भारत-नेपाळ कायदेशीर सहाय्य करारावर चर्चा
काठमांडू: भारत आणि नेपाळ यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना अधिक बळकटी देण्यासाठी आणि सीमापार गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. भारत आणि नेपाळ दरम्यान स्वाक्षरी करण्यात आलेला ‘क्रिमिनल प्रकरणांतील परस्पर कायदेशीर सहाय्य करार’ नेपाळच्या संसदेत चर्चेसाठी मांडण्यात आला आहे. नेपाळच्या कायदा, न्याय आणि संसदीय…