयारण्य आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ‘फणसाड अभयारण्याचे हे क्षेत्र म्हणजे मुरुड…
नारळ तेल उद्योग
नारळाच्या झाडावर उगवणाऱ्या पिकलेल्या नारळाच्या लगद्या किंवा रसातून नारळाचे तेल काढले जाते. संपूर्ण उष्णकटिबंधीय जगामध्ये पिढ्यानपिढ्या लाखो लोकांच्या आहारात चरबीचा मुख्य स्त्रोत आहे. त्यात अन्न, औषध आणि उद्योगात विविध उपयुक्तता आहेत. खोबरेल तेल हे उष्णतेचे उत्तम वाहक आहे, म्हणून ते शिजवण्यासाठी आणि तळण्यासाठी उत्कृष्ट तेल…
इंटेरिअर डिझायनिंग व्यवसाय
‘इंटेरिअर डिझायनिंग’ हा अलीकडच्या काळातील विकसनशील व्यवसाय आहे. इमारतीमध्ये कार्यात्मक जागा निर्माण करणारा हा व्यवसाय आहे. घर अथवा कार्यालयाच्या आतील सजावट म्हणजे त्या जागेस विशिष्ट सौंदर्य प्राप्त करून देणारा हा व्यवसाय आहे. बांधलेली वास्तू आकर्षक आणि उठावदार दिसण्यासाठी जी सजावट केली जाते, ते म्हणजे ‘…
हरभरा शेती
हरभरा’ अर्थात ‘चणा’ हे सामान्यतः ‘बंगाल हरभरा’ म्हणून ओळखले जाणारे भारतातील सर्वांत महत्त्वाचे कडधान्य पीक आहे. चणा कडधान्याखालील सुमारे 35-40 टक्के क्षेत्र व्यापतो. भारताच्या एकूण डाळी उत्पादनात जवळपास 50 टक्के योगदान देतो. मानवी वापरासाठी, तसेच प्राण्यांचे खाद्य म्हणूनही हरभऱ्याचा उपयोग केला जातो. चण्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण…
जेजुरीचा खंडोबा
पुणे जिल्ह्यातील जेजुरी या गावी खंडोबाचे देवस्थान आहे. येथे भाविकांची सतत गर्दी असते. खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून ते ‘जेजुरीचा खंडोबा’ या नावाने परिचित आहे. उंच डोंगरावर असलेल्या कडेपठार या ठिकाणी जुने मंदिर होते, इसवी सन १७१२ मध्ये जेजुरीला नव्याने देऊळ बांधले. या देवळासमोर दगडी…
सिंधुदुर्गातील घडीवाडीचा किनारा
महाराष्ट्रातील सिंधुदुर्गात देवगडमध्ये असलेला विजयदुर्ग किल्ला म्हणजे देवगड तालुक्याचे उत्तर टोक आहे. या किल्ल्यासमोर असलेला किनारा सुंदर आहेच; परंतु येथून दक्षिणेच्या दिशेने गेल्यावर ‘दामलेमळा’, ‘कोठारवाडी’, ‘कालवशी’ वगैरे किनारे असून येथील ‘घडीवाडीचा किनारा’ प्रसिद्ध आहे. गिर्ये गावाच्या रामेश्वर मंदिरामागे असलेला एक कच्चा रस्ता आपल्याला याठिकाणी घेऊन…
वरळी किल्ला
मुंबई परिसरात ऐतिहासिक वारसा समृद्ध करणारे काही किल्ले आहेत. एके काळी हे किल्ले पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय खात्याने या किल्ल्यांचे नुतनीकरण केल्यामुळे आजही हे किल्ले दिमाखात उभे अहेत. वरळी-कोळीवाड्यामध्ये आदर्श नगरच्या बसथांब्यावरुन समुद्रकिनाऱ्याकडे जाणारी एक अरुंद गल्ली आहे. या गल्ल्लीतून सुमारे 10 मिनिटे…
टिपेश्वर अभयारण्य
विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात वाघांचे मनसोक्त दर्शन घडविणारे टिपेश्वर अभयारण्य आहे. मुख्यालयापासून अवघ्या ८० किलोमीटर अंतरावर ही अभयारण्य आहे. नागपूरच्या पेंच व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत संरक्षित क्षेत्रामध्ये या अभयारण्याचा समावेश होतो. येथील ‘तिपाई’ देवीच्या नावावरून या अभयारण्याला ‘टिपेश्वर अभयारण्य’ असे नाव देण्यात आले. अभयारण्यात टेकडीवर हे तिपाईचे मंदिर…
मार्कंडेश्वर देवस्थान
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात वास्तुशिल्प शैलीसाठी प्रसिद्ध असलेले फार सुंदर मंदिरांचा समूह आहे. येथील श्रीमार्कंडेश्वर मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. ‘वैनगंगा’ नदीच्या डाव्या तीरावर ‘चामोर्शी’ या गावाच्या पश्चिमेला हे मंदिर उभे आहे. येथील अन्य मंदिरे आणि त्यांवरील शिल्पकला पाहण्यासाठी आवर्जून येथे पर्यटक येत असतात. महाशिवरात्रीला तर येथे…
हेदवीचा सागरकिनारा
शांत, रम्य असणारा रत्नागिरीच्या गुहागरजवळचा किनारा म्हणजे ‘हेदवीचा सागरकिनारा’ होय. हा किनारा आकर्षक आहेच; शिवाय किनाऱ्यावरच सुंदर असे ‘उमामहेश्वर मंदिर’ आहे. हेदवी समुद्र किनाऱ्याचा खडकाळ भाग सुरु होतो, तिथेच हे मंदिर आहे. या मंदिरामागे एक झरा आहे. येथे बसून शांतपणे समुद्राची गाज ऐकता येते. सभामंडपाच्या…